शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

शेतकऱ्यांना कर्जमाफी! पण उत्तर प्रदेशातल्या

By admin | Updated: April 4, 2017 20:10 IST

उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी भाजपा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे.

 ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि,  ४ - उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी भाजपा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील शेतकऱ्यांचे एक लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. शेतकऱ्यांचे ३० हजार ७२९ कोटींचे कर्ज माफ होणार असून, बुडीत कर्ज धरून एकूण ३६ हजार ३५९ कोटींची कर्जमाफी करण्यात आली आहे, या कर्जमाफीचा लाभ उत्तर प्रदेशमधील ८६ लाख लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. 
उत्तर प्रदेश निवडणुकीसाठीच्या आपल्या वचननाम्यात भाजपाने सत्तेवर आल्यास लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा भाजपाने केली होती. प्रत्यक्ष निवडणुकीतही भाजपाला याचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला होता. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करावी लागणार असल्याने  भाजपा सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 
पण आज अखेर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आश्वासनपूर्तीच्या दिशेने पाऊल टाकले आहे.  योगी आदित्यनाथ यांनी कॅबिनेट बैठकीपूर्वी मंत्र्यांना पाठवलेल्या अजेंड्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी सर्वात वर होती. उत्तर प्रदेशमध्ये सुमारे दोन कोटी १५ लाख शेतकरी असून, त्यातील १ कोटी ८३ लाख शेतकरी अल्पभूधारक आणि ३० लाख शेतकरी छोटे आणि लहान आहेत. आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उत्तर प्रदेश सरकारला ३६ हजार ३५९ कोटींची तरतूद केली आहे.त्याबरोबरच उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत अँटी रोमिओ स्कॉड, राज्यात नवी उद्योग नीती,  अवैध कत्तलखाने अशी प्रश्नांवर निर्णय घेण्यात आले आहेत.