शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

डॉक्टरांच्या संप काळातील मृत्यूंची चौकशी होणार

By admin | Updated: August 15, 2014 03:03 IST

गेल्या महिन्यात डॉक्टरांनी पुकारलेल्या संपकाळात २३४ जण हे डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्याने मृत्युमुखी पडले नसल्याचा दावा राज्य शासनाने केला

मुंबई : गेल्या महिन्यात डॉक्टरांनी पुकारलेल्या संपकाळात २३४ जण हे डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्याने मृत्युमुखी पडले नसल्याचा दावा राज्य शासनाने केला असला तरी या सर्वांच्या निधनाचे नेमके कारण काय होते हे शोधण्यासाठी उच्च न्यायालयाने गुरुवारी एक समिती स्थापन केली़या समितीमध्ये मंत्रालयातील सनदी अधिकारी, जिल्हाधिकारी, डॉक्टर व स्थानिक वरिष्ठ पोलीस असणार आहे़ यापैकी वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पीडितांच्या नातलगांचे जबाब नोंदवणार, डॉक्टर मृत्युमुखी पडलेल्यांचे शवविच्छेदन अहवाल व इतर कागदपत्रे तपासणार तसेच सनदी अधिकारी व जिल्हाधिकारी संबंधित रुग्णाला वेळेवर उपचार मिळाले की नाही याची चौकशी करणार आहे़ या चौकशीची कागदपत्रे, पोलिसांनी नोंदवलेले जबाब व डॉक्टरांचा निष्कर्ष हे सर्व न्यायालयात सादर केले जाईल. याचा आढावा घेतल्यावर न्यायालय नुकसानभरपाई व फौजदारी चौकशीचे आदेश देईल़ या प्रकरणी अ‍ॅड़ गुणरत्न सदावर्ते यांनी फौजदारी जनहित याचिका दाखल केली़ जुलैमध्ये डॉक्टरांच्या संपात रुग्णांचे बळी गेले. त्यांच्या नातलगांना नुकसानभरपाई द्यावी व हे पैसे डॉक्टरांकडून वसूल करावेत तसेच या डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत आहे़ (प्रतिनिधी)