शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

महिलांसाठी संकट साहायता केंद्रे

By admin | Updated: July 23, 2014 02:54 IST

दिल्लीतील निर्भया कांडानंतर महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन कायद्यात दुरुस्ती करण्यात येऊन तो अधिक भक्कम करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी लोकसभेला दिली.

नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया कांडानंतर महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन कायद्यात दुरुस्ती करण्यात येऊन तो अधिक भक्कम करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी लोकसभेला दिली. याचसोबत लैंगिक शोषणपीडित स्त्रियांना एकाच जागी पोलीस साहायता, वैद्यकीय उपचार व कायदेशीर सल्ला, अशा तिन्ही सोयींनी युक्त असलेली एकल संकट समाधान केंद्रे या वर्षाच्या अखेरीर्पयत सुरू केली जाणार असल्याचीही माहिती सिंग यांनी यावेळी दिली.
लोकसभेत मीनाक्षी लेखी, सुप्रिया सुळे, रंजित रंजन व अन्य महिला सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल ते बोलत होते. निर्भयाकांडानंतर देशातील पोलीस ठाण्यांमध्ये बलात्काराची प्रकरणो नोंदविण्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण याआधी कमी होते. बलात्कारपीडित महिलेला एकाच ठिकाणी पोलीस व कायदेशीर मदत आणि वैद्यकीय उपचार देण्याच्या दृष्टीने लवकरच एकल संकट सहायता केंद्रांची स्थापना केली जाणार आहे, तसेच भौगोलिक सूचनाप्रणाली (जीआयएस)वर आधारित एका संगणक प्रणालीनुसार, संकटात अडकलेल्या महिलेने विशिष्ट नंबरवर केलेल्या फोनला तात्काळ उत्तर देऊन तिला मदत पुरविण्यासाठी कारवाई केली जाणार असल्याचीही माहिती सिंग यांनी पुढे दिली. ही योजना 114 शहरांमध्ये लागू होणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)