शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

नव्या बिहार विधानसभेत १४३ आमदारांविरुद्ध फौजदारी गुन्हे

By admin | Updated: November 10, 2015 22:45 IST

नव्या २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेतील एकूण १४३ आमदारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल आहेत आणि ९६ आमदार हत्या व अपहरण यासारख्या गंभीर फौजदारी गुन्ह्यांचा सामना करीत आहेत.

पाटणा : नव्या २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेतील एकूण १४३ आमदारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल आहेत आणि ९६ आमदार हत्या व अपहरण यासारख्या गंभीर फौजदारी गुन्ह्यांचा सामना करीत आहेत.गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या नवनिर्वाचित आमदारांमध्ये १२ आमदारांविरुद्ध हत्येचा आरोप, २६ आमदारांविरुद्ध हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप, ९ आमदारांविरुद्ध अपहरणाचा आरोप आणि १३ आमदारांविरुद्ध खंडणी वसुलीचा आरोप आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत ८० जागा जिंकून सर्वांत मोठा बनलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या आमदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे ४९ आहे. त्याखालोखाल नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाचा क्रमांक लागतो. या पक्षाच्या ३७ नवनिर्वाचित आमदारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल आहेत.२४३ सदस्यीय विधानसभेसाठी ३४५० उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यानंतर ही बाब उघड झाली. या ३४५० उमेदवारांपैकी १०३८ (३० टक्के) उमेदवारांनी आपल्याविरुद्ध दाखल असलेल्या फौजदारी गुन्ह्यांचा खुलासा केला, अशी माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस् (एडीआर) या संस्थेने दिली.किमान ७९६ उमेदवारांनी (२३ टक्के) आपल्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, सांप्रदायिक दुफळी, अपहरण आणि महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांशी संबंधित गंभीर फौजदारी गुन्हे दाखल असल्याची घोषणा या प्रतिज्ञापत्रांद्वारे केली आहे. भाजपाने या निवडणुकीत १५७ उमेदवार उभे केले होते. त्यांपैकी ९५ उमेदवारांनी (६१ टक्के) आपल्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, तर १०१ उमेदवार उभे करणाऱ्या संयुक्त जनता दलाच्या ५८ उमेदवारांनी (५७ टक्के) आपल्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल असल्याची कबुली दिली आहे. याशिवाय १०१ उमेदवार उभे करणाऱ्या राजदच्या ६१ (६० टक्के), ४१ उमेदवार उभे करणाऱ्या काँग्रेसच्या २३ (५६ टक्के) आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढलेल्या ११५० पैकी २५९ (२३ टक्के) उमेदवारांनी आपल्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.गंभीर फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या आमदारांमध्ये राजदच्या आमदारांची संख्या सर्वाधिक (३१) आहे, तर संयुक्त जनता दलाचे २४ उमेदवार अशा गुन्ह्यांचा सामना करीत आहेत. (वृत्तसंस्था)