शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

निवडणुकांमध्ये अजूनही गुन्हेगारी घटक महत्वाची भुमिका का बजावतात ? न्यायाधीशांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2016 07:58 IST

निवडणुकांमध्ये अजूनही गुन्हेगारी घटक महत्वाची भुमिका का बजावतात ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी विचारला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १८ - निवडणुकांमध्ये अजूनही गुन्हेगारी घटक महत्वाची भुमिका का बजावतात ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी विचारला आहे. कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाने राजकारण गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले असतानादेखील  ही परिस्थिती का ? असा सवाल न्यायाधीशांनी उपस्थित केला आहे. देशातील विविध क्षेत्रांतील प्रगती या विषयावर भोपाल न्यायालयीन अकादमीमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना हा प्रश्न विचारण्यात आला आहे. 
 
न्यायाधीस एस वाय कुरेशी यांनी निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष टी एस ठाकूर यांच्याकडे याबाबत विचारणा केली. मतदान रिंगणात गुन्हेगारी घटकांना येण्यापासून रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने काय पाऊल उचलली ? याची माहिती कुरेशी यांनी ठाकूर यांच्याकडे मागितली. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचा भंग होऊ नये तसंच सत्तेत असणा-या पक्षाला कोणताही चुकीचा फायदा मिळू नये यासाठी निवडणूक आयोगाने पुर्ण प्रयत्न केले आहेत अशी माहिती माजी अध्यक्ष टी एस ठाकूर यांनी दिली आहे.
 
निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती देणा-या उमेदवारांवर कारवाई करण्यासाठी पाऊल का उचलली गेली नाहीत ?
याबाबतही न्यायाधीशांनी विचारणा केली. प्रत्येक उमेदवाराचं प्रतिज्ञापत्र तपासून पाहण्याइतकं मनुष्यबळ निवडणूक आयोगाकडे नाही आहे. निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे असणारे उमेदवार जेव्हा अशी काही माहिती देतात तेव्हा कारवाई करण्यात येते असं ठाकूर यांनी सांगितलं आहे.
 
कायद्याची बंधन असतानाही निवडणुकांमध्ये वापरण्यात येणा-या पैशांवरुनही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तसंच मतदारांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप करण्यात येत असण्यावरुन काळजी व्यक्त केली आहे. लोकशाहीसाठी हा धोका असल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं आहे.