शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा - धनजंय मुंडे इमारत दुरुस्ती मंडळ स्थापन करण्यास चालढकल का?

By admin | Updated: August 5, 2015 22:19 IST

ठाणे : ठाणे आणि परिसरात इमारती कोसळून वर्षभरात जवळपास दीडशेहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. यातील अनेक इमारती या धोकादायक इमारतींच्या यादीत नसलेल्या आहेत. इमारती धोकादायक ठरविण्याच्या प्रक्रि येत भ्रष्टाचार असून यात लोकप्रतिनिधी, बांधकाम व्यावसायिक व पालिका प्रशासन यांची अभद्र युती असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. तसेच इमारत दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून घटनेला जबाबदार असलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाणे : ठाणे आणि परिसरात इमारती कोसळून वर्षभरात जवळपास दीडशेहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. यातील अनेक इमारती या धोकादायक इमारतींच्या यादीत नसलेल्या आहेत. इमारती धोकादायक ठरविण्याच्या प्रक्रि येत भ्रष्टाचार असून यात लोकप्रतिनिधी, बांधकाम व्यावसायिक व पालिका प्रशासन यांची अभद्र युती असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. तसेच इमारत दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून घटनेला जबाबदार असलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नौपाडा येथे मंगळवारी झालेल्या इमारत दुर्घटनेच्या ठिकाणाला त्यांनी बुधवारी भेट दिली तसेच जखमींचीही विचारपूस केली. कृष्ण निवास ही इमारत धोकादायक नसताना कशी पडली, ठाण्यातील धोकादायक असलेल्या अनेक इमारतींच्या रहिवाशांनी इमारत धोकादायक म्हणून जाहीर करण्यासाठी मागणी केली असताना त्या इमारती धोकादायक म्हणून जाहीर न करता ज्या धोकादायक नाहीत, अशा इमारतींना धोकादायक घोषित करून त्या पाडण्याचा प्रकार ठाण्यात घडत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. बांधकाम व्यावसायिकांच्या दबावाखाली अनेक धोकादायक नसलेल्या इमारती धोकादायक म्हणून ठरविल्या जात आहेत. अशा प्रकारे बेकायदेशीररीत्या काम करणार्‍यांविरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हायला हवे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनीदेखील या इमारत दुर्घटना प्रकारास पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप या वेळी केला.
पालिका प्रशासन, शिवसेना आणि राज्यातील भाजपा सरकार एका दिवसात देवा कॉर्पोराचे अनधिकृत मजले अधिकृत करण्यासाठी जो नियम लावला, तोच नियम ठाणेकरांसाठी लावावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
.................................................................................................................
मुंबई, नवी मुंबई या शहरांतील नादुरुस्त इमारतींसाठी दुरुस्ती महामंडळ स्थापन करण्याची परवानगी दिलेली असताना अशी परवानगी ठाण्याला का मिळत नाही, असा प्रश्नदेखील मुंडे यांनी उपस्थित केला. इमारती दुरुस्त झाल्या तर बांधकाम व्यावसायिकांना धंदा मिळणार नाही, म्हणून अशा महामंडळाला परवानगी दिली जात नाही की काय, असा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारचे महामंडळ होण्यासाठी व धोकादायक इमारती ठरविण्याच्या निकषांबाबत नागरिकांच्या भावना तीव्र असून त्यासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारादेखील मुंडे यांनी या वेळी दिला.