शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

दारुबंदीमुळे बिहारमधील गुन्हेगारी दर 27 टक्क्यांनी घसरला

By admin | Updated: April 28, 2016 12:45 IST

बिहारमध्ये करण्यात आलेल्या दारुबंदीमुळे गुन्हेगारी दर 27 टक्क्यांनी घसरला आहे, तर सोबतच अपघातांच प्रमाणही कमी झालं आहे

ऑनलाइन लोकमत - 
पाटणा, दि. 28 - बिहारमध्ये करण्यात आलेल्या दारुबंदीमुळे गुन्हेगारी दर 27 टक्क्यांनी घसरला आहे. तर सोबतच अपघातांच प्रमाणही कमी झालं आहे. गेल्या 20 दिवसांत समोर आलेल्या आकडेवारीच्या आधारे अधिका-यांनी ही माहिती दिली आहे. 5 एप्रिलपासून राज्यात दारुबंदी लागू करण्यात आली. राज्यात लागू करण्यात आलेल्या दारुबंदीचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. 
 
गुन्हेगारी दर 27 टक्क्यांनी घसरला असून रस्ते अपघाताचं प्रमाण 33 टक्क्यांनी कमी झालं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबतच पार पडलेल्या बैठकीत ही अधिकृत आकडेवारी मांडण्यात आली. आकडेवारीनुसार गतवर्षी 1 एप्रिल ते 23 एप्रिलदरम्यान गुन्हेगारीच्या 3178 घटनांची नोंद झाली होती. मात्र दारुबंदी लागू करण्यात आल्यापासून हा गुन्हेगारी दर घसरला असून यावर्षी 2528 घटनांची नोंद झाली आहे. 
 
धार्मिक कार्यक्रमांमध्ये होणा-या दंगलींच्या घटनांचं प्रमाणही कमी झालं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दारुबंदी पूर्णपणे लागू राहील याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसंच जे अधिकारी निष्काळजीपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्यासही सांगितलं आहे. निवडणुकीआधी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सत्तेत आल्यास पुर्णपणे दारुबंदी करण्याचं आश्वासन दिलं होतं. दारुबंदीमुळे सरकारला वार्षिक 4 हजार कोटी महसूलाच नुकसान होत आहे.