शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येवर न्यायालयच निर्णय घेईल

By admin | Updated: June 7, 2015 22:58 IST

अयोध्या मुद्दा कायदा आणून सोडविला जाऊ शकत नाही आणि या मुद्यावर केवळ न्यायालयच निर्णय घेईल, असे अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या दिशेने पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी विहिंप आणि काही भाजप नेत्यांनी केलेली असतानाच, अयोध्या मुद्दा कायदा आणून सोडविला जाऊ शकत नाही आणि या मुद्यावर केवळ न्यायालयच निर्णय घेईल, असे अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने स्पष्ट केले आहे.‘राम मंदिर बांधण्यासाठी संसदेत कायदा करण्यात आला पाहिजे, असे सांगितले जात आहे; परंतु हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट असल्यामुळे संसदेत कायदा आणणे शक्य होणार नाही. कायद्याच्या माध्यमातून हा प्रश्न सुटणार नाही तर न्यायालयातूनच त्याच्यावर तोडगा काढता येईल,’ असे बोर्डचे प्रवक्ते अब्दुल रहीम कुरेशी यांनी म्हटले आहे.मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा न करता राम मंदिर बांधण्याच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे, अशी मागणी भाजपचे खासदार विनय कटियार यांनी केलेली होती.कटियार यांच्यावर टीका करताना कुरेशी म्हणाले, केंद्रात सरकार स्थापन करतेवेळी बाजूला सारण्यात आल्यामुळे कटियार हे आता स्वत:कडे लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारची विधाने करीत आहेत. कटियार यांना सरकारमध्ये एखादे पद हवे आहे, असे दिसते; परंतु आम्ही अशा प्रकारच्या वक्तव्यांना फारसे महत्त्व देत नाही.मोदी सरकारला राज्यसभेत बहुमत नसल्याकारणाने अयोध्या मुद्यावर कायदा करणे शक्य होणार नाही, या केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या विधानाकडे कुरेशी यांनी लक्ष वेधले. या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी न्यायालयाबाहेर चर्चा करण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली. चर्चा कुणाशी? जे ऐकायला तयारच नाहीत त्यांच्याशी आम्ही चर्चा कशी काय करू शकतो, असा सवाल कुरेशी यांनी केला.----------------भाजपच्या राजवटीतच राम मंदिर बांधणार -साक्षी महाराजउन्नाव : आणखी चार वर्षे कायम राहणार असलेल्या केंद्रातील भाजप सरकारच्या राजवटीतच अयोध्येत राम मंदिर बांधण्यात येईल, असे जाहीर करून वादग्रस्त भाजप खासदार साक्षी महाराज यांनी आणखी एका नव्या वादाला जन्म दिला. साक्षी महाराज यांच्या या विधानावर काँग्रेससह अन्य पक्षांनी जोरदार टीका केली आहे.‘राम मंदिर भाजपच्या राजवटीत बांधणार नाही, तर मग काँग्रेसच्या राजवटीत बांधणार का? की मुलायमसिंग किंवा मायावती राममंदिर बांधणार आहेत का? राममंदिर भाजपच्याच राजवटीत बांधण्यात येईल, ही काळ्या दगडावरची रेष आहे. ते आज बांधले नाही तर उद्या किंवा परवा तरी बांधले जाईल. आम्हाला सत्तेत केवळ एक वर्ष पूर्ण झाले आहे. आणखी चार वर्षे बाकी आहेत,’ असे साक्षी महाराज म्हणाले. उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे ते पत्रकारांशी बोलत होते. (वृत्तसंस्था)