शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोनाचे देशात  १,००,००० रुग्ण; गेल्या २४ तासांत ५,२४२ जण आढळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 05:53 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : सोमवारी रात्रीच भारतातील कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या वर गेली आहे. कारण सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत रुग्ण संख्या ९६,१६९ झाली होती आणि मृतांची संख्या तीन हजारांचा टप्पा ओलांडून गेली होती.

नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासांत देशामध्ये कोरोनाचे विक्रमी ५,२४२ रुग्ण आढळून आल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. याच काळात १५७ जणांचा मृत्यू झाल्यामुळे तसेच रुग्णसंख्या लाखाच्या घरात पोहोचल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज आहेत.सोमवारी रात्रीच भारतातील कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या वर गेली आहे. कारण सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत रुग्ण संख्या ९६,१६९ झाली होती आणि मृतांची संख्या तीन हजारांचा टप्पा ओलांडून गेली होती.17 मेपर्यंत देशात रोजची रुग्णसंख्या चार हजारांच्या खाली असायची. मात्र एकाच दिवसात रुग्णांची संख्या पाच हजारांनी वाढली. देशातील ७२९ जिल्ह्यांपैकी ५५० जिल्ह्यांत कोरोनाने प्रवेश केला आहे. त्या आधी केवळ ४३० जिल्हेच कोरोनाबाधित जिल्हे होते.24 मार्चपासून ३१ मेपर्यंतचा ६९ दिवसांचा प्रदीर्घ लॉकडाऊन देशभर असून आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपाययोजना करूनही रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्यामुळे पंतप्रधान आणि केंद्र सरकारची चिंता वाढली आहे.कठोर पावले उचलल्यास रुग्णवाढीचा आलेख खाली येऊन16 मेनंतर तो स्थिर होईल, असे तज्ज्ञ मंडळींनी म्हटले होते. पंतप्रधानांच्या टास्क फोर्सचे (आरोग्य) अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी २४ एप्रिल रोजी देशासमोर सादर केलेल्या प्रेझेंटेशनने कोरोना रुग्णवाढीचा आलेख खाली येईल, अशी आशा निर्माण झाली होती. पॉल यांनी लॉकडाउनमुळे विषाणूला रोखण्यात मदत झाल्याचा दावाही केला होता. त्याचवेळी डॉ. पॉल यांनी१६ मेनंतर कोरोनाचा आलेख खाली येईल, असे भाकीत केले होते.जागतिक पातळीवर प्रति लाख ६० रुग्णभारतात एक लाख लोकसंख्येमागे कोरोना रुग्णांचे प्रमाण ७.१ असून जागतिक पातळीवर मात्र प्रति लाख ६० आहे. ब्रिटनमध्ये हे प्रमाण प्रति लाख ३६१, स्पेनमध्ये प्रति लाख ४९४, इटलीत ३७३ आणि ब्राझीलमध्ये प्रति लाख १०४ आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ३८.३९ टक्के आहे. भारतात आतापर्यंत व्यापक उपाययोजना करण्यात आल्याने समाधानकारक परिणाम मिळत आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.११ टास्क फोर्सअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) डॉ. पॉल हे नामांकित डॉक्टर असून नीती आयोगाचे सदस्यही आहेत. लॉकडाऊनसह इतर उपाययोजना सुचवण्यासाठीच्या अनौपचारिक गटाच्या प्रमुखपदी मोदी यांनी डॉ. पॉल यांची १८ मार्च रोजी निवड केली होती. तेव्हा देशात कोरोनाचे रुग्ण ६०० व १६ मृत्यू होते. सहा एप्रिल रोजी मोदी यांनी पॉल यांना पंतप्रधानांच्या टास्क फोर्सच्या (आरोग्य) अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्याआधी मोदी यांनी कोविड-१९ वर मंत्र्यांचा गट सहा फेब्रुवारी रोजी स्थापन केला. त्याचे प्रमुख होते केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन. नंतर मोदी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी जे विषय आहेत, त्याबाबत सल्ला घेण्यासाठी ११ टास्क फोर्सेसची स्थापना केली.26.47 लाख रुग्णांवर उपचार सुरूजगात कोरोनाच्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ४८ लाख ४८ हजार झाली असली, तरी १८ लाख ७४ हजार रुग्ण बरे झाल्याने २६ लाख ४७ हजार जणांवर उपचार सुरू आहेत. जगभरात मृतांचा आकडा ३ लाख १७ हजार झाला आहे. अमेरिकेतील मृतांची संख्या ९१ हजारांवर गेली.या राज्यांनाही विळखा...देशातील अन्य राज्यांना कोरोनाने विळखा घातला असून महाराष्टÑानंतर तामिळनाडू, गुजरात, दिल्लीतील रुग्णांची संख्या10,000 वर गेली आहे. त्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, बिहारचा क्रमांक लागतो. गुजरातमधील अहमदाबाद शहरातील स्थिती गंभीर बनली आहे. येथे एकूण रुग्णांची संख्या ८ हजारांवर पोहोचली असून मृतांचा आकडा ५५५ झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या