शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus News : कोरोनाचे देशात  १,००,००० रुग्ण; गेल्या २४ तासांत ५,२४२ जण आढळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 05:53 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : सोमवारी रात्रीच भारतातील कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या वर गेली आहे. कारण सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत रुग्ण संख्या ९६,१६९ झाली होती आणि मृतांची संख्या तीन हजारांचा टप्पा ओलांडून गेली होती.

नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासांत देशामध्ये कोरोनाचे विक्रमी ५,२४२ रुग्ण आढळून आल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. याच काळात १५७ जणांचा मृत्यू झाल्यामुळे तसेच रुग्णसंख्या लाखाच्या घरात पोहोचल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज आहेत.सोमवारी रात्रीच भारतातील कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या वर गेली आहे. कारण सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत रुग्ण संख्या ९६,१६९ झाली होती आणि मृतांची संख्या तीन हजारांचा टप्पा ओलांडून गेली होती.17 मेपर्यंत देशात रोजची रुग्णसंख्या चार हजारांच्या खाली असायची. मात्र एकाच दिवसात रुग्णांची संख्या पाच हजारांनी वाढली. देशातील ७२९ जिल्ह्यांपैकी ५५० जिल्ह्यांत कोरोनाने प्रवेश केला आहे. त्या आधी केवळ ४३० जिल्हेच कोरोनाबाधित जिल्हे होते.24 मार्चपासून ३१ मेपर्यंतचा ६९ दिवसांचा प्रदीर्घ लॉकडाऊन देशभर असून आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपाययोजना करूनही रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्यामुळे पंतप्रधान आणि केंद्र सरकारची चिंता वाढली आहे.कठोर पावले उचलल्यास रुग्णवाढीचा आलेख खाली येऊन16 मेनंतर तो स्थिर होईल, असे तज्ज्ञ मंडळींनी म्हटले होते. पंतप्रधानांच्या टास्क फोर्सचे (आरोग्य) अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी २४ एप्रिल रोजी देशासमोर सादर केलेल्या प्रेझेंटेशनने कोरोना रुग्णवाढीचा आलेख खाली येईल, अशी आशा निर्माण झाली होती. पॉल यांनी लॉकडाउनमुळे विषाणूला रोखण्यात मदत झाल्याचा दावाही केला होता. त्याचवेळी डॉ. पॉल यांनी१६ मेनंतर कोरोनाचा आलेख खाली येईल, असे भाकीत केले होते.जागतिक पातळीवर प्रति लाख ६० रुग्णभारतात एक लाख लोकसंख्येमागे कोरोना रुग्णांचे प्रमाण ७.१ असून जागतिक पातळीवर मात्र प्रति लाख ६० आहे. ब्रिटनमध्ये हे प्रमाण प्रति लाख ३६१, स्पेनमध्ये प्रति लाख ४९४, इटलीत ३७३ आणि ब्राझीलमध्ये प्रति लाख १०४ आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ३८.३९ टक्के आहे. भारतात आतापर्यंत व्यापक उपाययोजना करण्यात आल्याने समाधानकारक परिणाम मिळत आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.११ टास्क फोर्सअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) डॉ. पॉल हे नामांकित डॉक्टर असून नीती आयोगाचे सदस्यही आहेत. लॉकडाऊनसह इतर उपाययोजना सुचवण्यासाठीच्या अनौपचारिक गटाच्या प्रमुखपदी मोदी यांनी डॉ. पॉल यांची १८ मार्च रोजी निवड केली होती. तेव्हा देशात कोरोनाचे रुग्ण ६०० व १६ मृत्यू होते. सहा एप्रिल रोजी मोदी यांनी पॉल यांना पंतप्रधानांच्या टास्क फोर्सच्या (आरोग्य) अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्याआधी मोदी यांनी कोविड-१९ वर मंत्र्यांचा गट सहा फेब्रुवारी रोजी स्थापन केला. त्याचे प्रमुख होते केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन. नंतर मोदी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी जे विषय आहेत, त्याबाबत सल्ला घेण्यासाठी ११ टास्क फोर्सेसची स्थापना केली.26.47 लाख रुग्णांवर उपचार सुरूजगात कोरोनाच्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ४८ लाख ४८ हजार झाली असली, तरी १८ लाख ७४ हजार रुग्ण बरे झाल्याने २६ लाख ४७ हजार जणांवर उपचार सुरू आहेत. जगभरात मृतांचा आकडा ३ लाख १७ हजार झाला आहे. अमेरिकेतील मृतांची संख्या ९१ हजारांवर गेली.या राज्यांनाही विळखा...देशातील अन्य राज्यांना कोरोनाने विळखा घातला असून महाराष्टÑानंतर तामिळनाडू, गुजरात, दिल्लीतील रुग्णांची संख्या10,000 वर गेली आहे. त्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, बिहारचा क्रमांक लागतो. गुजरातमधील अहमदाबाद शहरातील स्थिती गंभीर बनली आहे. येथे एकूण रुग्णांची संख्या ८ हजारांवर पोहोचली असून मृतांचा आकडा ५५५ झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या