शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

CoronaVirus: कोरोनाचा हाहाकार! आठवड्याभरात मृतांच्या संख्येत चारपट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 15:26 IST

आठवड्याभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ; महाराष्ट्र, केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण

नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगानं वाढल्याचं स्पष्ट दिसत आहे. वर्ल्डोमीटरनं सकाळी ९ वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील कोरोना रुग्णांची संख्या १२५१ वर पोहोचली आहे. यातील ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. जगात आतापर्यंत पावणे आठ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीन, युरोपनंतर आता अमेरिकेत कोरोनानं थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांत देशातील कोरोनाबाधितांची संख्या अतिशय वेगानं वाढली आहे. १ मार्च रोजी देशात कोरोनाचे केवळ ३ रुग्ण होते. हे तिघेही केरळचे होते. यानंतर २ मार्चला कोरोनाचे आणखी तीन रुग्ण आढळून आले. यातील एक व्यक्ती इटलीहून दिल्लीला आली होती. दुसरी व्यक्ती दुबईहून तेलंगणाला परतली होती. तर तिसरी व्यक्ती इटलीहून राजस्थानला फिरायला आली होती. २ मार्चनंतर देशातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढू लागली. काल दिवसभरात कोरोनाचे तब्बल २२७ रुग्ण आढळले. याआधी कधीही एकाच दिवसात कोरोनाचे इतके रुग्ण सापडले नव्हते. २३ मार्चपर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ७ इतकी होती. तर कोरोनाची बाधा झालेल्यांचा आकडा ४१५ इतका होता. ३१ मार्चपर्यंत कोरोनाग्रस्तांची आकडेवारी १२५१ पर्यंत पोहोचली आहे. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा ३२ वर गेला आहे. गेल्या आठवड्याभरात कोरोना अतिशय वेगानं वाढल्याचं यातून दिसून येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या