शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

समन्वय समितीतही मित्र पक्षांना डावलले

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

मुंबई- भाजपा- शिवसेना यांच्यातील समन्वय समितीमध्ये रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी व शिवसंग्राम यांचा समावेश केला जाणार नसल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. भाजपा व शिवसेनेने आपापल्या मित्रपक्षांची काळजी घ्यावी, असे दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे मत असल्याचे समजते. बुधवारी समन्वय समितीची पहिली बैठक अपेक्षित असल्याचे समजते.

मुंबई- भाजपा- शिवसेना यांच्यातील समन्वय समितीमध्ये रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी व शिवसंग्राम यांचा समावेश केला जाणार नसल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. भाजपा व शिवसेनेने आपापल्या मित्रपक्षांची काळजी घ्यावी, असे दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे मत असल्याचे समजते. बुधवारी समन्वय समितीची पहिली बैठक अपेक्षित असल्याचे समजते.
भाजपा व शिवसेनेतील मतभेद वरचेवर विकोपाला जाऊ लागल्याने समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. मात्र या समितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी व शिवसंग्राम यांचा समावेश करण्यास भाजपा व शिवसेनेचे नेते फारसे अनुकूल नाहीत. मित्रपक्षांना समन्वय समितीत घेण्यापेक्षा भाजपा व शिवसेनेने त्यांच्या वाट्याला येणारी महामंडळे, नियुक्त्यांमध्ये मित्रपक्षांना सहभागी करून घ्यावे. मित्रपक्षांना समितीत घेतल्यास वेगवेगळ्या नेत्यांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे समन्वय समितीच्या कामकाजास फाटे फुटतील आणि वाद निर्माण होतील, अशी भीती भाजपा नेत्यांना वाटते.
दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई यांनी मंगळवारी सायंकाळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली व समन्वय समितीच्या कामकाजाबाबत प्राथमिक चर्चा केली. याबाबत दानवे यांना विचारले असता ते म्हणाले की, बुधवारी समन्वय समिती घेण्याबाबत आमचा विचार सुरु आहे. या बैठकीला मित्र पक्षांना बोलवायचे किंवा कसे याबाबत चर्चा सुरु आहे. (विशेष प्रतिनिधी)