शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

देशहित सर्वोच्च मानून सहकार्य करा- मोदी

By admin | Updated: July 18, 2016 04:35 IST

सर्व राजकीय पक्षांनी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा देशहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे

नवी दिल्ली : सर्व राजकीय पक्षांनी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा देशहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकासह अन्य महत्वाची विधेयके संसदेत मंजूर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन विरोधी पक्षांना केले.सोमवारपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोणत्या सरकारला श्रेय मिळते हा प्रश्न नसून ‘जीएसटी’सह महत्वाची विधेयके संसदेत चर्चेला घेतली जाणे महत्वाचे आहे. आपण सर्व जनतेचे व आपापल्या पक्षांचे प्रतिनिधित्व करतो व आपण इतर कोणत्याही गोष्टींहून देशहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे.काश्मीरमधील ताज्या घटनांच्या संदर्भात बोलताना एकवाक्यता दाखविल्याबद्दल पंतप्रधांनी सर्व राजकीय पक्षांचे आभार मानले.सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अरुणाचल प्रदेश व उत्तराखंडमधील ताज्या राजकीय घडामोडींचा उल्लेख केला व अधिवेशनात यावरून सरकारवर तोफ डागण्याचे संकेत दिले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी तर स्पष्टपणे सांगितले की, केंद्रातील भाजपाप्रणीत सरकारवर राज्यांचा आता विश्वास राहिलेला नाही. बैठकीत काश्मीरमधील सध्याची अशांतता, वाढती महागाई व देशाच्या परराष्ट ्रधोरणासंबंधीच्या ताज्या घडामोडींवरही चर्चा झाली.‘जीएसटी’ विधेयकावर सर्वसंमतीसाठी सरकार सर्व पक्षांशी चर्चा करेल, असे सांगून नवे संसदीयकायर्मंत्री अनंत कुमार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अधिवेशनात ‘जीएसटी’सह अन्य विधेयके मंजूर करून घेणे यास सरकारचे प्राधान्य असेल. जीएसटी विधेयक सर्व संमतीने मंजूर व्हावे, असे आम्हाला वाटते व त्यासाठी आम्ही प्रत्येक पक्षाला सोबत घेऊ. अरुणाचल प्रदेशच्या मुद्द्यावरून काँग्रेस, डावे पक्ष व इतरांनी केलेल्या टिकेला थेट उत्तर न देता अनंत कुमार म्हणाले की, संसदेत सर्व विषयांवर खुल्या मनाने चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे, अशी खात्री आम्ही सर्व पक्षांना दिली आहे.पत्रकारांशी बोलताना आझाद यांनी राज्यांमधील विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकार हरतऱ्हेचे हातखंडे योजत असल्याचा आरोप केला. केंद्र व राज्यांमधील सहकार्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवत आझाद म्हणाले की, केवळ आम्हीच नाही तर केंद्रातील सत्ताधारी आघाडीत मित्रपक्ष असलेल्या अकाली दलानेही राज्यांचे खच्चीकरण केले जात असल्याबद्दल केंद्रावर टिका केली आहे.‘जीएसटी’चा थेट उल्लेख न करात आझाद म्हणाले की, संसदेत येणाऱ्या विधेयकांना काँग्रेस गुणवत्तेवर पाठिंबा देईल. कोणतेही बिल रोखून धरण्याचे आम्ही ठरविलेले नाही. ज्याने लोकांचे भले होईल व विकास आणि प्रगतीला मदत होईल अशा कोणत्याही विधेयकाला आमचा पाठिंबा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>काँग्रेस कोणतेही विधेयक मुद्दाम रोखणार नाही संसद ही महापंचायत आहे व  तेथे सर्व विषयांवर चर्चा केली जाऊ शकते. ‘जीएसटी’ विधेयक सर्वसंमतीने मंजूर व्हावे यासाठी सरकार सर्व पक्षांना सोबत घेईल.- अनंत कुमार, संसदीय कार्यमंत्रीकाँग्रेस कोणतेही विधेयक मुद्दाम रोखणार नाही. देशाच्या, जनतेच्या प्रगतीच्या हिताचे असेल अशा कोणत्याही विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा असेल.- गुलाम नबी आझाद, विरोधी पक्षनेते, राज्यसभाजीएसटी विधेयक हा केवळ भाजपा व काँग्रेस यांनी आपसात चर्चा करून सोडवायचा विषय नाही. आमचेही म्हणणे ऐकून घ्या व सर्वसंमतीसाठी सर्वपक्षीय बैठक घ्या, असे मी सरकारला गेली दोन वर्षे विनवीत आलो आहे.- सिताराम येचुरी, सरचिटणीस, मार्क्सवादी कम्युनिस्टपावसाळी अधिवेशनात २० कामकाजाचे दिवस मिळतील व ते १२ आॅगस्टपर्यंत चालेल. ‘जीएसटी’सह एकूण २५ विधेयके अधिवेशनात चर्चेला घेतली जाणे अपेक्षित आहे. पावसाळी अधिवेशनात २० कामकाजाचे दिवस मिळतील व ते १२ आॅगस्टपर्यंत चालेल. ‘जीएसटी’सह एकूण २५ विधेयके अधिवेशनात चर्चेला घेतली जाणे अपेक्षित आहे.