शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

धर्मांतर वाद चिघळला

By admin | Updated: December 22, 2014 04:18 IST

धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचे ‘घर वापसी’चे आक्रमक कृतिशील समर्थन विश्व हिंदू परिषदेने सुरू केले आहे.

नवी दिल्ली : धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचे ‘घर वापसी’चे आक्रमक कृतिशील समर्थन विश्व हिंदू परिषदेने सुरू केले आहे. धर्मांतराबाबतच्या वादग्रस्त विधानांनी मोदी सरकारची डोकेदुखी वाढलेली असतानाच विहिंप नेत्यांच्या वक्तव्यांनी वाद चिघळू लागला आहे. गुजरातमधील आदिवासींच्या घर वापसीचा कार्यक्रम आणि दिल्लीत अशोक सिंघल यांनी केलेली विधाने यामुळे या वादाची धग आणखी वाढली. परिणामी राज्यसभेत सरकार आणि विरोधकांमध्ये झालेली कोंडी फुटणे अवघड बनले आहे. आम्ही धर्मपरिवर्तन नव्हे, तर लोकांची मने जिंकायला निघालो आहोत, अशी भूमिका घेत जगभरातील युद्धांसाठी ख्रिश्चन आणि मुस्लीमच कारणीभूत असतात, असे वादग्रस्त विधान विहिंप नेते अशोक सिंघल यांनी रविवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले. मुस्लीम, ख्रिश्चन हे युद्धातील खेळाडू आहेत, असे सांगत त्यांनी ‘घर वापसी’चे समर्थन केले. > पदत्यागाची चर्चा तथ्यहीनधर्मांतराच्या मुद्द्यावर संघ परिवारातील नेते करीत असलेल्या वक्त व्यांमुळे नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देण्याची भाषा केल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचा खुलासा पंतप्रधान कार्यालयाने केला आहे. > राज्यसभेतील कोंडी कायम राहणार ?>  कोलकात्यात सरसंघचालकांनी केलेले हिंदू राष्ट्राविषयीचे सूचक भाष्य आणि सिंघल यांनी केंद्रात हिंदू सरकार आल्याचे केलेले वक्तव्य या पार्श्वभूमीवर राज्यसभेतील कोंडी कायम राहील, अशी चिन्हे आहेत. > विरोधकांचा पारा आणखी वाढेल, अशा वादग्रस्त विधानांच्या जोडीला विश्व हिंदू परिषदेने ‘घर वापसी’ची मोहीम सुरूच ठेवली आहे. रविवारी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील अरनाई येथे ख्रिश्चन समाजातील सुमारे ५०० जणांचे धर्मपरिवर्तन करण्यात आले. > बळ किंवा लालूच दाखवून हे धर्मांतर करण्यात आलेले नाही, असा दावाही विहिंपने केला आहे. हे सर्व जण आधी हिंदूच होते, मात्र नंतर या सर्वांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आता या सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणल्याचा दावा विहिंपचे स्थानिक नेते नातू पटेल यांनी केला. > विहिंपच्या या कार्यक्र माबाबत वलसाडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. धर्मांतराचा कार्यक्र म आयोजित करण्यापूर्वी विहिंपने जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली होती का, हे स्पष्ट झालेले नाही.