शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

सम-विषम योजनेमुळे दिल्लीतील प्रदूषणावर नियंत्रण

By admin | Updated: January 2, 2016 10:58 IST

वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने लागू केलेल्या सम-विषम योजनेमुळे इतर दिवसांच्या तुलनेत दिल्लीत शुक्रवारी १० टक्के कमी प्रदूषण झाल्याची माहिती समोर येत आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लागू केलेल्या महत्त्वाकांक्षी सम-विषम योजनेमुळे इतर दिवसांच्या तुलनेत राजधानीत शुक्रवारी १० टक्के कमी प्रदूषण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सम-विषम योजना यशस्वी ठरताना दिसत आहे. 
सम-विषम तारखेला चारचाकी वाहने त्यांच्या सम-विषम क्रमांकानुसार रस्त्यावर उतरवण्याची नवी योजना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणली असून या योजनेला पहिल्याच दिवशी १ जानेवारी ( शुक्रवार) चांगला प्रतिसाद मिळाला आणि कारच्या संख्येत लक्षणीय घट दिसून आली. परिणामी पहिल्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी २ दरम्यान १० टक्के प्रदूषण कमी आढळले. तसेच स्त्यांवर वाहनाची गर्दी नसल्यामुळे प्रवासी खूष दिसून आले. मात्र ही योजना नेमकी किती परिणामदायी आहे, हे दोन-तीन दिवसांनीच स्पष्ट होऊ शकेल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले. 
दिल्लीच्या मंत्र्यांनी मोटरबाईक, ई-रिक्षा, बस व भाड्याच्या कारसारख्या विविध वाहनांचा वापर करीत नववर्षाच्या पहिल्या दिवशी सचिवालय गाठले. पर्यटन मंत्री कपिल मिश्रा हे सकाळी ९ च्या सुमारास बाईकने सचिवालयात आले.