शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

सम-विषम योजनेमुळे दिल्लीतील प्रदूषणावर नियंत्रण

By admin | Updated: January 2, 2016 10:58 IST

वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने लागू केलेल्या सम-विषम योजनेमुळे इतर दिवसांच्या तुलनेत दिल्लीत शुक्रवारी १० टक्के कमी प्रदूषण झाल्याची माहिती समोर येत आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लागू केलेल्या महत्त्वाकांक्षी सम-विषम योजनेमुळे इतर दिवसांच्या तुलनेत राजधानीत शुक्रवारी १० टक्के कमी प्रदूषण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सम-विषम योजना यशस्वी ठरताना दिसत आहे. 
सम-विषम तारखेला चारचाकी वाहने त्यांच्या सम-विषम क्रमांकानुसार रस्त्यावर उतरवण्याची नवी योजना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणली असून या योजनेला पहिल्याच दिवशी १ जानेवारी ( शुक्रवार) चांगला प्रतिसाद मिळाला आणि कारच्या संख्येत लक्षणीय घट दिसून आली. परिणामी पहिल्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी २ दरम्यान १० टक्के प्रदूषण कमी आढळले. तसेच स्त्यांवर वाहनाची गर्दी नसल्यामुळे प्रवासी खूष दिसून आले. मात्र ही योजना नेमकी किती परिणामदायी आहे, हे दोन-तीन दिवसांनीच स्पष्ट होऊ शकेल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले. 
दिल्लीच्या मंत्र्यांनी मोटरबाईक, ई-रिक्षा, बस व भाड्याच्या कारसारख्या विविध वाहनांचा वापर करीत नववर्षाच्या पहिल्या दिवशी सचिवालय गाठले. पर्यटन मंत्री कपिल मिश्रा हे सकाळी ९ च्या सुमारास बाईकने सचिवालयात आले.