शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

कामगार कायद्यांचे खच्चीकरण सुरू

By admin | Updated: December 6, 2015 03:27 IST

केंद्रातील मोदी सरकारकडून हेतुपुरस्सर कामगार कायदे कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असून यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण होत आहे, असा आरोप काँग्रेसचे

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारकडून हेतुपुरस्सर कामगार कायदे कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असून यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण होत आहे, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केला.मोदी यांनी कामगारांवर मोठा हल्ला सुरू केला असल्याचा दावा करतानाच काँग्रेसने भूसंपादन विधेयकावर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाजूने संघर्ष केला तसाच लढा कामगारांसाठीसुद्धा देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.काँग्रेसशी संलग्न कामगार संघटना इंटकच्या ३१ व्या पूर्ण सत्राला राहुल गांधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. काँग्रेस पक्ष नेहमीच कामगारांसोबत उभा राहील, असे सांगून काँग्रेस उपाध्यक्ष म्हणाले, चीनच्या तुलनेत भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याच्या पंतप्रधानांच्या विचारांशी मी सहमत आहे; परंतु ही सहमती येथेच संपते. भारतीय कामगार बेईमान आणि कामचुकार आहेत आणि हंटर हाती घेऊनच त्यांच्याकडून काम करवून घ्यावे लागत असल्याचे पंतप्रधानांचे मत आहे. त्यामुळेच कामगार कायदे कमकुवत करून त्यांना आपल्यापुढे गुडघे टेकायला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावाही त्यांनी केला. यासंदर्भात गांधी यांनी गुजरात, राजस्थान आणि हरियाणात तयार करण्यात येत असलेल्या नव्या कायद्यांचा उल्लेख केला. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि इंटकचे प्रमुख जी. संजीव रेड्डी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)