शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

असहिष्णुतेविरुद्ध काँग्रेसचा एल्गार!

By admin | Updated: November 4, 2015 04:45 IST

मोदी सरकार सामाजिक आणि सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यासाठी ‘विनाशकारी मोहीम’ राबवित आहे, असा स्पष्ट आरोप करीत काँग्रेसने मंगळवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल

- हरीश गुप्ता, नवी दिल्लीमोदी सरकार सामाजिक आणि सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यासाठी ‘विनाशकारी मोहीम’ राबवित आहे, असा स्पष्ट आरोप करीत काँग्रेसने मंगळवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रपती भवनवर वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात मंगळवारी मार्च काढला. तेथे काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारणाऱ्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही एकाच महिन्यात तीनदा असहिष्णुतेच्या मुद्द्यावर बोलत संतापच व्यक्त केल्याचे मानले जाते. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र कुठे आहे असहिष्णुता? अशा आक्रमक भाषेत सरकारची वकिली केली.वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांवर पंतप्रधानांनी पाळलेले मौन हे त्यांच्या मूक पाठिंब्याचे निदर्शक आहे. घडणाऱ्या घटना आमच्या समाजाला विभाजित करण्याच्या सुनियोजित कटाचा भाग असून समाजाचे ध्रुवीकरण करणे आणि सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या हेतूने हे सर्व केले जात आहे,’ असे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना सांगितले. काँग्रेसच्या १२५ सदस्यीय शिष्टमंडळाने राष्ट्रपती मुखर्जी यांना निवेदन सादर केले. पूर्वग्रहदूषित, धर्मांध आणि असहिष्णू शक्तींच्या विरोधात परखड आणि कठोरपणे बोलल्याबद्दल काँग्रेसने या निवेदनात राष्ट्रपतींचे आभार मानले. सामाजिक विभाजनाला कारणीभूत घटनांना आळा घालण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी या निवेदनात आहे.देशातील जातीय सलोख्याचे वातावरण बिघडवणारी आणि असहिष्णू वातावरण निर्माण करणारी विधाने थांबविण्याबाबत सरकारने पुरेसा प्रतिसाद न दिल्यामुळे कमालीचे उद्विग्न बनलेल्या केवळ महिनाभराच्या काळात राष्ट्रपतींनी एकदा किंवा दोनदा नव्हे तर चक्क तीनदा वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता करावी ही बाब अपवादात्मकच असल्याची कबुली राष्ट्रपती भवनाच्या सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रपतींनी आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रथमच असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करीत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील जाहीरसभेत सामाजिक ऐक्याचे आवाहन केले; मात्र हा किरकोळ अपवाद वगळता सरकारकडून कोणत्याही हालचाली दिसून आल्या नाहीत. राष्ट्रपतींनी तिसऱ्यांदा चिंता व्यक्त केल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राष्ट्रपतींची भेट घेत फेसबुक पोस्टवर प्रतिक्रिया देताना स्वपक्षीयांना बेजबाबदार विधाने टाळण्याचे आवाहन केले. मोदींनी आॅक्टोबर महिन्यात मुखर्र्जींची तीनदा भेट घेतली. तरीही राष्ट्रपतींना वाढत्या असहिष्णुतेबद्दल देश व सरकारला खबरदार करणे भाग पडले आहे. राष्ट्रपतींनी अद्याप गुजरात दहशतवादविरोधी कायद्यासंबंधी अधिसूचनेवर स्वाक्षरी केलेली नाही.असहिष्णुतेबद्दल राष्ट्रपती मुखर्जी बोलले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र मौन पाळले. अशा असहिष्णुता वाढविणाऱ्या घटनांना मोदींचा छुपा पाठिंबा आहे, हे त्यांच्या या मौनावरून दिसते. - सोनिया गांधी गोमांस वादासह नुकत्याच घडलेल्या काही घटना वाईटच आहेत. पुरस्कार परत करण्याचे समर्थन करता येणार नाही. देशात सामंजस्याचे वातावरण आहे. या देशात असहिष्णुता कधीच नव्हती आणि यापुढेही राहणार नाही.- अरुण जेटली, अर्थमंत्री पुरस्कार परत करून तुम्ही सरकारचा आणि प्रेमाने तुम्हाला हा पुरस्कार देणाऱ्या लोकांचा अवमान करीत आहात. यामुळे कदाचित समस्येकडे लक्ष वेधले जाईल. पण लक्ष वेधण्याचे इतरही मार्ग आहेत.- कमल हसन, अभिनेता काही केंद्रीय मंत्री देशातील असहिष्णू विधाने करीत असल्याने राष्ट्रपतींची नाराजी लपून राहिलेली नाही. उशिरा चूप बसलेले पर्यटन आणि संस्कृती मंत्री महेश शर्मा यांच्यावर रोख आहे.