शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

न्यायालयीन लढाई काँग्रेसने जिंकली...

By admin | Updated: July 14, 2016 03:10 IST

अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यास प्रवृत्त करणारा राज्यपाल जेपी राजखोवांचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवल्यामुळे मोदी सरकारला झटका बसला, तर काँग्रेसमध्ये आनंदाचे उधाण आले

सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यास प्रवृत्त करणारा राज्यपाल जेपी राजखोवांचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवल्यामुळे मोदी सरकारला झटका बसला, तर काँग्रेसमध्ये आनंदाचे उधाण आले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही निकालाचे निमित्त साधून मोदी सरकारवर जोरदार प्रहार केले आहेत. अरुणाचलात डिसेंबर, जानेवारी महिन्यात घडलेल्या घटनाक्रमाकडे दृष्टिक्षेप टाकला, तर काँग्रेसच्या ४२ पैकी २१ आमदारांनी पक्षाच्या नेतृत्वाविरुध्द बंडखोरी केल्यामुळे ही स्थिती उद्भवली होती. बंडखोरांना हाताशी धरून राज्यात सत्ताबदल घडवण्यात भाजपाला त्यामुळे यश मिळाले. बुधवारी काँग्रेसने न्यायालयीन लढाई जिंकली. मात्र, बंडखोर आमदारांचे मन वळवून त्यांना पुन्हा स्वगृही आणण्याचे आव्हान अद्याप शिल्लक आहे. ६0 सदस्यांच्या विधानसभेत ४२ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला, अरुणाचलात आव्हान नव्हते. तथापि, मुख्यमंत्री नबाम तुकी राज्यात हुकुमशाही पद्धतीने कारभार करीत आहेत, अशी तक्रार करीत काँग्रेस आमदार कालिको पुल यांनी बंडखोरीचे निशाण फडकवले. बंडखोरीत सुरुवातीला त्यांना फक्त २१ आमदारांचा पाठिंबा मिळाला. मात्र, भाजपाच्या पाठिंब्यावर पुल यांचे सरकार सत्तेवर येताच आणखी ९ आमदारांचे समर्थन त्यांना प्राप्त झाले.न्यायालयीन निकालाने आता चित्र बदलले आहे. निकालावर समजा केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली, तर अरुणाचलातील सत्ता हाती घेण्यास काँग्रेसला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. भाजपा प्रवक्ते सिद्धार्थनाथसिंग यांनी तशी शक्यता बोलूनही दाखवली. बुधवारच्या निकालानंतर बंडखोरांचे मन वळवण्याबाबत मात्र काँग्रेस बऱ्यापैकी आश्वस्त असल्याचे जाणवते आहे. संसदेच्या मान्सून अधिवेशनातही अरुणाचलच्या लढाईचे पडसाद उमटणार आहेत. काँग्रेस खासदार कपिल सिब्बल त्या आॅडिओ टेपची चौकशी करण्याची मागणी करीत आहेत, ज्यात पंतप्रधान मोदी आणि राजनाथसिंगांचा थेट उल्लेख आहे.