शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

न्यायालयीन लढाई काँग्रेसने जिंकली...

By admin | Updated: July 14, 2016 03:10 IST

अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यास प्रवृत्त करणारा राज्यपाल जेपी राजखोवांचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवल्यामुळे मोदी सरकारला झटका बसला, तर काँग्रेसमध्ये आनंदाचे उधाण आले

सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यास प्रवृत्त करणारा राज्यपाल जेपी राजखोवांचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवल्यामुळे मोदी सरकारला झटका बसला, तर काँग्रेसमध्ये आनंदाचे उधाण आले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही निकालाचे निमित्त साधून मोदी सरकारवर जोरदार प्रहार केले आहेत. अरुणाचलात डिसेंबर, जानेवारी महिन्यात घडलेल्या घटनाक्रमाकडे दृष्टिक्षेप टाकला, तर काँग्रेसच्या ४२ पैकी २१ आमदारांनी पक्षाच्या नेतृत्वाविरुध्द बंडखोरी केल्यामुळे ही स्थिती उद्भवली होती. बंडखोरांना हाताशी धरून राज्यात सत्ताबदल घडवण्यात भाजपाला त्यामुळे यश मिळाले. बुधवारी काँग्रेसने न्यायालयीन लढाई जिंकली. मात्र, बंडखोर आमदारांचे मन वळवून त्यांना पुन्हा स्वगृही आणण्याचे आव्हान अद्याप शिल्लक आहे. ६0 सदस्यांच्या विधानसभेत ४२ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला, अरुणाचलात आव्हान नव्हते. तथापि, मुख्यमंत्री नबाम तुकी राज्यात हुकुमशाही पद्धतीने कारभार करीत आहेत, अशी तक्रार करीत काँग्रेस आमदार कालिको पुल यांनी बंडखोरीचे निशाण फडकवले. बंडखोरीत सुरुवातीला त्यांना फक्त २१ आमदारांचा पाठिंबा मिळाला. मात्र, भाजपाच्या पाठिंब्यावर पुल यांचे सरकार सत्तेवर येताच आणखी ९ आमदारांचे समर्थन त्यांना प्राप्त झाले.न्यायालयीन निकालाने आता चित्र बदलले आहे. निकालावर समजा केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली, तर अरुणाचलातील सत्ता हाती घेण्यास काँग्रेसला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. भाजपा प्रवक्ते सिद्धार्थनाथसिंग यांनी तशी शक्यता बोलूनही दाखवली. बुधवारच्या निकालानंतर बंडखोरांचे मन वळवण्याबाबत मात्र काँग्रेस बऱ्यापैकी आश्वस्त असल्याचे जाणवते आहे. संसदेच्या मान्सून अधिवेशनातही अरुणाचलच्या लढाईचे पडसाद उमटणार आहेत. काँग्रेस खासदार कपिल सिब्बल त्या आॅडिओ टेपची चौकशी करण्याची मागणी करीत आहेत, ज्यात पंतप्रधान मोदी आणि राजनाथसिंगांचा थेट उल्लेख आहे.