शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुकांत काँग्रेस मुसंडी मारेल - सोनिया गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 06:23 IST

भाजपाला येत्या निवडणुकांत पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत लवकरच धोरण निश्चित केले जाईल, असे सांगतानाच आगामी निवडणुकांत काँग्रेस आणि समविचारी पक्ष मिळूनच विजयी होतील, असा दावा यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी गुरुवारी केला.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : भाजपाला येत्या निवडणुकांत पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत लवकरच धोरण निश्चित केले जाईल, असे सांगतानाच आगामी निवडणुकांत काँग्रेस आणि समविचारी पक्ष मिळूनच विजयी होतील, असा दावा यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी गुरुवारी केला. गुजरात व राजस्थानमधील निवडणुकांतून काँग्रेसकडे लोक वळू लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही त्या म्हणाल्या.गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने लोकशाहीचे आधारस्तंभ असलेल्या संस्थाच नष्ट करण्याचे काम केले, असा आरोप करून सोनिया गांधी म्हणाल्या, संसद, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे यांच्यावरील हल्ले ही त्याची उदाहरणेच आहेत.आपल्या राजकीय विरोधकांच्या मागे तपास यंत्रणांचे शुक्लकाष्ट लावणे, त्यांना धमकावणे व आपल्या विरोधकांचा आवाज बंद करू पाहणे, हेच काम मोदी सरकार करीत आहे. धर्मनिरपेक्षा व लोकशाही यांचा गळा घोटण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न देशात सुरू आहे. शेकडो वर्षांपासूनचे आपले विविधतेत एकता हे वैशिष्ट्य व ताकद कमजोर केली जात आहे, असेही त्या म्हणाल्या.मोदी सरकार आर्थिक, कृषीविकास तसेच उद्योग व रोजगार यांबाबतमोठमोठी आश्वासने देते. पण प्रत्यक्षात परिस्थिती विपरीत आहे. शेतकरीआत्महत्या करीत आहेत, ग्रामीणअर्थव्यवस्था, लघू व मध्यम उद्योग अडचणीत आहेत, बेरोजगारी वाढत चालली आहे. नव्या नोकºया तर सोडाच, पण असलेल्यांचा रोजगारही जात आहे, काश्मीर जळत आहे, उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये दलितांवर हल्ले वाढत आहेत. पण सरकार गप्प बसून आहे, अशी टीका करून त्या म्हणाल्या की, त्यासाठी कोणाची साक्ष काढण्याची गरजच नाही. संसदेत पंतप्रधानांनी केलेले भाषणच त्याचे उदाहरण आहे.राष्टÑवादीला सोबत घेऊयेत्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम्ही राष्टÑवादीला सोबत घेऊ, शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि राष्टÑीय नेत्याला वगळून चालणार नाही. मात्र, कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालीच या निवडणुका लढविल्या जातील, अशी माहिती काँग्रेसचे नेते मोतीलाल व्होरा यांनी दिली. महाराष्टÑात भाजपा-शिवसेना सरकारविरोधी वातावरण आहे. स्वबळावर लढण्यासाठी कॉँग्रेससाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे. त्यासाठी महाराष्टÑातील कॉँग्रेसच्या नेत्यांनी अंतर्गत राजकारण विसरत सरकारच्या उणिवा आणि प्रश्न घेऊन एकजुटीने लोकांपर्यंत गेले पाहिजे.नेत्यांच्या एकजुटीचे पक्षपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राष्टÑवादीलाहीकॉँग्रेसची गरज आहे. शरद पवार हेज्येष्ठ नेते व आमचे जुने सहकारीआहेत त्यामुळे राष्टÑवादीसोबत आघाडी होईलच, असे खा. मोतीलाल व्होरायांनी सांगितले.>राहुल माझेही बॉसराहुल गांधी हेच आता आपले बॉस आहेत, असे सांगून सोनिया गांधी म्हणाल्या की, राहुल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केवळ काँग्रेसच मजबूत करू असे नव्हेतर, धर्मनिरपेक्ष मूल्यांचे रक्षणही करू.>कार्यकर्त्यांनी तयार राहावेआगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी पक्षाच्या खासदारांनी जनतेत जावे, त्यांच्याशी थेट संवाद साधावा, मोदी सरकारने आश्वासनांना कसा हरताळ फासला ते त्यांना सांगावे, असे सांगतानाच पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही गावागावांत, गल्लीबोळात जाऊ न काँग्रेसविषयी सकारात्मक वातावरण तयार करावे आणि लोकांच्या समस्या समजून घ्याव्यात, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस