शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

आगामी निवडणुकांत काँग्रेस मुसंडी मारेल - सोनिया गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 06:23 IST

भाजपाला येत्या निवडणुकांत पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत लवकरच धोरण निश्चित केले जाईल, असे सांगतानाच आगामी निवडणुकांत काँग्रेस आणि समविचारी पक्ष मिळूनच विजयी होतील, असा दावा यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी गुरुवारी केला.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : भाजपाला येत्या निवडणुकांत पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत लवकरच धोरण निश्चित केले जाईल, असे सांगतानाच आगामी निवडणुकांत काँग्रेस आणि समविचारी पक्ष मिळूनच विजयी होतील, असा दावा यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी गुरुवारी केला. गुजरात व राजस्थानमधील निवडणुकांतून काँग्रेसकडे लोक वळू लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही त्या म्हणाल्या.गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने लोकशाहीचे आधारस्तंभ असलेल्या संस्थाच नष्ट करण्याचे काम केले, असा आरोप करून सोनिया गांधी म्हणाल्या, संसद, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे यांच्यावरील हल्ले ही त्याची उदाहरणेच आहेत.आपल्या राजकीय विरोधकांच्या मागे तपास यंत्रणांचे शुक्लकाष्ट लावणे, त्यांना धमकावणे व आपल्या विरोधकांचा आवाज बंद करू पाहणे, हेच काम मोदी सरकार करीत आहे. धर्मनिरपेक्षा व लोकशाही यांचा गळा घोटण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न देशात सुरू आहे. शेकडो वर्षांपासूनचे आपले विविधतेत एकता हे वैशिष्ट्य व ताकद कमजोर केली जात आहे, असेही त्या म्हणाल्या.मोदी सरकार आर्थिक, कृषीविकास तसेच उद्योग व रोजगार यांबाबतमोठमोठी आश्वासने देते. पण प्रत्यक्षात परिस्थिती विपरीत आहे. शेतकरीआत्महत्या करीत आहेत, ग्रामीणअर्थव्यवस्था, लघू व मध्यम उद्योग अडचणीत आहेत, बेरोजगारी वाढत चालली आहे. नव्या नोकºया तर सोडाच, पण असलेल्यांचा रोजगारही जात आहे, काश्मीर जळत आहे, उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये दलितांवर हल्ले वाढत आहेत. पण सरकार गप्प बसून आहे, अशी टीका करून त्या म्हणाल्या की, त्यासाठी कोणाची साक्ष काढण्याची गरजच नाही. संसदेत पंतप्रधानांनी केलेले भाषणच त्याचे उदाहरण आहे.राष्टÑवादीला सोबत घेऊयेत्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम्ही राष्टÑवादीला सोबत घेऊ, शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि राष्टÑीय नेत्याला वगळून चालणार नाही. मात्र, कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालीच या निवडणुका लढविल्या जातील, अशी माहिती काँग्रेसचे नेते मोतीलाल व्होरा यांनी दिली. महाराष्टÑात भाजपा-शिवसेना सरकारविरोधी वातावरण आहे. स्वबळावर लढण्यासाठी कॉँग्रेससाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे. त्यासाठी महाराष्टÑातील कॉँग्रेसच्या नेत्यांनी अंतर्गत राजकारण विसरत सरकारच्या उणिवा आणि प्रश्न घेऊन एकजुटीने लोकांपर्यंत गेले पाहिजे.नेत्यांच्या एकजुटीचे पक्षपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राष्टÑवादीलाहीकॉँग्रेसची गरज आहे. शरद पवार हेज्येष्ठ नेते व आमचे जुने सहकारीआहेत त्यामुळे राष्टÑवादीसोबत आघाडी होईलच, असे खा. मोतीलाल व्होरायांनी सांगितले.>राहुल माझेही बॉसराहुल गांधी हेच आता आपले बॉस आहेत, असे सांगून सोनिया गांधी म्हणाल्या की, राहुल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केवळ काँग्रेसच मजबूत करू असे नव्हेतर, धर्मनिरपेक्ष मूल्यांचे रक्षणही करू.>कार्यकर्त्यांनी तयार राहावेआगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी पक्षाच्या खासदारांनी जनतेत जावे, त्यांच्याशी थेट संवाद साधावा, मोदी सरकारने आश्वासनांना कसा हरताळ फासला ते त्यांना सांगावे, असे सांगतानाच पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही गावागावांत, गल्लीबोळात जाऊ न काँग्रेसविषयी सकारात्मक वातावरण तयार करावे आणि लोकांच्या समस्या समजून घ्याव्यात, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस