शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

आगामी निवडणुकांत काँग्रेस मुसंडी मारेल - सोनिया गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 06:23 IST

भाजपाला येत्या निवडणुकांत पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत लवकरच धोरण निश्चित केले जाईल, असे सांगतानाच आगामी निवडणुकांत काँग्रेस आणि समविचारी पक्ष मिळूनच विजयी होतील, असा दावा यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी गुरुवारी केला.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : भाजपाला येत्या निवडणुकांत पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत लवकरच धोरण निश्चित केले जाईल, असे सांगतानाच आगामी निवडणुकांत काँग्रेस आणि समविचारी पक्ष मिळूनच विजयी होतील, असा दावा यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी गुरुवारी केला. गुजरात व राजस्थानमधील निवडणुकांतून काँग्रेसकडे लोक वळू लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही त्या म्हणाल्या.गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने लोकशाहीचे आधारस्तंभ असलेल्या संस्थाच नष्ट करण्याचे काम केले, असा आरोप करून सोनिया गांधी म्हणाल्या, संसद, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे यांच्यावरील हल्ले ही त्याची उदाहरणेच आहेत.आपल्या राजकीय विरोधकांच्या मागे तपास यंत्रणांचे शुक्लकाष्ट लावणे, त्यांना धमकावणे व आपल्या विरोधकांचा आवाज बंद करू पाहणे, हेच काम मोदी सरकार करीत आहे. धर्मनिरपेक्षा व लोकशाही यांचा गळा घोटण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न देशात सुरू आहे. शेकडो वर्षांपासूनचे आपले विविधतेत एकता हे वैशिष्ट्य व ताकद कमजोर केली जात आहे, असेही त्या म्हणाल्या.मोदी सरकार आर्थिक, कृषीविकास तसेच उद्योग व रोजगार यांबाबतमोठमोठी आश्वासने देते. पण प्रत्यक्षात परिस्थिती विपरीत आहे. शेतकरीआत्महत्या करीत आहेत, ग्रामीणअर्थव्यवस्था, लघू व मध्यम उद्योग अडचणीत आहेत, बेरोजगारी वाढत चालली आहे. नव्या नोकºया तर सोडाच, पण असलेल्यांचा रोजगारही जात आहे, काश्मीर जळत आहे, उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये दलितांवर हल्ले वाढत आहेत. पण सरकार गप्प बसून आहे, अशी टीका करून त्या म्हणाल्या की, त्यासाठी कोणाची साक्ष काढण्याची गरजच नाही. संसदेत पंतप्रधानांनी केलेले भाषणच त्याचे उदाहरण आहे.राष्टÑवादीला सोबत घेऊयेत्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम्ही राष्टÑवादीला सोबत घेऊ, शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि राष्टÑीय नेत्याला वगळून चालणार नाही. मात्र, कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालीच या निवडणुका लढविल्या जातील, अशी माहिती काँग्रेसचे नेते मोतीलाल व्होरा यांनी दिली. महाराष्टÑात भाजपा-शिवसेना सरकारविरोधी वातावरण आहे. स्वबळावर लढण्यासाठी कॉँग्रेससाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे. त्यासाठी महाराष्टÑातील कॉँग्रेसच्या नेत्यांनी अंतर्गत राजकारण विसरत सरकारच्या उणिवा आणि प्रश्न घेऊन एकजुटीने लोकांपर्यंत गेले पाहिजे.नेत्यांच्या एकजुटीचे पक्षपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राष्टÑवादीलाहीकॉँग्रेसची गरज आहे. शरद पवार हेज्येष्ठ नेते व आमचे जुने सहकारीआहेत त्यामुळे राष्टÑवादीसोबत आघाडी होईलच, असे खा. मोतीलाल व्होरायांनी सांगितले.>राहुल माझेही बॉसराहुल गांधी हेच आता आपले बॉस आहेत, असे सांगून सोनिया गांधी म्हणाल्या की, राहुल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केवळ काँग्रेसच मजबूत करू असे नव्हेतर, धर्मनिरपेक्ष मूल्यांचे रक्षणही करू.>कार्यकर्त्यांनी तयार राहावेआगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी पक्षाच्या खासदारांनी जनतेत जावे, त्यांच्याशी थेट संवाद साधावा, मोदी सरकारने आश्वासनांना कसा हरताळ फासला ते त्यांना सांगावे, असे सांगतानाच पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही गावागावांत, गल्लीबोळात जाऊ न काँग्रेसविषयी सकारात्मक वातावरण तयार करावे आणि लोकांच्या समस्या समजून घ्याव्यात, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस