शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडमध्ये काँग्रेसच

By admin | Updated: May 11, 2016 04:27 IST

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षा काँग्रेसचे हरीश रावत यांच्या नेतृत्वातील सरकारने जिंकली असून, केंद्रातील मोदी सरकारला ही जोरदार चपराक असल्याचे मानले जाते

डेहराडून : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षा काँग्रेसचे हरीश रावत यांच्या नेतृत्वातील सरकारने जिंकली असून, केंद्रातील मोदी सरकारला ही जोरदार चपराक असल्याचे मानले जाते. मात्र विधानसभेच्या कामकाजासंबंधीचा गोपनीय अहवाल सादर झाल्यानंतर बुधवारी सर्वोच्च न्यायालय निकालाची अधिकृत घोषणा करणार आहे.निकाल अधिकृतपणे जाहीर झाला नसला तरी हरीश रावत यांच्या बाजूने ३३ तर भाजपाच्या बाजूने २८ मते मिळाली. मतदानाच्या आधी काँग्रेसच्या रेखा आर्य भाजपाच्या गटात दाखल झाल्या, तर भाजपाने निलंबित केलेले बंडखोर आ. भीमलाल आर्य काँग्रेसच्या कळपात गेले. बसपा तसेच अन्य चार सदस्यांनी रावत यांच्या बाजूनेच मतदान केले. काँग्रेसचे २७ व हे ६ मिळून ३३ हा जादुई आकडा मिळवण्यात रावत सरकार यशस्वी ठरले.उत्तराखंड विधानसभेत सकाळी ११ वाजता शक्तिपरीक्षेसाठीचे कामकाज सुरू झाले आणि दीड तासात ते संपले. या काळात विधान भवनासमोर काँग्रेस व भाजपाचे कार्यकर्ते तसेच पत्रकार, छायाचित्रकार आणि कॅमेरामनची प्रचंड गर्दी झाली होती. आतमध्ये आमदार, विधान भवन कर्मचारी व अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि प्रधान सचिव व त्यांचे कर्मचारी यांच्याखेरीज कोणालाही प्रवेश नव्हता. विधान भवनात मोबाइल नेण्यावरही बंदी घालण्यात आली होती.>कडक बंदोबस्तात असे झाले मतदान..!सरकारच्या बाजूने एकूण ३३ मते. काँग्रेस-२७, पीडीएफ-६ (त्यात बसपाचे २, यूकेडी-१ आणि ३ अपक्ष आमदारांचा समावेश), भाजपा-२८, भाजपाचे भीमलाल आर्य आणि काँग्रेसच्या रेखा आर्य यांनी क्रॉसव्होटिंग केल्याचा दावा काँग्रेसच्या आमदार सरिता आर्य यांनी केला आहे. संपूर्ण विधान भवनाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. चोख सुरक्षा बंदोबस्तात मतदान सुमारे तासभर चालले. पत्रकार, विधिमंडळ कर्मचाऱ्यांनाही आतमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. मतदानासाठी अवघ्या दोन तासांपुरती राष्ट्रपती राजवट हटविण्यात आली होती.>लोकशाही, जनतेचा विजय - काँग्रेसहा लोकशाही, देशाचे संविधान आणि राज्यातील जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली आहे. शक्तिपरीक्षा अतिशय शिस्तबद्ध, शांत आणि घटनात्मक पद्धतीने पार पडली आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालय काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा निर्णय देईल तेव्हा या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय ‘सत्तेची मगरुरी’ असल्याचे सिद्ध होईल, असेही ते म्हणाले.>उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षेच्या निष्पत्तीबाबत भाष्य टाळत रावत यांनी केंद्र सरकारला संघर्षाचे राजकारण संपवून राज्याच्या विकासासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. ६८ वर्षीय रावत यांनी शक्तिपरीक्षा आटोपताच प्रदेश कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि प्रत्येक आमदाराचा नामोल्लेख करीत आभार मानले.