शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

उत्तराखंडमध्ये काँग्रेसच

By admin | Updated: May 11, 2016 04:27 IST

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षा काँग्रेसचे हरीश रावत यांच्या नेतृत्वातील सरकारने जिंकली असून, केंद्रातील मोदी सरकारला ही जोरदार चपराक असल्याचे मानले जाते

डेहराडून : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षा काँग्रेसचे हरीश रावत यांच्या नेतृत्वातील सरकारने जिंकली असून, केंद्रातील मोदी सरकारला ही जोरदार चपराक असल्याचे मानले जाते. मात्र विधानसभेच्या कामकाजासंबंधीचा गोपनीय अहवाल सादर झाल्यानंतर बुधवारी सर्वोच्च न्यायालय निकालाची अधिकृत घोषणा करणार आहे.निकाल अधिकृतपणे जाहीर झाला नसला तरी हरीश रावत यांच्या बाजूने ३३ तर भाजपाच्या बाजूने २८ मते मिळाली. मतदानाच्या आधी काँग्रेसच्या रेखा आर्य भाजपाच्या गटात दाखल झाल्या, तर भाजपाने निलंबित केलेले बंडखोर आ. भीमलाल आर्य काँग्रेसच्या कळपात गेले. बसपा तसेच अन्य चार सदस्यांनी रावत यांच्या बाजूनेच मतदान केले. काँग्रेसचे २७ व हे ६ मिळून ३३ हा जादुई आकडा मिळवण्यात रावत सरकार यशस्वी ठरले.उत्तराखंड विधानसभेत सकाळी ११ वाजता शक्तिपरीक्षेसाठीचे कामकाज सुरू झाले आणि दीड तासात ते संपले. या काळात विधान भवनासमोर काँग्रेस व भाजपाचे कार्यकर्ते तसेच पत्रकार, छायाचित्रकार आणि कॅमेरामनची प्रचंड गर्दी झाली होती. आतमध्ये आमदार, विधान भवन कर्मचारी व अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि प्रधान सचिव व त्यांचे कर्मचारी यांच्याखेरीज कोणालाही प्रवेश नव्हता. विधान भवनात मोबाइल नेण्यावरही बंदी घालण्यात आली होती.>कडक बंदोबस्तात असे झाले मतदान..!सरकारच्या बाजूने एकूण ३३ मते. काँग्रेस-२७, पीडीएफ-६ (त्यात बसपाचे २, यूकेडी-१ आणि ३ अपक्ष आमदारांचा समावेश), भाजपा-२८, भाजपाचे भीमलाल आर्य आणि काँग्रेसच्या रेखा आर्य यांनी क्रॉसव्होटिंग केल्याचा दावा काँग्रेसच्या आमदार सरिता आर्य यांनी केला आहे. संपूर्ण विधान भवनाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. चोख सुरक्षा बंदोबस्तात मतदान सुमारे तासभर चालले. पत्रकार, विधिमंडळ कर्मचाऱ्यांनाही आतमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. मतदानासाठी अवघ्या दोन तासांपुरती राष्ट्रपती राजवट हटविण्यात आली होती.>लोकशाही, जनतेचा विजय - काँग्रेसहा लोकशाही, देशाचे संविधान आणि राज्यातील जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली आहे. शक्तिपरीक्षा अतिशय शिस्तबद्ध, शांत आणि घटनात्मक पद्धतीने पार पडली आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालय काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा निर्णय देईल तेव्हा या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय ‘सत्तेची मगरुरी’ असल्याचे सिद्ध होईल, असेही ते म्हणाले.>उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षेच्या निष्पत्तीबाबत भाष्य टाळत रावत यांनी केंद्र सरकारला संघर्षाचे राजकारण संपवून राज्याच्या विकासासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. ६८ वर्षीय रावत यांनी शक्तिपरीक्षा आटोपताच प्रदेश कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि प्रत्येक आमदाराचा नामोल्लेख करीत आभार मानले.