शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाबाबत काँग्रेस आक्रमक

By admin | Updated: April 2, 2015 04:50 IST

राज्यसभेत कुठल्याही स्थितीत भूसंपादन विधेयक पारित होऊ देणार नाही, या काँग्रेसच्या घोषणेनंतर भूसंपादनाच्या मुद्यावर काँग्रेस व सरकारमध्ये आरपारची लढाई छेडली

शीलेश शर्मा, नवी दिल्ली राज्यसभेत कुठल्याही स्थितीत भूसंपादन विधेयक पारित होऊ देणार नाही, या काँग्रेसच्या घोषणेनंतर भूसंपादनाच्या मुद्यावर काँग्रेस व सरकारमध्ये आरपारची लढाई छेडली असतानाच, या मुद्यावर एकजूट झालेल्या विरोधकांना शह देण्यासाठी सरकारही सज्ज झाले आहे. यासाठी लहान पक्षांना गळाला लावण्याचे प्रयत्न सरकारने चालवले आहे. दरम्यान लहान पक्षांना आपल्या बाजूला ओढण्याच्या सरकारच्या या प्रयत्नांमुळे काँग्रेस कमालीची सावध झाली आहे. त्यामुळे सरकारच्या प्रस्तावित विधेयकाला विरोध करणाऱ्या पक्षांशी सुरू असलेला संवाद काँग्रेसने वाढवला आहे. दुसरीकडे काँग्रेसश्रेष्ठी सोनिया गांधी यांच्यापाठोपाठ खासदार जयराम रमेश यांनीही नितीन गडकरी यांना पत्र लिहून भूसंपादन विधेयकाबाबतचे सरकारचे दावे खोटे ठरवले आहेत. भूसंपादन विधेयकावरील काँगे्रसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे वेंकय्या नायडू आणि गडकरी यांना रमेश यांनी जशास-तसे प्रत्युत्तर दिले आहे. वादग्रस्त भूसंपादन विधेयकाला असलेल्या विरोधाची पाच कारणेही त्यांनी दिली आहे. यात शेतकऱ्यांच्या परवानगीचा प्रश्न, सामाजिक मूल्यांकन, जमीन परताव्याची तरतूद नसणे, औद्योगिक कॉरिडोरच्या सीमेबाहेर खासगी क्षेत्रात देणे आणि भू-प्रभारी यासारख्या कारणांचा समावेश आहे.राज्यसभेत सरकार अल्पमतात आहे. लोकसभेत पारित नऊ दुरुस्त्यांसह मंत्रिमंडळाने मान्यता दिलेला भूसंपादनवरील नवा वटहुकूमही काँग्रेसला मान्य नाही. बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, सपा, जनता दल(युनायटेड) हेच नाही शिवसेनेचाही यास विरोध आहे. त्यामुळेच सरकार राज्यसभेत हे विधेयक पारित करूच शकणार नाही, असा दावा रमेश यांनी आपल्या पत्रात केला आहे.