शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

भूसंपादनाबाबत काँग्रेस आक्रमक

By admin | Updated: April 2, 2015 04:50 IST

राज्यसभेत कुठल्याही स्थितीत भूसंपादन विधेयक पारित होऊ देणार नाही, या काँग्रेसच्या घोषणेनंतर भूसंपादनाच्या मुद्यावर काँग्रेस व सरकारमध्ये आरपारची लढाई छेडली

शीलेश शर्मा, नवी दिल्ली राज्यसभेत कुठल्याही स्थितीत भूसंपादन विधेयक पारित होऊ देणार नाही, या काँग्रेसच्या घोषणेनंतर भूसंपादनाच्या मुद्यावर काँग्रेस व सरकारमध्ये आरपारची लढाई छेडली असतानाच, या मुद्यावर एकजूट झालेल्या विरोधकांना शह देण्यासाठी सरकारही सज्ज झाले आहे. यासाठी लहान पक्षांना गळाला लावण्याचे प्रयत्न सरकारने चालवले आहे. दरम्यान लहान पक्षांना आपल्या बाजूला ओढण्याच्या सरकारच्या या प्रयत्नांमुळे काँग्रेस कमालीची सावध झाली आहे. त्यामुळे सरकारच्या प्रस्तावित विधेयकाला विरोध करणाऱ्या पक्षांशी सुरू असलेला संवाद काँग्रेसने वाढवला आहे. दुसरीकडे काँग्रेसश्रेष्ठी सोनिया गांधी यांच्यापाठोपाठ खासदार जयराम रमेश यांनीही नितीन गडकरी यांना पत्र लिहून भूसंपादन विधेयकाबाबतचे सरकारचे दावे खोटे ठरवले आहेत. भूसंपादन विधेयकावरील काँगे्रसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे वेंकय्या नायडू आणि गडकरी यांना रमेश यांनी जशास-तसे प्रत्युत्तर दिले आहे. वादग्रस्त भूसंपादन विधेयकाला असलेल्या विरोधाची पाच कारणेही त्यांनी दिली आहे. यात शेतकऱ्यांच्या परवानगीचा प्रश्न, सामाजिक मूल्यांकन, जमीन परताव्याची तरतूद नसणे, औद्योगिक कॉरिडोरच्या सीमेबाहेर खासगी क्षेत्रात देणे आणि भू-प्रभारी यासारख्या कारणांचा समावेश आहे.राज्यसभेत सरकार अल्पमतात आहे. लोकसभेत पारित नऊ दुरुस्त्यांसह मंत्रिमंडळाने मान्यता दिलेला भूसंपादनवरील नवा वटहुकूमही काँग्रेसला मान्य नाही. बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, सपा, जनता दल(युनायटेड) हेच नाही शिवसेनेचाही यास विरोध आहे. त्यामुळेच सरकार राज्यसभेत हे विधेयक पारित करूच शकणार नाही, असा दावा रमेश यांनी आपल्या पत्रात केला आहे.