शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

संवादातून मिटावेत वाद

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

माधवी वैद्य : संमेलन कार्यालयाचे पिंपरीत उद्घाटन

माधवी वैद्य : संमेलन कार्यालयाचे पिंपरीत उद्घाटन
पिंपरी : मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी कॉर्पोरेट जगताशी आणि आधुनिकतेशी सांगड घालण्याची गरज आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी पिंपरीत शुक्रवारी व्यक्त केले. महाराष्ट्रीय लोकांना वाद घालण्याची सवय आहे. संमेलनात वाद व्हावेत. मात्र, संवादातून वाद मिटावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठास ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे. संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. वैद्य बोलत होत्या. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, साहित्य महामंडळाचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, उपाध्यक्ष भालचंद्र शिंदे, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, विद्यापीठ सोसायटीचे सदस्य सोमनाथ पाटील, सचिन व्हटकर, मसाप पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे, देहूगाव शाखचे अध्यक्ष दत्तात्रय अत्रे आदी उपस्थित होते.
डॉ. वैद्य म्हणाल्या, 'स्वप्ने पाहण्याची आणि ती शंभर टक्के पूर्ण करण्याची क्षमता डॉ. पाटील यांच्यात आहे. मराठीला ज्ञानभाषा होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत आणि हे स्वप्न आता पूर्णत्वास जात असल्याचे पिंपरीत होणार्‍या संमेलनावरून दिसून येत आहे. घरातील तोरणावरून घरातील संस्कार कळतात. येथील संमेलनाचे कार्यालय पाहिले की, येथील संमेलन देखणे होणार, याची कल्पना येते. संमेलन फलदायी होण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जात आहेत.'
डॉ. मोरे म्हणाले, 'माझा घुमान आणि पिंपरी-चिंचवड अशा दोन्ही संमेलनांशी संबंध येणार आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. श्रीक्षेत्र देहू आणि आळंदी या दोन्ही गावांनी महाराष्ट्राची संस्कृती घडविली आहे. या भूमीला वेगळे भारलेपण आहे. अशा संतभूमी आणि यंत्रभूमीत संमेलन भरविण्याची संधी शिक्षणाची सेवा करणार्‍या विद्यापीठास मिळाली आहे.' (प्रतिनिधी)