शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

मेशी परिसरात पर्जन्यमान घटल्याने चिंता

By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST

डाळींबबागा नामशेष होण्याच्या मार्गावर; बळीराजा संकटात

डाळींबबागा नामशेष होण्याच्या मार्गावर; बळीराजा संकटात

मेशी (एकनाथ सावळा) : मेशीसह परिसरात गेल्या तीन वर्षांपासून पर्जन्यमान घटत असून, निसर्गाच्या लहरीपणामुळे व बिघडलेल्या हवामानाचा फटका बसत असल्यामुळे परिसरातील डाळींबबागा नामशेष झाल्या आहेत. ज्या शेतकर्‍यांनी बागा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याही शेवटच्या घटका मोजत आहेत.
एकेकाळी नगदी पीक म्हणून डाळींबबागांकडे पाहिले जायचे; मात्र घटते पर्जन्यमान, बिघडलेले हवामान व अफाट खर्च करूनही पदरी निराशाच देत असल्यामुळे शेतकर्‍यांनी डाळींबबागा काढून टाकणे पसंत केले. कारण महागडी औषधे फवारणी करूनही रोगराई आटोक्यात येत नाही अन् आलीच तर ऐनक्षणी निसर्गाचा लहरीपणा आडवा येतो अन् डाळींबबागा उद्ध्वस्त करतो. या भागात कांदा पिकविणेही कठीण झाले आहे. अशावेळी डाळिंबासारखे नाजूक पीक घेणे अधिकच कठीण होते. एकेकाळी या परिसरात डाळींबबागांचे मोठे पेव आले होते. परंतु आता क्वचितच बागा दिसत आहेत. बाजारभावही स्थिर नसतो. सध्या बारमाही हवामान खराब असते. ऋतुमानात समतोल राहिलेला नाही. कधी धुके, बेमोसमी पाऊस, गारपीट, ढगाळ हवामान हे नेहमीचेच पाचविला पुजलेले आहे. त्यामुळे बळीराजा कमालीचा धास्तावलेला आहे. यावर्षी रब्बी हंगामातील सर्वच पिकांचे उत्पादन घटणार आहे. गहू, हरभरा, कांदा अगदीच नगण्य स्वरूपात पिकणार आहे. अन्नधान्यातील रब्बी हंगामातील गहू हे पीकसुद्धा दुर्मीळ झाले आहे. अत्यल्प पाऊस, रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती, निसर्गाचा लहरीपणा, बाजारभावातील चढउतार यामुळे शेती करणे शेतकर्‍यांना अवघड झाले आहे. पुन्हा एकदा चांगला पाऊसपाणी होऊ दे, निरोगी वातावरण राहू दे व बळीराजा सुखी होऊ दे, अशी आर्त प्रार्थना सगळीकडे केली जात आहे.