शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

पूर्णेच्या हिरव्या पाण्यासाठी दोषींची पोलिस तक्रार करा! जलव्यवस्थापन समितीने घेतला ठराव

By admin | Updated: May 7, 2014 22:17 IST

पूर्णा नदीच्या पात्रात हिरवे दूषित पाणी सोडणार्‍या कंपन्या आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांविरुद्ध पोलिस तक्रार करण्याचा ठराव

अकोला : जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात हिरवे दूषित पाणी सोडणार्‍या कंपन्या आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांविरुद्ध पोलिस तक्रार करण्याचा ठराव जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. नदीतून १३ गावांना पाणीपुरवठा होतो. दूषित पाण्यामुळे त्यापैकी तीन गावांना टँकरने पाणी पुरविण्याची वेळ आली आहे. पूर्णा नदीतील पाणी हिरवे होण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील कंपन्या कारणीभूत असल्याचे आढळून आले. त्यामुळे दोषी कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी वारंवार प्रशासनाकडे केली आहे. त्या दृष्टिकोनातून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये उपस्थित राहण्यासाठी तीन वेळा पत्रही दिले. असे असतानाही अधिकारी सभेकडे फिरकले नाहीत. त्यामुळे आता या अधिकार्‍यांसोबत पाणी दूषित करण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या अमरावतीच्या चार कंपन्यांविरुद्ध पोलिस तक्रार करण्याचा ठरावच मंगळवारी जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हा प्रस्ताव गोपाल कोल्हे यांनी मांडला होता. या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि समिती सदस्यांची उपस्थिती होती.