शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

तेजस्वी यादवकडून पठाणकोट हल्ला व गयातल्या रस्त्यावरील हल्ल्याची तुलना

By admin | Updated: May 12, 2016 00:10 IST

हरियाणातील दंगल आणि पठाणकोट हल्ला हेसुद्धा जंगलराजच असल्याचं म्हणत भाजपवर पलटवार केला

ऑनलाइन लोकमत

पटना, दि. 11- बिहार सरकार गयामध्ये रस्त्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकारामुळे सर्वांच्या टीकेचं लक्ष्य झालं आहे. या प्रकारानंतर बिहारमध्ये जंगलराज परत आल्याची भाजपकडून जोरदार टीका झाली होती. त्याला आज बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालूंचे चिरंजीव तेजस्वी यादवनं प्रत्युत्तर दिलं आहे. पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तुलना गयामध्ये रस्त्यावर झालेल्या हल्ल्याशी करून त्याने मोदींवर शरसंधान केलं आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, गयामध्ये भररस्त्यात गोळ्या घालून झालेल्या हत्येमुळे भाजपनं बिहारमध्ये जंगलराज आल्याचं म्हटलं होतं. त्यावर तेजस्वीनं म्हटलं आहे की, गयामध्ये रस्त्यावर वादातून झालेल्या हत्येमुळे जंगलराज आल्याचं तुम्ही म्हणत असाल तर जानेवारीमध्ये पठाणकोट एअरबेसमध्ये झालेला हल्लाही अशाच प्रकारचा होता. ज्यामध्ये सेनेचे सात जवान शहीद झाले होते. दहशतवादी भारतातल्या सर्वात सुरक्षित एअरबेसवर हल्ला करून शकतात, तर तो जंगलराज नाही का, असं तेजस्वी यादवनं म्हटलं आहे. हरियाणातील दंगल आणि पठाणकोट हल्ला हेसुद्धा जंगलराजच असल्याचं म्हणत भाजपवर पलटवार केला आहे. गेल्याच आठवड्यात जेडीयूची आमदार मनोरमा देवींच्या मुलगा रॉकीनं ओव्हरटेक केल्यानं भररस्त्यात एका 20 वर्षांच्या मुलाची हत्या केली होती.