शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

शासनाच्या निष्क्रीयतेचा पंचनामा करण्यासाठी एकत्र या! राष्ट्रवादी कॉँग्रेसची बैठक : पक्षाचे निरीक्षक आसिफ शेख यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन

By admin | Updated: March 5, 2016 23:49 IST

जळगाव : दुष्काळ, पाणीटंचाईमुळे शेतकरी बांधव, सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. असे असतानाही शासनाकडून कोणतेही ठोस प्रयत्न केले जात नाही. शासनाच्या निष्क्रीयतेमुळेच सर्वत्र बिकट स्थिती ओढावली आहे. आगामी काळात राष्ट्रवादी कॉँग्रेस शासनाच्या विरोधात कठोर भूमिका घेणार आहे. शासनाच्या निष्क्रीयतेचा पंचनामा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन मीरा-भाईंदर महापालिकेचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पक्ष निरीक्षक डॉ.आसिफ शेख यांनी केले.

जळगाव : दुष्काळ, पाणीटंचाईमुळे शेतकरी बांधव, सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. असे असतानाही शासनाकडून कोणतेही ठोस प्रयत्न केले जात नाही. शासनाच्या निष्क्रीयतेमुळेच सर्वत्र बिकट स्थिती ओढावली आहे. आगामी काळात राष्ट्रवादी कॉँग्रेस शासनाच्या विरोधात कठोर भूमिका घेणार आहे. शासनाच्या निष्क्रीयतेचा पंचनामा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन मीरा-भाईंदर महापालिकेचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पक्ष निरीक्षक डॉ.आसिफ शेख यांनी केले.
जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट तसेच पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी डॉ.आसिफ शेख जळगावात आले होते. दुपारी तीन वाजता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यालयात जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
डॉ.शेख पुढे म्हणाले की, केंद्रासह राज्यात सध्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सत्ताधार्‍यांविरोधात प्रचंड खद्खद् आहे. हेच वातावरण आपल्यासाठी पोषक आहे. शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेस तीव्र स्वरुपाची आंदोलने छेडणार आहे. लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडी-अडचणी समजून घ्या, त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करा, लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
विकासात्मक दृष्टिकोनातून खाविआला पाठिंबा
जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने खान्देश विकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. जळगाव शहराचा विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात विकासकामे झाली पाहिजेत, जळगावचा विकास साधला जावा, हा एकमेव उद्देश त्यामागे असल्याचे डॉ.आसिफ शेख म्हणाले.
पक्षात कोणतेही मतभेद नाहीत
मध्यंतरी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने पक्ष टीकेचा धनी ठरला होता. परंतु पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीने हे मतभेद दूर करण्यात आले. प्रत्येक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतात. मतभेद असण्यात काही गैर नाही; परंतु मनभेद असता कामा नये. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे मनभेद नाहीत. म्हणून जिल्‘ासह राज्यात राष्ट्रवादीचे पक्षसंघटन अतिशय मजबूत आहे. आगामी काळात येणार्‍या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागावे, असे आवाहन शेख यांनी केले.