शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

युतीचे सरकार शेतकरी, गरिबांचे समर्थक - मोदी

By admin | Updated: April 20, 2015 03:32 IST

रालोआ सरकार गरीब आणि शेतकरी समर्थक असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिली. सरकारची धोरणे कॉर्पोरेटधार्जिणी असल्याचा आरोप खोडून काढताना त्यांनी विरोधकांना भाजपवर टीका करण्याची

नवी दिल्ली : रालोआ सरकार गरीब आणि शेतकरी समर्थक असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिली. सरकारची धोरणे कॉर्पोरेटधार्जिणी असल्याचा आरोप खोडून काढताना त्यांनी विरोधकांना भाजपवर टीका करण्याची जन्मजात सवयच असल्याचा टोलाही हाणला.एकीकडे राहुल गांधी शेतकऱ्यांच्या रॅलीला संबोधित असताना दुसरीकडे मोदींनी पक्षखासदारांची कार्यशाळा बोलावली होती. मात्र भूसंपादन विधेयकाविरुद्ध काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘किसान रॅली’चा कुठलाही संदर्भ न देता त्यांनी सरकारने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयांचा उल्लेख केला. शेतीचे ५० टक्के नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय बदलवत आता केवळ ३३ टक्क्यांचा निकष लावण्यात आला आहे. या महिन्याच्या प्रारंभी बेंगळुरू येथील राष्ट्रीय अधिवेशनात दिलेले भाषण मीडियातील काही घटकांनी चुकीच्या पद्धतीने समोर आणले. त्यामागे काही दूषित विचार करणारे लोक आहेत, असा भूसंपादन विधेयकाचा अप्रत्यक्ष संदर्भही त्यांनी दिला. माझ्या हृदयाजवळ केवळ गरिबांचे कल्याण हीच बाब आहे. पक्षाचे खासदार आणि कार्यकर्त्यांनी जनतेकडे जाऊन याआधीचे संपुआ सरकार आणि विद्यमान रालोआ सरकारने गरिबांसाठी केलेल्या कार्यातील फरक स्पष्ट करावा, असे आवाहनही त्यांनी केले. गरिबांकडे रुपयापैकी केवळ १५ पैसे पोहोचतात, असे विधान माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी केले होते. त्याचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, तुम्हाला केवळ विश्लेषण करायचे नाही. आजारावर इलाज करायचा आहे. सोमवारपासून संसद अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरू होत असताना त्यांनी खासदारांच्या या बैठकीत मोदी सरकारने १० महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या योजना अधोरेखित केल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)