शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

युतीचे सरकार शेतकरी, गरिबांचे समर्थक - मोदी

By admin | Updated: April 20, 2015 03:32 IST

रालोआ सरकार गरीब आणि शेतकरी समर्थक असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिली. सरकारची धोरणे कॉर्पोरेटधार्जिणी असल्याचा आरोप खोडून काढताना त्यांनी विरोधकांना भाजपवर टीका करण्याची

नवी दिल्ली : रालोआ सरकार गरीब आणि शेतकरी समर्थक असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिली. सरकारची धोरणे कॉर्पोरेटधार्जिणी असल्याचा आरोप खोडून काढताना त्यांनी विरोधकांना भाजपवर टीका करण्याची जन्मजात सवयच असल्याचा टोलाही हाणला.एकीकडे राहुल गांधी शेतकऱ्यांच्या रॅलीला संबोधित असताना दुसरीकडे मोदींनी पक्षखासदारांची कार्यशाळा बोलावली होती. मात्र भूसंपादन विधेयकाविरुद्ध काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘किसान रॅली’चा कुठलाही संदर्भ न देता त्यांनी सरकारने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयांचा उल्लेख केला. शेतीचे ५० टक्के नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय बदलवत आता केवळ ३३ टक्क्यांचा निकष लावण्यात आला आहे. या महिन्याच्या प्रारंभी बेंगळुरू येथील राष्ट्रीय अधिवेशनात दिलेले भाषण मीडियातील काही घटकांनी चुकीच्या पद्धतीने समोर आणले. त्यामागे काही दूषित विचार करणारे लोक आहेत, असा भूसंपादन विधेयकाचा अप्रत्यक्ष संदर्भही त्यांनी दिला. माझ्या हृदयाजवळ केवळ गरिबांचे कल्याण हीच बाब आहे. पक्षाचे खासदार आणि कार्यकर्त्यांनी जनतेकडे जाऊन याआधीचे संपुआ सरकार आणि विद्यमान रालोआ सरकारने गरिबांसाठी केलेल्या कार्यातील फरक स्पष्ट करावा, असे आवाहनही त्यांनी केले. गरिबांकडे रुपयापैकी केवळ १५ पैसे पोहोचतात, असे विधान माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी केले होते. त्याचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, तुम्हाला केवळ विश्लेषण करायचे नाही. आजारावर इलाज करायचा आहे. सोमवारपासून संसद अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरू होत असताना त्यांनी खासदारांच्या या बैठकीत मोदी सरकारने १० महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या योजना अधोरेखित केल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)