शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

क्लस्टरचा फायदा धोकादायक इमारतींना अशक्य संजीव जयस्वाल - घूमजाव करून जाहीर दिलगिरी व्यक्त

By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST

ठाणे : क्लस्टर योजनेच्या माध्यमातून मिळणार्‍या अधिकच्या एफएसआयमुळे ठाणे शहरातील पायाभूत सुविधांवर ताण पडणार नसल्याची माहिती पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्वसाधारण सभेत दिली. तसेच क्लस्टर राबवताना ४० ते ४५ टक्के इमारती या अधिकृत असायला हव्यात, असे अनेक नियम असल्याने तिचा फायदा शहरातील १०० टक्के धोकादायक इमारतींना मिळेलच, याची शाश्वती नसल्याचेही पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपण कधीही क्लस्टरविरोधात नव्हतो, असे घूमजाव करून प्रशासक म्हणून माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्यासाठी त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली.

ठाणे : क्लस्टर योजनेच्या माध्यमातून मिळणार्‍या अधिकच्या एफएसआयमुळे ठाणे शहरातील पायाभूत सुविधांवर ताण पडणार नसल्याची माहिती पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्वसाधारण सभेत दिली. तसेच क्लस्टर राबवताना ४० ते ४५ टक्के इमारती या अधिकृत असायला हव्यात, असे अनेक नियम असल्याने तिचा फायदा शहरातील १०० टक्के धोकादायक इमारतींना मिळेलच, याची शाश्वती नसल्याचेही पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपण कधीही क्लस्टरविरोधात नव्हतो, असे घूमजाव करून प्रशासक म्हणून माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्यासाठी त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली.
क्लस्टरसंदर्भातील शिल्लक राहिलेली आपली भूमिका आयुक्तांनी बुधवारी सर्वसाधारण सभेमध्ये स्पष्ट केली. या वेळी त्यांनी सुरुवातीलाच घूमजाव करून माझा क्लस्टरला विरोध नव्हता, अशी भूमिका विशद केली. मुंबई आणि इतर शहरांमध्ये क्लस्टर योजना लागू केल्यानंतर याचा मोठा ताण शहरातील पायाभूत सुविधांवर पडणार असून यासंदर्भात कोर्टात एक याचिका दाखल झाली होती. पालिका आयुक्तांनी मात्र क्लस्टरसंदर्भात माहिती देताना या योजनेच्या माध्यमातून मिळणार्‍या वाढीव एफएसआयचा ठाण्यातील पायाभूत सुविधांवर कोणत्याही प्रकारचा ताण पडणार नसल्याचे स्पष्ट केले.
भविष्यात क्लस्टर योजनेमध्ये ७५ टक्के समावेश हा ठाणेकरांचा असल्याने केवळ २० ते ३० टक्के नागरिक हे ठाणे शहराच्या बाहेरचे असतील. बाहेरचे नागरिक हा वाढीव एफएसआय वापरणार नाहीत, अशा दृष्टीनेच आम्ही इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार करत असल्याचे ते म्हणाले.
क्लस्टरमधून ४ किंवा दुप्पट एफएसआय मिळणार असल्याने तेवढ्या पायाभूत सुविधा पालिका प्रशासनाला निर्माण कराव्या लागणार आहेत. मात्र, ठाण्यात परिस्थिती वेगळी असून ७५ टक्के नागरिक पालिकेच्या पायाभूत सुविधांचा लाभ घेत असून याच नागरिकांचा समावेश क्लस्टरमध्ये होणार असल्याने त्यांच्यासाठी वेगळ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात वाढणार्‍या लोकसंख्येचा विचार करूनच हा अहवाल तयार करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. तसेच इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल हा अंमित टप्प्यात असून सिटी डेव्हलपमेंट प्लॅन यापूर्वीच तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
.................