शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

तीन वर्षाचा लॉ कोर्स बंद करा - मद्रास हायकोर्ट

By admin | Updated: October 6, 2015 15:38 IST

तीन वर्षाचा लॉ कोर्स तातडीने रद्द करावा असे निर्देश मद्रास हायकोर्टाने बार काऊन्सिल ऑफ इंडियाला दिले आहे.

ऑनलाइन लोकमत

चेन्नई, दि. ६ - तीन वर्षाचा लॉ कोर्स तातडीने रद्द करावा असे निर्देश मद्रास हायकोर्टाने बार काऊन्सिल ऑफ इंडियाला दिले आहे.  या कोर्सऐवजी मेडिसिन आणि इंजिनिअरिंगप्रमाणेच लॉमध्येही पाच वर्षांचा प्रोफेशनल कोर्सच सुरु ठेवावा असेही हायकोर्टाने म्हटले आहे. 

वकिलीक्षेत्रात गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींना प्रवेश देण्याविरोधात मद्रास हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. हायकोर्टाचे न्या.  एन किरुबाकरन यांनी मंगळवारी या याचिकेवरील सुनावणीदरम्यान १४ कलमी निर्देशच दिले आहेत. यामध्ये बार काऊन्सिल ऑफ इंडियाने सर्वप्रथम तीन वर्षाचा लॉ कोर्स बंद करावा असे म्हटले आहे. याशिवाय बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या कामकाजाची धूरा तज्ज्ञांच्या समितीकडे सोपवावी. या समितीचे अध्यक्षपद सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशाकडे द्यावे. याशिवास सामाजिक कार्यकर्ते, आयएएस अधिकारी, डॉक्टर, शिक्षणतज्ज्ञ, निवृत्त पोलिस अधिकारी यांनाही समितीमध्ये स्थान द्यावे असेही यामध्ये म्हटले आहे. 

वकिली क्षेत्रातील विश्वासार्हता कायम राखण्यासाठी गुन्हेगारी वृत्तीची मंडळी, कट्टरतावादी, जातीयवादी मंडळींना या क्षेत्रात प्रवेश देऊ नये.  लॉ कॉलेजमध्ये प्रवेश देण्यापूर्वी कॉलेजने विद्यार्थ्यांची संपूर्ण पडताळणी करुनच प्रवेश द्यावा, फौजदारी खटले प्रलंबित असलेल्यांना प्रवेशच देऊ नये असेही यात म्हटले आहे. वकिलांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत असल्याने लॉ कॉलेजेसमधील जागांची संख्या कमी करावी असेही कोर्टाने नमूद केले.