शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

कत्तलखाने बंद करा!

By admin | Updated: March 23, 2017 00:53 IST

राज्यातील कत्तलखाने बंद करण्यासाठी कृती योजना तयार करा, असे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लखनौ : राज्यातील कत्तलखाने बंद करण्यासाठी कृती योजना तयार करा, असे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी पोलीस अधिकाऱ्यांना दिले. गायींच्या तस्करीवर बंदी घालण्याचे आदेशही त्यांनी दिले. कोणत्या प्रकारचे कत्तलखाने बंद करण्यात येणार आहेत स्पष्ट केले नाही. मात्र भाजपच्या जाहीरनाम्यात बेकायदा कत्तलखाने बंद करण्यात येतील आणि यांत्रिक कत्तलखान्यांवर सरसकट बंदी घालण्यात येईल, असे म्हटले होते यापूर्वी गुरांच्या संख्येत प्रचंड घट झाली. यावरून तेव्हा त्यांची तस्करी सुरू होती, असे दिसते. आपला पक्ष राज्यात सत्तेवर येताच सर्व कत्तलखान्यांवर बंदी घालण्यात येईल, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले होते. आज दिलेल्या आदेशात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सांगितले. बीफची निर्यात करणारा उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. दरवर्षी भारतातून ३२ हजार कोटी रुपयांच्या बीफची निर्यात होते. त्यात उत्तर प्रदेशातून होणारी निर्यातच १७ हजार कोटी रुपयांची आहे. देशात जितक्या म्हशी आहेत, त्यापैकी २८ टक्के म्हशी केवळ उत्तर प्रदेशात आहेत. त्यामुळेच तेथून बीफची निर्यातही अधिक होते. अशा स्थितीत कत्तलखाने सरसकट बंद केल्यास राज्याच्या महसुलावर मोठाच विपरित परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय राज्यातील लाखो लोकांचा रोजगारही बंद होईल. त्यामुळे बेकायदा कत्तलखान्यांवर अवश्य कारवाई करण्यात यावी. मात्र कायदेशीर कत्तलखाने बंद करू नयेत, अशी मागणी केली जात आहे. राज्य सरकारने कोणते कत्तलखाने बंद करावेत, यासंबंधीच्या स्पष्ट सूचना न दिल्यामुळे प्रशासनातर्फे कायदेशीर कत्तलखानेही बंद करणे सुरू झाले आहे. (वृत्तसंस्था)