शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण वीज तारा उठल्या जीवावर भोकर : ७५ टक्के नागरिक शिधापत्रिकेपासून वंचीत, आरोग्य केंद्र बेवारस

By admin | Updated: May 13, 2016 22:35 IST

जळगाव- चार दशकांपूर्वी भोकर येथे टाकलेल्या वीजतारा बदलण्याची तसदी वीज कंपनी घेत नसल्याने त्या जीर्ण होऊन वारंवार तुटत आहे. त्यामुळे वीजवाहक तार अंगावर पडून कोणाचा जीव जाण्याची वाट कंपनी पाहत आहे का? असा सवाल भोकर येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. शिवाय ७५ टक्के नागरिकांना शिधापत्रिका मिळाल्या नसल्याचीही तक्रार आहे.

जळगाव- चार दशकांपूर्वी भोकर येथे टाकलेल्या वीजतारा बदलण्याची तसदी वीज कंपनी घेत नसल्याने त्या जीर्ण होऊन वारंवार तुटत आहे. त्यामुळे वीजवाहक तार अंगावर पडून कोणाचा जीव जाण्याची वाट कंपनी पाहत आहे का? असा सवाल भोकर येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. शिवाय ७५ टक्के नागरिकांना शिधापत्रिका मिळाल्या नसल्याचीही तक्रार आहे.

वीज तारांना जागोजागी जोड; गावाबाहेरुन रस्ता करण्याची मागणी....
भोकर येथे वीज पुरवठ्यासाठी १९७६ मध्ये वीज वाहक तारा जोडण्यात आल्या. याला आता ४० वर्षे उलटले तरी त्या बदलल्या गेलेल्या नाही. शिवाय त्या वेळचा दाब व आताचा दाब कितीतरी पटीने वाढून तो या वीज तारांना सोसवत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दाब वाढण्यासह त्या जीर्ण झाल्याने वारंवार तुटून पडत आहे. साधारण दोन दिवसातून एकदा तर कधीकधी सकाळ-संध्याकाळ अशा दोन्ही वेळेस या तारा तुटून लोंबकळतात, असे येथील नागरिकांनी सांगितले.
या वीजतारा इतक्या खाली आल्या आहेत की, अनेक ठिकाणी हात वर केला की, सहज या तारांचा स्पर्श होऊ शकतो. त्यामुळे हा प्रकार जीवावर बेतणारा आहे.
वीज तार केव्हा तुटून पडेल हे सांगता येत नाही, त्यामुळे भर उन्हाळ्यात उकाडा होत असला तरी नागरिक रात्री बाहेर झोपण्यास धजावत नसल्याचेही सांगण्यात आले. या जीर्ण वीजतारा बदलण्याविषयी ग्रामसभेचा ठराव करुन तो पाठविण्यातदेखील आला. त्या बदलण्याचे केवळ आश्वासन मिळाले आहे.
या गावातून तीर्थक्षेत्र रामेश्वर व परसोद येथे जाणारा रस्ता आहे. या ठिकाणी बाहेर गावचे नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे सर्व वाहने गावातूनच जातात. यासाठी गावाबाहेरुन रस्ता करण्याचीही मागणी आहे.

भर पुरातून नागरिकांचा प्रवास...
गावाशेजारुन वाहणार्‍या तापी नदीवर पूल करण्याची जुनी मागणी आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. पावसाळ्यात चोपडा अथवा जळगावला जायचे झाल्यास नदीला पूर आला असतानाही त्या भर पुरातून नावेतून प्रवास करावा लागतो. कधी काय दुर्घटना होईल सांगता येत नाही. त्यामुळे तापी नदीवर पूल बांधण्यात यावा अशी, येथील नागरिकांनी मागणी केली आहे.