शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जीर्ण वीज तारा उठल्या जीवावर भोकर : ७५ टक्के नागरिक शिधापत्रिकेपासून वंचीत, आरोग्य केंद्र बेवारस

By admin | Updated: May 13, 2016 22:35 IST

जळगाव- चार दशकांपूर्वी भोकर येथे टाकलेल्या वीजतारा बदलण्याची तसदी वीज कंपनी घेत नसल्याने त्या जीर्ण होऊन वारंवार तुटत आहे. त्यामुळे वीजवाहक तार अंगावर पडून कोणाचा जीव जाण्याची वाट कंपनी पाहत आहे का? असा सवाल भोकर येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. शिवाय ७५ टक्के नागरिकांना शिधापत्रिका मिळाल्या नसल्याचीही तक्रार आहे.

जळगाव- चार दशकांपूर्वी भोकर येथे टाकलेल्या वीजतारा बदलण्याची तसदी वीज कंपनी घेत नसल्याने त्या जीर्ण होऊन वारंवार तुटत आहे. त्यामुळे वीजवाहक तार अंगावर पडून कोणाचा जीव जाण्याची वाट कंपनी पाहत आहे का? असा सवाल भोकर येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. शिवाय ७५ टक्के नागरिकांना शिधापत्रिका मिळाल्या नसल्याचीही तक्रार आहे.

वीज तारांना जागोजागी जोड; गावाबाहेरुन रस्ता करण्याची मागणी....
भोकर येथे वीज पुरवठ्यासाठी १९७६ मध्ये वीज वाहक तारा जोडण्यात आल्या. याला आता ४० वर्षे उलटले तरी त्या बदलल्या गेलेल्या नाही. शिवाय त्या वेळचा दाब व आताचा दाब कितीतरी पटीने वाढून तो या वीज तारांना सोसवत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दाब वाढण्यासह त्या जीर्ण झाल्याने वारंवार तुटून पडत आहे. साधारण दोन दिवसातून एकदा तर कधीकधी सकाळ-संध्याकाळ अशा दोन्ही वेळेस या तारा तुटून लोंबकळतात, असे येथील नागरिकांनी सांगितले.
या वीजतारा इतक्या खाली आल्या आहेत की, अनेक ठिकाणी हात वर केला की, सहज या तारांचा स्पर्श होऊ शकतो. त्यामुळे हा प्रकार जीवावर बेतणारा आहे.
वीज तार केव्हा तुटून पडेल हे सांगता येत नाही, त्यामुळे भर उन्हाळ्यात उकाडा होत असला तरी नागरिक रात्री बाहेर झोपण्यास धजावत नसल्याचेही सांगण्यात आले. या जीर्ण वीजतारा बदलण्याविषयी ग्रामसभेचा ठराव करुन तो पाठविण्यातदेखील आला. त्या बदलण्याचे केवळ आश्वासन मिळाले आहे.
या गावातून तीर्थक्षेत्र रामेश्वर व परसोद येथे जाणारा रस्ता आहे. या ठिकाणी बाहेर गावचे नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे सर्व वाहने गावातूनच जातात. यासाठी गावाबाहेरुन रस्ता करण्याचीही मागणी आहे.

भर पुरातून नागरिकांचा प्रवास...
गावाशेजारुन वाहणार्‍या तापी नदीवर पूल करण्याची जुनी मागणी आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. पावसाळ्यात चोपडा अथवा जळगावला जायचे झाल्यास नदीला पूर आला असतानाही त्या भर पुरातून नावेतून प्रवास करावा लागतो. कधी काय दुर्घटना होईल सांगता येत नाही. त्यामुळे तापी नदीवर पूल बांधण्यात यावा अशी, येथील नागरिकांनी मागणी केली आहे.