शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

चिटफंड : ‘एसआयटी’ची स्थापना

By admin | Updated: May 11, 2014 23:32 IST

सुमारे १0 हजार कोटी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी सीबीआय रविवारी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. या घोटाळ्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

नवीन सिन्हा, नवी दिल्ली
सुमारे १0 हजार कोटी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. 
या घोटाळ्यामुळे पश्‍चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारची डोकेदुखी वाढली आहे. एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी चिटफंड घोटाळा चौकशीचे आदेश सीबीआयला दिले होते. यापूर्वी या घोटाळ्याचा तपास सीआयडी करीत होती तसेच न्यायालयाने संबंधित तिन्ही राज्यांच्या पोलिसांना सीबीआयला सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी आतापावेतो शारदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदीप्ता सेन, तृणमूल काँग्रेसचे खासदार कुणाल घोष आणि या कंपनीच्या काही कर्मचार्‍यांना अटक केली आहे. पश्‍चिम बंगाल, ओडिशा, आसाम आणि झारखंडमधील सुमारे १५ लाख नागरिकांची बचत बुडल्याचे सुरुवातीच्या चौकशीत उघड झाले आहे. या घोटाळ्यातील बड्या धेंडांना जेरबंद करण्यात अपयशी ठरल्याबद्दल सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या अधिकार्‍यांच्या भूमिकेवर न्यायालयाने सूचक सवाल केला  होता. सीबीआयचे संचालक रंजित सिन्हा लोकमतशी बोलताना म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या प्रकरणाच्या कायदेशीर बाबींवर काम सुरू आहे. त्यानुसार न्यायालयाला माहिती दिली जाईल. सीबीआयला सोमवारी सर्व दस्तऐवज मिळण्याची शक्यता आहे. 
सीबीआयचे अतिरिक्त संचालक आर.के. दत्ता हे एसआयटीचे नेतृत्व करतील. सहसंचालक (पूर्व विभाग) आणि इतर अधिकार्‍यांचा या एसआयटीमध्ये समावेश होणे अपेक्षित आहे. तपासाला गती देण्यासाठी सेबी आणि ईडीच्या अधिकार्‍यांशी  सीबीआय समन्वय साधणार आहे.  पश्‍चिम बंगाल, ओडिशा, आसाम आणि झारखंड येथील हजारो गुंतवणूकदारांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे प्रारंभी सुमारे १0 हजार कोटी रुपयांचा समजण्यात आलेल्या या घोटाळ्याची व्याप्ती अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे.