शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा नवा चॅम्पियन! MI 'आउट'; PBKS ला फायनलमध्ये नेत श्रेयस अय्यरनं रचला इतिहास
2
बीड: पालखी महामार्गावर टेम्पो व रिक्षाचा भीषण अपघात, पती-पत्नीसह एकूण चार जण ठार
3
महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण
4
रायगड किल्ल्यावर उत्खननात आढळले 'यंत्रराज' सौम्ययंत्र खगोलशास्त्रीय उपकरण
5
IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास
6
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
7
IPL 2025 Qualifier 2 : हार्दिक पांड्यानं Josh Inglis ची विकेट घेतली अन् अंपायर आला चर्चेत, कारण...
8
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
9
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
10
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
11
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
12
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
13
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
14
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
15
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
16
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
17
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
18
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
19
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
20
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  

चिटफंड : ‘एसआयटी’ची स्थापना

By admin | Updated: May 11, 2014 23:32 IST

सुमारे १0 हजार कोटी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी सीबीआय रविवारी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. या घोटाळ्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

नवीन सिन्हा, नवी दिल्ली
सुमारे १0 हजार कोटी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. 
या घोटाळ्यामुळे पश्‍चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारची डोकेदुखी वाढली आहे. एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी चिटफंड घोटाळा चौकशीचे आदेश सीबीआयला दिले होते. यापूर्वी या घोटाळ्याचा तपास सीआयडी करीत होती तसेच न्यायालयाने संबंधित तिन्ही राज्यांच्या पोलिसांना सीबीआयला सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी आतापावेतो शारदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदीप्ता सेन, तृणमूल काँग्रेसचे खासदार कुणाल घोष आणि या कंपनीच्या काही कर्मचार्‍यांना अटक केली आहे. पश्‍चिम बंगाल, ओडिशा, आसाम आणि झारखंडमधील सुमारे १५ लाख नागरिकांची बचत बुडल्याचे सुरुवातीच्या चौकशीत उघड झाले आहे. या घोटाळ्यातील बड्या धेंडांना जेरबंद करण्यात अपयशी ठरल्याबद्दल सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या अधिकार्‍यांच्या भूमिकेवर न्यायालयाने सूचक सवाल केला  होता. सीबीआयचे संचालक रंजित सिन्हा लोकमतशी बोलताना म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या प्रकरणाच्या कायदेशीर बाबींवर काम सुरू आहे. त्यानुसार न्यायालयाला माहिती दिली जाईल. सीबीआयला सोमवारी सर्व दस्तऐवज मिळण्याची शक्यता आहे. 
सीबीआयचे अतिरिक्त संचालक आर.के. दत्ता हे एसआयटीचे नेतृत्व करतील. सहसंचालक (पूर्व विभाग) आणि इतर अधिकार्‍यांचा या एसआयटीमध्ये समावेश होणे अपेक्षित आहे. तपासाला गती देण्यासाठी सेबी आणि ईडीच्या अधिकार्‍यांशी  सीबीआय समन्वय साधणार आहे.  पश्‍चिम बंगाल, ओडिशा, आसाम आणि झारखंड येथील हजारो गुंतवणूकदारांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे प्रारंभी सुमारे १0 हजार कोटी रुपयांचा समजण्यात आलेल्या या घोटाळ्याची व्याप्ती अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे.