शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

घटस्फोट झाल्यास मुलांचा संयुक्त ताबा

By admin | Updated: May 23, 2015 00:14 IST

घटस्फोट झाल्यास मुलांचा ताबा घेण्यावरून माता-पित्यांपैकी एकाला वरचढ ठरविणारी पद्धत संपुष्टात आणत संगोपनाची संयुक्तरीत्या जबाबदारी सोपविण्याची शिफारस विधि आयोगाने केली आहे.

नवी दिल्ली : घटस्फोट झाल्यास मुलांचा ताबा घेण्यावरून माता-पित्यांपैकी एकाला वरचढ ठरविणारी पद्धत संपुष्टात आणत संगोपनाची संयुक्तरीत्या जबाबदारी सोपविण्याची शिफारस विधि आयोगाने केली आहे. बदलत्या काळानुसार संगोपनाची जबाबदारी सोपविण्यासंबंधी कायदे बदलायला हवेत, असे स्पष्ट केले.मुलांच्या ताब्यासंबंधी (कस्टडी लॉ) कायद्याच्या दृष्टीने आयोगाची शिफारस महत्त्वपूर्ण ठरते. कारण भारतात संयुक्त जबाबदारीची कल्पना पूर्णपणे नवी आहे. आई किंवा वडील यापैकी कुणाही एकाला मुलांचा ताबा दिला जाणार नाही. मुलांचे हित पाहून न्यायालयच कुणा एकाला ताबा द्यायचा याबाबत निर्णय घेऊ शकते; अन्यथा संयुक्तरीत्या जबाबदारी सोपविली जावी, असे आयोगाने कायदा मंत्रालयाला सोपविलेल्या अहवालात म्हटले आहे.हिंदू अल्पसंख्याक व पालकत्व कायदा, पालक आणि मुलांसंबंधी कायद्यात बदल करण्याची गरजही आयोगाने अधोरेखित केली. गीता हरिहरन विरुद्ध रिझर्व्ह बँक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अपवादात्मक परिस्थिती वगळता पिता हयात असतानाही माता हीच नैसर्गिक पालक बनू शकते, असा निर्वाळा दिला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)आधुनिक सामाजिक गरजा पाहता कायद्यातही सुधारणा करण्याची गरज आहे. पालकत्व आणि मुलांसंबंधी १८९० च्या कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याची शिफारस करीत आयोगाने नवा अध्याय समोर आणला आहे. या कायद्यात केल्या जाणाऱ्या सुधारणा मुलांच्या ताब्यासंबंधी सर्व प्रक्रियेला तसेच वैयक्तिक कायद्यासाठीही लागू केल्या जाव्यात, असे आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे.