शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

सरन्यायाधीश मोदींवर नाराज

By admin | Updated: August 16, 2016 01:17 IST

देशाच्या ७०व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात देशातील न्यायव्यवस्थेपुढे असलेल्या समस्यांविषयी साधा उल्लेखही केला

नवी दिल्ली : देशाच्या ७०व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात देशातील न्यायव्यवस्थेपुढे असलेल्या समस्यांविषयी साधा उल्लेखही केला नसल्याने देशाचे सरन्यायधीश टी. एस. ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान त्यांच्या भाषणात न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत काहीतरी उल्लेख करतील, अशी मला अपेक्षा होती, असे न्या. ठाकूर यांनी म्हटले.‘मी माझ्या करिअरच्या शिखरावर पोहोचलो आहे, त्यामुळे मला काय वाटते याबद्दल बोलण्यास मी मागेपुढे पाहणार नाही. मी खरेच बोललो पाहिजे, जे तुमच्या मनाला भिडेल... आपले जगप्रसिद्ध पंतप्रधान, कायदेमंत्री यांचे भाषण आपण सगळ्यांनी ऐकले. या भाषणात ते कायदा व न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबत काहीतरी उल्लेख करतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्याविषयी काहीही बोलण्यात आले नाही,’ अशा शब्दांत सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर नाराजी व्यक्त केली. ‘ब्रिटिशांच्या साम्राज्यात १० वर्षांत केसेसवरील निकाल लागायचा; पण आता तेही होत नाही. लोकांच्या अपेक्षा आणि केसेसच्या संख्या इतक्या वाढल्या आहेत की उद्दिष्ट गाठणे कठीण झाले आहे. त्यामुळेच मी पंतप्रधानांना या मुद्द्याकडे लक्ष देण्याची वारंवार विनंती केली,’ असे न्या. ठाकूर यांनी म्हटले. काहीच दिवसांपूर्वी न्या. ठाकूर यांनी एका कार्यक्रमात अत्यंत भावनिक होऊन पंतप्रधानांना भारतीय न्यायव्यवस्थेकडे लक्ष देण्याची विनंती केली होती. तथापि, केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी न्यायाधीशांच्या नियुक्त्या कोणत्याही परिस्थितीत करण्यात येतील, असे स्पष्ट केले. ‘किमान सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या नियुक्त्यांच्या आड एमओपी (मेमोरँडम आॅफ प्रोसिजर) येणार नाही,’ असे प्रसाद यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या नियुक्तीवरून केंद्र सरकारविरुद्ध सर्वोच्च न्यायालय असे चित्र पाहायला मिळाले. ‘बेरोजगारी आणि शोषण या दोन गोष्टींपासून आपल्याला मुक्तता मिळेल तेव्हा आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळेल,’ असे अ‍ॅड. ठाकूर यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)