शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सरन्यायाधीश मोदींवर नाराज

By admin | Updated: August 16, 2016 01:17 IST

देशाच्या ७०व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात देशातील न्यायव्यवस्थेपुढे असलेल्या समस्यांविषयी साधा उल्लेखही केला

नवी दिल्ली : देशाच्या ७०व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात देशातील न्यायव्यवस्थेपुढे असलेल्या समस्यांविषयी साधा उल्लेखही केला नसल्याने देशाचे सरन्यायधीश टी. एस. ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान त्यांच्या भाषणात न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत काहीतरी उल्लेख करतील, अशी मला अपेक्षा होती, असे न्या. ठाकूर यांनी म्हटले.‘मी माझ्या करिअरच्या शिखरावर पोहोचलो आहे, त्यामुळे मला काय वाटते याबद्दल बोलण्यास मी मागेपुढे पाहणार नाही. मी खरेच बोललो पाहिजे, जे तुमच्या मनाला भिडेल... आपले जगप्रसिद्ध पंतप्रधान, कायदेमंत्री यांचे भाषण आपण सगळ्यांनी ऐकले. या भाषणात ते कायदा व न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबत काहीतरी उल्लेख करतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्याविषयी काहीही बोलण्यात आले नाही,’ अशा शब्दांत सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर नाराजी व्यक्त केली. ‘ब्रिटिशांच्या साम्राज्यात १० वर्षांत केसेसवरील निकाल लागायचा; पण आता तेही होत नाही. लोकांच्या अपेक्षा आणि केसेसच्या संख्या इतक्या वाढल्या आहेत की उद्दिष्ट गाठणे कठीण झाले आहे. त्यामुळेच मी पंतप्रधानांना या मुद्द्याकडे लक्ष देण्याची वारंवार विनंती केली,’ असे न्या. ठाकूर यांनी म्हटले. काहीच दिवसांपूर्वी न्या. ठाकूर यांनी एका कार्यक्रमात अत्यंत भावनिक होऊन पंतप्रधानांना भारतीय न्यायव्यवस्थेकडे लक्ष देण्याची विनंती केली होती. तथापि, केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी न्यायाधीशांच्या नियुक्त्या कोणत्याही परिस्थितीत करण्यात येतील, असे स्पष्ट केले. ‘किमान सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या नियुक्त्यांच्या आड एमओपी (मेमोरँडम आॅफ प्रोसिजर) येणार नाही,’ असे प्रसाद यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या नियुक्तीवरून केंद्र सरकारविरुद्ध सर्वोच्च न्यायालय असे चित्र पाहायला मिळाले. ‘बेरोजगारी आणि शोषण या दोन गोष्टींपासून आपल्याला मुक्तता मिळेल तेव्हा आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळेल,’ असे अ‍ॅड. ठाकूर यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)