शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सरन्यायाधीश मोदींवर नाराज

By admin | Updated: August 16, 2016 01:17 IST

देशाच्या ७०व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात देशातील न्यायव्यवस्थेपुढे असलेल्या समस्यांविषयी साधा उल्लेखही केला

नवी दिल्ली : देशाच्या ७०व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात देशातील न्यायव्यवस्थेपुढे असलेल्या समस्यांविषयी साधा उल्लेखही केला नसल्याने देशाचे सरन्यायधीश टी. एस. ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान त्यांच्या भाषणात न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत काहीतरी उल्लेख करतील, अशी मला अपेक्षा होती, असे न्या. ठाकूर यांनी म्हटले.‘मी माझ्या करिअरच्या शिखरावर पोहोचलो आहे, त्यामुळे मला काय वाटते याबद्दल बोलण्यास मी मागेपुढे पाहणार नाही. मी खरेच बोललो पाहिजे, जे तुमच्या मनाला भिडेल... आपले जगप्रसिद्ध पंतप्रधान, कायदेमंत्री यांचे भाषण आपण सगळ्यांनी ऐकले. या भाषणात ते कायदा व न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबत काहीतरी उल्लेख करतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्याविषयी काहीही बोलण्यात आले नाही,’ अशा शब्दांत सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर नाराजी व्यक्त केली. ‘ब्रिटिशांच्या साम्राज्यात १० वर्षांत केसेसवरील निकाल लागायचा; पण आता तेही होत नाही. लोकांच्या अपेक्षा आणि केसेसच्या संख्या इतक्या वाढल्या आहेत की उद्दिष्ट गाठणे कठीण झाले आहे. त्यामुळेच मी पंतप्रधानांना या मुद्द्याकडे लक्ष देण्याची वारंवार विनंती केली,’ असे न्या. ठाकूर यांनी म्हटले. काहीच दिवसांपूर्वी न्या. ठाकूर यांनी एका कार्यक्रमात अत्यंत भावनिक होऊन पंतप्रधानांना भारतीय न्यायव्यवस्थेकडे लक्ष देण्याची विनंती केली होती. तथापि, केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी न्यायाधीशांच्या नियुक्त्या कोणत्याही परिस्थितीत करण्यात येतील, असे स्पष्ट केले. ‘किमान सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या नियुक्त्यांच्या आड एमओपी (मेमोरँडम आॅफ प्रोसिजर) येणार नाही,’ असे प्रसाद यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या नियुक्तीवरून केंद्र सरकारविरुद्ध सर्वोच्च न्यायालय असे चित्र पाहायला मिळाले. ‘बेरोजगारी आणि शोषण या दोन गोष्टींपासून आपल्याला मुक्तता मिळेल तेव्हा आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळेल,’ असे अ‍ॅड. ठाकूर यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)