शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

छत्तीसगढमध्ये लाखेच्या उत्पादनास मिळणार कृषी दर्जा; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची सहमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 23:20 IST

पुढील मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावास मंजुरी मिळण्याची शक्यता

रायपूर : छत्तीसगढमध्ये लाखेच्या उत्पादनास कृषीचा दर्जा मिळणार आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यासंबंधीच्या प्रस्तावास आपली सहमती दर्शविली आहे.

राज्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, छत्तीसगढमध्ये आता लाखेच्या शेतीस कृषीचा दर्जा मिळणार आहे. राज्याच्या वन विभागाच्या वतीने लाखेच्या शेतीला लाभदायक बनविण्यासाठी एक प्रस्ताव देण्यात आला होता. हा प्रस्ताव शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे, असे जाणवल्यानंतर मुख्यमंत्री बघेल यांनी त्याला सहमती दर्शविली.

अधिकाºयाने सांगितले की, यासंबंधी कृषी, वन आणि सहकार या विभागांनी समन्वय साधून लाख आणि त्यासारख्या इतर लाभदायक उत्पादनांना कृषी क्षेत्रात समाविष्ट करून घेण्यासाठी आगामी मंत्रिमंडळ बैठकीसमोर प्रस्ताव ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यांनी सांगितले की, राज्यात लाखेच्या शेतीला कृषीचा दर्जा मिळाल्यास लाख उत्पादनाशी संबंधित शेतकºयांना सहकारी सोसायट्यांकडून इतर शेतकºयांप्रमाणे सहजपणे कर्ज उपलब्ध होईल.

अधिकाºयाने सांगितले की, छत्तीसगढमध्ये लाखेच्या शेतीला उज्ज्वल भविष्य आहे. येथील शेतकरी कुसुम, पळस आणि बोरीच्या झाडांवर पारंपरिक पद्धतीने लाखेची शेती करतात. तथापि, सुव्यवस्थित आणि आधुनिक पद्धतीने लाखेची शेती होत नाही. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत शेतकºयांना अपेक्षित लाभ मिळत नाही. या पार्श्वभूमीवर वन विभागाने लाखेची शेती लाभदायक बनविण्यासाठी एक प्रस्ताव सरकारला सादर केला आहे. यात लाखेच्या शेतीला रीतसर कृषीचा दर्जा देण्याची तसेच लाख उत्पादक शेतकºयांना इतर शेतकºयांप्रमाणे कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली आहे. हा प्रस्ताव स्वीकारण्याची विनंती वन विभागाने मुख्यमंत्र्यांना केली होती. मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर या प्रस्तावाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होईल. यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी कृषी, वन आणि सहकार या विभागांना दिले आहेत. लाखेशिवाय इतरही काही शेतीपूरक उत्पादने असतील, तर त्यांचाही प्रस्तावात समावेश करण्यात यावा, असे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटले आहे.च्छत्तीसगढच्या उत्तर आणि दक्षिण भागातील घनदाट जंगलातील वातावरण लाखेसाठी पोषक आहे. येथेच लाखेचे उत्पादन घेतले जाते. तथापि, येथील उत्पादन पद्धती पारंपरिक असल्यामुळे उत्पादकांच्या हाती फार पैसा पडत नाही. आधुनिक उत्पादन तंत्र वापरल्यास लाखेच्या शेतीत उत्तम संधी आहेत, असे एका अधिकाºयाने सांगितले.

च्जंगातील पळस, बोर आणि कुसुमाच्या झाडावर लाख नैसर्गिकरीत्या वाढते. ती खरडवून काढण्याचे काम उत्पादक करतात. या झाडांवर जगणारे विविध परोपजीवी कीटक आपल्या शरीरातून राळेसारखा चिकट पदार्थ स्रवतात. त्यावर प्रक्रिया करून शुद्ध लाख मिळविली जाते. लाखेच्या अनेक वस्तू बनविल्या जातात. च्लाख भारताला प्राचीन काळापासून माहीत आहे. लाखेचा सर्वांत जुना आणि ठळक उल्लेख महाभारतात ‘लाक्षागृहा’च्या रूपाने येतो. लाक्षागृह म्हणजे लाखेपासून बनविलेले घर.

च्लाख ज्वलनशील असते. धडधडून पेटते. त्यामुळे पांडवांना जाळून मारण्यासाठी दुर्योधनाने पुरोचन नावाच्या स्थापत्य विशारदाकडून लाक्षागृह बनवून घेतले होते. एका अमावास्येच्या रात्री या घराला आग लावली जाते. तथापि, पांडवांना या कटाचा आधीच सुगावा लागलेला असतो. ते लाक्षागृहाखाली एक भुयार खोदून ठेवतात आणि आगीतून सहीसलामत वाचतात, अशी ही कहाणी आहे. च्भारतात अजूनही शासकीय कामकाजात सिलिंगसाठी लाखेचा वापर होतो. त्यासाठी सरकार दरवर्षी लाखेची मोठी खरेदी करते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या