शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

विकसित छत्तीसगडचा रोडमॅप तयार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चिंतन शिबिराामधून केली विचारांची देवाण घेवाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 12:57 IST

Chhattisgarh Government News: छत्तीसगडमधील मंत्र्यांना व्यवस्थापनामधील बारकावे समजावण्यासाठी, सहकार्य आणि दूरदर्शितेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राज्याच्या समृद्ध आणि सर्वसमावेशक भविष्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत विचारविनिमय करण्यासाठी तसेच विकासाबाबत लोकप्रतिनिधींमधील दूरदर्शितेमध्ये वाढ करण्यासाठी ३१ मे आणि १ जूनपर्यंत इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट राजपूरने एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

रायपूर - भारतातील लोकशाही व्यवस्थेमध्ये जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी ही सरकारची असल्याचं मानलं जातं. मात्र व्यवस्थापनाच्या बारकाव्यांबाबत लोकप्रतिनिधींना फारसं देणं घेणं नसल्याचं दिसून येतं. मात्र छत्तीसगडमधील मुख्यमंत्री विष्णू देव साय यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विकसित छत्तीसगडचा रोडमॅप तयार करण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलल्याचं दिसून आलं.  

छत्तीसगडमधील मंत्र्यांना व्यवस्थापनामधील बारकावे समजावण्यासाठी, सहकार्य आणि दूरदर्शितेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राज्याच्या समृद्ध आणि सर्वसमावेशक भविष्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत विचारविनिमय करण्यासाठी तसेच विकासाबाबत लोकप्रतिनिधींमधील दूरदर्शितेमध्ये वाढ करण्यासाठी ३१ मे आणि १ जूनपर्यंत इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट राजपूरने एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला आयआयएमने चिंतन शिबिराचं नाव दिलं होतं. यामाध्यमातून आयआयएमने एका नव्या परंपरेची सुरुवात केली होती. देशामध्ये कदाचित पहिल्यांदाच कुठल्याही चिंतन शिबिरामध्ये लोकप्रतिनिधींकडून राजकीय रणनीतीऐवजी जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली.

राज्यातील विष्णू देव साय सरकारने घेतलेल्या पुढाकारानंतर आयआयएमने या बौद्धिक शिबिराचं आयोजन केलं.  यामध्ये सुशासनापासून ते सर्वोत्तम शासनाकडे वळण्यापर्यंत आणि सुशासनाच्या संकल्पनेला मूर्त रूप देऊन विकसित छत्तीसगडची निर्मिती करण्यासाठीच्या सरकारच्या लक्ष्याला अधिक प्रभावी बनवण्याबाबत विविध विषयांमधील तज्ज्ञांशी मंत्र्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्री विष्णू देव साय आणि मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांनी सुशासन तसेच बेस्ट प्रॅक्टिसेसबाबत विविध विषयातील तज्ज्ञांसोबत आपल्या विचारांची देवाण घेवाण केली. तसेच आपल्या मनातील प्रश्नही त्यांच्यासमोर मांडले. यादरम्यान, मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी सातत्याने दोन दिवसांपर्यंत आयआयएमच्या वर्गामध्ये उपस्थित राहिले. तसेच त्यांनी या संपूर्ण काळात विद्यार्थीजीवनाप्रमाणे अनुकरण केले.  

आयाआयएमच्या या कार्यक्रमामधून राज्य सरकारने देशभरातील विविध विषयांमधील तज्ज्ञांसोबत विकसित छत्तीसगडचं डिझाईन आणि क्रियान्वयनाबाबतच्या रोडमॅपबाबत विचारविनिमय केला. तसेच २०४७ पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य गाठण्यासाठी कशाप्रकारे विकसित छत्तीसगडच्या निर्मितीबाबत कालबद्ध लक्ष्य निर्धारित करण्याबाबतची चर्चा झाली.  

या चर्चासत्राचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये छत्तीसगडच्या गरजा, प्राथमिकता आणि संभावनांबाबत चर्चेसोबत तज्ज्ञांने महत्त्वपूर्ण सल्लेही सरकारला मिळाले. नीती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी पुढी १० वर्षांमध्ये विकसित छत्तीसगड निर्माण करण्याबाबतचा आराखडा सादर केला. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडGovernmentसरकार