शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सोनिया यांची भूमिकाही तपासणार

By admin | Updated: March 2, 2016 03:09 IST

२००४ साली अहमदाबादेत झालेल्या इशरत जहाँ चकमकीशी संबंधित सर्व फाइल्स, शपथपत्रे आणि अन्य कागदपत्रे यांचा शोध घेण्यास गृहमंत्रालयाने सुरुवात केली आहे

हरिष गुप्ता,  नवी दिल्ली२००४ साली अहमदाबादेत झालेल्या इशरत जहाँ चकमकीशी संबंधित सर्व फाइल्स, शपथपत्रे आणि अन्य कागदपत्रे यांचा शोध घेण्यास गृहमंत्रालयाने सुरुवात केली आहे. याप्रकरणात इशरत दहशतवादी असल्याचा उल्लेख टाळायला लावणारे शपथपत्र दाखल करण्याप्रकरणी तत्कालिन गृहमंत्री व काँग्रेस नेते पी़ चिदंबरम अडचणीत येण्याची चिन्हे आहेत़ तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही यात काही भूमिका होती का? याची छाननी होण्याची शक्यता असल्याचे संकेत दूरसंचारमंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यासारख्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळत आहेत. ही चकमक बनावट असल्याचे केंद्रात त्यावेळी सत्तेवर असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचे मत होते. माजी गृहसचिव जी.के. पिल्लई आणि गृहमंत्रालयातील अन्य एक वरिष्ठ अधिकारी आर.व्ही.एस. मणी यांनी इशरत जहाँ चकमकीचे दुसरे शपथपत्र तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्या सांगण्यावरुन बदलण्यात आल्याचा आरोप केला होता. ही चकमक बनावट होती आणि गुजरात पोलिसांनी तसेच आयबीच्या काही अधिकाऱ्यांनी घडवून आणल्याचे सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या शपथपत्रात बदल करण्यात आल्याचे या दोघांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे प्रकरण न्यायालयात किंवा ससंदेत उपस्थित झाल्यास या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रांसह गृहमंत्रालय तयार राहणार आहे. त्या दृष्टीनेच सर्व कागदपत्रांचा शोध घेतला जात आहे. जून २००४ मध्ये अहमदाबादेत गुजरात पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाची कथित हस्तक इशरत जहाँ, तिचे साथीदार जावेद शेख, जिशान जोहर, अमजद अली यांना चकमकीत ठार मारले होते. हे सर्व जण गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटात सहभागी झाले होते असा दावा गुजरात पोलिसांतर्फे त्यावेळी करण्यात आला होता. या प्रकरणाचा प्रदीर्घ काळ तपास केल्यानंतर २००९ मध्ये अहमदाबाद न्यायालयाने ही चकमक बनावट असल्याचा निवाडा दिला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने ही चकमक बनावट होती किंवा नाही याचा तपास करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शपथपत्रातील माहितीनुसार इशरत आणि तिचे सहकारी हे लष्कर ए तोयबासाठी काम करत होते. आयबीने २००९ मध्ये गुजरात उच्च न्यायालयात आॅगस्ट २००९ मध्ये दाखल केलेल्या शपथपत्राव्दारे ही माहिती दिली आहे. पण, हे शपथपत्र याच वर्षी सप्टेंबरमध्ये बदलण्यात आले. यामध्ये इशरतचे अतिरेकी संबंध असल्याचे सर्व संदर्भ काढून टाकण्यात आले. अर्थात चिदंबरम यांच्या निर्देशावरुनच हे करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. माजी गृह सचिव जी.के. पिल्लई हे या प्रकरणावरून काळजीत होते. कारण, इशरत ही अतिरेकी आहे की नाही हा तपास यंत्रणांशी संबंधित विषय होता.