शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार सैनिकांप्रती गंभीर नसल्याचा शहीदाच्या वडिलांचा आरोप

By admin | Updated: June 1, 2015 17:25 IST

देशासाठी प्राणाची आहूती देणा-या सैनिकांप्रती काँग्रेस सरकारप्रमाणेच मोदी सरकार सुध्दा गंभीर नसल्याचा आरोप शहीद कॅप्टन सौरभ कालियाचे वडील डॉ. एन.के. कालिया यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. १ - देशासाठी प्राणाची आहूती देणा-या सैनिकांप्रती काँग्रेस सरकारप्रमाणेच मोदी सरकार सुध्दा गंभीर नसल्याचा आरोप शहीद कॅप्टन सौरभ कालियाचे वडील डॉ. एन.के. कालिया यांनी केला आहे. कारगील युध्दातील शहीदांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालविण्यास केंद्रातील मोदी सरकारने नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या कालिया यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस सरकारपेक्षा भाजप सरकार जास्त देशभक्त असेल अशी आम्हाला आशा होती. पण देशातील सत्ता बदलानंतरही मोदी सरकारचा दृष्टिकोन तसाच असून हे आमच्यासाठी दुर्दैव आहे अशी खंत एन.के. कालिया यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवली.पाकिस्तानविरोधात भारताची कोणतीही ठोस रणनीती नसून कधी आपण पाकिस्तानशी क्रिकेट सामने खेळतो, चर्चा करतो तर कधी लढाई करतो. सत्तेत आल्यानंतर सर्व राजकीय पक्षांचा सूर मात्र एकसारखाच पाहायला मिळतो, असा आरोप डॉ. कालिया यांनी मोदी सरकारवर केला. सीमेवर लढणा-या सैनिकांचे प्रश्न हाताळण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसने आता भाजप सरकारवर टीका सुरू केली आहे. दरम्यान, भाजपने शहीदांचा अपमान केला आहे', असा आरोप काँग्रेस नेते पी.एल. पुनीया यांनी केला आहे. कारगिल युद्धात ४ रेजिमेंटचे कॅप्टन सौरभ कालिया आणि इतर पाच सैनिक अर्जून राम, भंवर लाल बागडिया, भिक्खा राम, मुलाराम आणि नरेश सिंह हे १६ मे १९९९ रोजी कारगिलच्या काकसर सब-सेक्टरमध्ये बेपत्ता झाले होते. त्यानंतर पुढच्या महिन्यात ९ जूनला पाकिस्तानने त्यांचे मृतदेह भारताच्या हवाली केले होते. पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असताना झालेल्या क्रूर मारहाणीत कॅप्टन सौरभ कालियासह हे पाचही जवान शहीद झाले होते. अतिशय छिन्नविछिन्न अवस्थेत त्यांचे मृतदेह पाकने भारताला सोपवले होते. याप्रकरणी शहीद कालियाच्या कुटुंबीयांनी सुप्रीम कोर्टात याचिका करत हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात नेण्याची मागणी केली होती. दरम्यान, याप्रकरणी २५ तारखेला होणाऱ्या पुढील सुनावणीत केंद्र सरकार आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.