शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत?
3
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
4
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
5
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
6
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
7
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
8
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
9
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
10
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
11
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
12
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
13
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
14
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
15
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
16
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
17
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
18
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
19
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
20
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय

मोदी सरकार सैनिकांप्रती गंभीर नसल्याचा शहीदाच्या वडिलांचा आरोप

By admin | Updated: June 1, 2015 17:25 IST

देशासाठी प्राणाची आहूती देणा-या सैनिकांप्रती काँग्रेस सरकारप्रमाणेच मोदी सरकार सुध्दा गंभीर नसल्याचा आरोप शहीद कॅप्टन सौरभ कालियाचे वडील डॉ. एन.के. कालिया यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. १ - देशासाठी प्राणाची आहूती देणा-या सैनिकांप्रती काँग्रेस सरकारप्रमाणेच मोदी सरकार सुध्दा गंभीर नसल्याचा आरोप शहीद कॅप्टन सौरभ कालियाचे वडील डॉ. एन.के. कालिया यांनी केला आहे. कारगील युध्दातील शहीदांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालविण्यास केंद्रातील मोदी सरकारने नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या कालिया यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस सरकारपेक्षा भाजप सरकार जास्त देशभक्त असेल अशी आम्हाला आशा होती. पण देशातील सत्ता बदलानंतरही मोदी सरकारचा दृष्टिकोन तसाच असून हे आमच्यासाठी दुर्दैव आहे अशी खंत एन.के. कालिया यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवली.पाकिस्तानविरोधात भारताची कोणतीही ठोस रणनीती नसून कधी आपण पाकिस्तानशी क्रिकेट सामने खेळतो, चर्चा करतो तर कधी लढाई करतो. सत्तेत आल्यानंतर सर्व राजकीय पक्षांचा सूर मात्र एकसारखाच पाहायला मिळतो, असा आरोप डॉ. कालिया यांनी मोदी सरकारवर केला. सीमेवर लढणा-या सैनिकांचे प्रश्न हाताळण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसने आता भाजप सरकारवर टीका सुरू केली आहे. दरम्यान, भाजपने शहीदांचा अपमान केला आहे', असा आरोप काँग्रेस नेते पी.एल. पुनीया यांनी केला आहे. कारगिल युद्धात ४ रेजिमेंटचे कॅप्टन सौरभ कालिया आणि इतर पाच सैनिक अर्जून राम, भंवर लाल बागडिया, भिक्खा राम, मुलाराम आणि नरेश सिंह हे १६ मे १९९९ रोजी कारगिलच्या काकसर सब-सेक्टरमध्ये बेपत्ता झाले होते. त्यानंतर पुढच्या महिन्यात ९ जूनला पाकिस्तानने त्यांचे मृतदेह भारताच्या हवाली केले होते. पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असताना झालेल्या क्रूर मारहाणीत कॅप्टन सौरभ कालियासह हे पाचही जवान शहीद झाले होते. अतिशय छिन्नविछिन्न अवस्थेत त्यांचे मृतदेह पाकने भारताला सोपवले होते. याप्रकरणी शहीद कालियाच्या कुटुंबीयांनी सुप्रीम कोर्टात याचिका करत हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात नेण्याची मागणी केली होती. दरम्यान, याप्रकरणी २५ तारखेला होणाऱ्या पुढील सुनावणीत केंद्र सरकार आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.