शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

चंद्राबाबूंनी केले मुलालाही मंत्री

By admin | Updated: April 3, 2017 04:54 IST

वायएसआर काँग्रेसमधून तेलुगु देसममध्ये सहभागी झालेल्या चार आमदारांसह सहा जणांचा रविवारी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला

अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव नारा लोकेश व वायएसआर काँग्रेसमधून तेलुगु देसममध्ये सहभागी झालेल्या चार आमदारांसह सहा जणांचा रविवारी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. तर, पाच मंत्र्यांना मंत्रिमंंडळातून काढून टाकण्यात आले आहे. विधानसभेत वायएसआर काँग्रेसचे ६७ आमदार होते. फेब्रुवारी २०१६ पासून यातील २१ आमदार तेलुगु देसमसोबत गेले आहेत. तेलगु देसम- भाजपचे सरकार ८ जून २०१४ रोजी आल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळातील हा पहिला मोठा बदल आहे. यामुळे सत्तारुढ तेलुगु देसममध्येही असंतोष वाढला आहे. मंत्रिपदावरुन हटविण्यात आलेले एक मंत्री बी. गोपाल कृष्ण रेड्डी यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. चित्तूरचे आमदार असलेल्या रेड्डी यांनी रविवारी सकाळीच विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्याची एक प्रत मुख्यमंत्र्यांकडेही पाठविली आहे. तथापि, चंद्राबाबू नायडू यांनी बी गोपाल कृष्ण रेड्डी यांच्याशी फोनवरून चर्चा केली असून मंत्रिपदावरुन काढण्यामागची कारणे सांगितली असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यपाल ई. एस. एल. नरसिम्हन यांनी नव्या मंत्र्यांना वेलागपुडी येथे राज्य सरकारच्या मुख्यालयाजवळ एका कार्यक्रमात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आंध्र्र प्रदेशातील मंत्र्यांची संख्या आता २६ झाली आहे. यात विधान परिषदेतील चार सदस्य आहेत. मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या वायएसआरच्या चार आमदारात आर. व्ही. सुजाय कृष्ण राव, भूमा अखिल प्रिया, सी. आदिनारायण रेड्डी आणि एन. अमरनाथ रेड्डी यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था) >हा तर घटनेचा अपमानवायएसआरमधून तेलुगु देसमकडे गेलेल्या चार आमदारांना मंत्री करण्यात आल्यानंतर वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, हा घटनेचा आणि राज्याचा घोर अपमान आहे. आंध्रप्रदेशच्या राजकीय इतिहासातील हा काळा दिवस आहे. राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असूनही या घटनात्मक उल्लंघनात ते सहभागी झाले.