शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

चंद्राबाबूंनी केले मुलालाही मंत्री

By admin | Updated: April 3, 2017 04:54 IST

वायएसआर काँग्रेसमधून तेलुगु देसममध्ये सहभागी झालेल्या चार आमदारांसह सहा जणांचा रविवारी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला

अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव नारा लोकेश व वायएसआर काँग्रेसमधून तेलुगु देसममध्ये सहभागी झालेल्या चार आमदारांसह सहा जणांचा रविवारी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. तर, पाच मंत्र्यांना मंत्रिमंंडळातून काढून टाकण्यात आले आहे. विधानसभेत वायएसआर काँग्रेसचे ६७ आमदार होते. फेब्रुवारी २०१६ पासून यातील २१ आमदार तेलुगु देसमसोबत गेले आहेत. तेलगु देसम- भाजपचे सरकार ८ जून २०१४ रोजी आल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळातील हा पहिला मोठा बदल आहे. यामुळे सत्तारुढ तेलुगु देसममध्येही असंतोष वाढला आहे. मंत्रिपदावरुन हटविण्यात आलेले एक मंत्री बी. गोपाल कृष्ण रेड्डी यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. चित्तूरचे आमदार असलेल्या रेड्डी यांनी रविवारी सकाळीच विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्याची एक प्रत मुख्यमंत्र्यांकडेही पाठविली आहे. तथापि, चंद्राबाबू नायडू यांनी बी गोपाल कृष्ण रेड्डी यांच्याशी फोनवरून चर्चा केली असून मंत्रिपदावरुन काढण्यामागची कारणे सांगितली असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यपाल ई. एस. एल. नरसिम्हन यांनी नव्या मंत्र्यांना वेलागपुडी येथे राज्य सरकारच्या मुख्यालयाजवळ एका कार्यक्रमात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आंध्र्र प्रदेशातील मंत्र्यांची संख्या आता २६ झाली आहे. यात विधान परिषदेतील चार सदस्य आहेत. मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या वायएसआरच्या चार आमदारात आर. व्ही. सुजाय कृष्ण राव, भूमा अखिल प्रिया, सी. आदिनारायण रेड्डी आणि एन. अमरनाथ रेड्डी यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था) >हा तर घटनेचा अपमानवायएसआरमधून तेलुगु देसमकडे गेलेल्या चार आमदारांना मंत्री करण्यात आल्यानंतर वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, हा घटनेचा आणि राज्याचा घोर अपमान आहे. आंध्रप्रदेशच्या राजकीय इतिहासातील हा काळा दिवस आहे. राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असूनही या घटनात्मक उल्लंघनात ते सहभागी झाले.