शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

चंद्राबाबूंनी केले मुलालाही मंत्री

By admin | Updated: April 3, 2017 04:54 IST

वायएसआर काँग्रेसमधून तेलुगु देसममध्ये सहभागी झालेल्या चार आमदारांसह सहा जणांचा रविवारी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला

अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव नारा लोकेश व वायएसआर काँग्रेसमधून तेलुगु देसममध्ये सहभागी झालेल्या चार आमदारांसह सहा जणांचा रविवारी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. तर, पाच मंत्र्यांना मंत्रिमंंडळातून काढून टाकण्यात आले आहे. विधानसभेत वायएसआर काँग्रेसचे ६७ आमदार होते. फेब्रुवारी २०१६ पासून यातील २१ आमदार तेलुगु देसमसोबत गेले आहेत. तेलगु देसम- भाजपचे सरकार ८ जून २०१४ रोजी आल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळातील हा पहिला मोठा बदल आहे. यामुळे सत्तारुढ तेलुगु देसममध्येही असंतोष वाढला आहे. मंत्रिपदावरुन हटविण्यात आलेले एक मंत्री बी. गोपाल कृष्ण रेड्डी यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. चित्तूरचे आमदार असलेल्या रेड्डी यांनी रविवारी सकाळीच विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्याची एक प्रत मुख्यमंत्र्यांकडेही पाठविली आहे. तथापि, चंद्राबाबू नायडू यांनी बी गोपाल कृष्ण रेड्डी यांच्याशी फोनवरून चर्चा केली असून मंत्रिपदावरुन काढण्यामागची कारणे सांगितली असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यपाल ई. एस. एल. नरसिम्हन यांनी नव्या मंत्र्यांना वेलागपुडी येथे राज्य सरकारच्या मुख्यालयाजवळ एका कार्यक्रमात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आंध्र्र प्रदेशातील मंत्र्यांची संख्या आता २६ झाली आहे. यात विधान परिषदेतील चार सदस्य आहेत. मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या वायएसआरच्या चार आमदारात आर. व्ही. सुजाय कृष्ण राव, भूमा अखिल प्रिया, सी. आदिनारायण रेड्डी आणि एन. अमरनाथ रेड्डी यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था) >हा तर घटनेचा अपमानवायएसआरमधून तेलुगु देसमकडे गेलेल्या चार आमदारांना मंत्री करण्यात आल्यानंतर वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, हा घटनेचा आणि राज्याचा घोर अपमान आहे. आंध्रप्रदेशच्या राजकीय इतिहासातील हा काळा दिवस आहे. राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असूनही या घटनात्मक उल्लंघनात ते सहभागी झाले.