शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

सात अपक्षांचे आव्हान कायम गिरीश महाजनांनी फिरविले चक्र: देवकरांच्या माघारीने स्पर्धा संपली

By admin | Updated: November 5, 2016 22:48 IST

जळगाव : विधान परिषद निवडणुकीत केवळ भाजपा- शिवसेना नव्हे तर भाजपा-सेना-कॉँग्रेस- राष्ट्रवादी या चार पक्षांची युती असेच चित्र माघारीच्या शेवटच्या दिवशी समोर आले आहे. आणि या युतीची लढत होणार आहे ती सात अपक्षांशी. मात्र भाजपाने अर्धा गड जिंकल्याची आता परिस्थिती आहे.

जळगाव : विधान परिषद निवडणुकीत केवळ भाजपा- शिवसेना नव्हे तर भाजपा-सेना-कॉँग्रेस- राष्ट्रवादी या चार पक्षांची युती असेच चित्र माघारीच्या शेवटच्या दिवशी समोर आले आहे. आणि या युतीची लढत होणार आहे ती सात अपक्षांशी. मात्र भाजपाने अर्धा गड जिंकल्याची आता परिस्थिती आहे.
विधान परिषद निवडणूक लढविण्याचा निर्णय हा बहुतांश प्रमुख पक्षांनी घेतला होता. पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक लढविण्यासाठी व्यूहरचना तयार असल्याचे सांगण्यात येत होते. भाजपा विरुद्धची प्रत्येक निवडणूक लढवायचीच अशी भूमिका शिवसेनेने जाहीर केली होती. तीच भूमिका, कॉँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांचीही होती. उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍यानंतर शिवसेनेकडून विविध निवडणुकांची जय्यत तयारी सुरू करण्यात आली. त्यात विधान परिषदेचाही समावेश होता. याबाबत पक्षाचे संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी पक्षाचे आमदार व जिल्हा प्रमुखांची बैठक घेऊन निवडणुकीसाठीची संभाव्य तीन नावे निि›त करून मातोश्रीवर त्याबाबत चर्चाही केली. यातूनच धरणगावेच नगराध्यक्ष सुरेश चौधरी यांचे नाव पुढे आले होते. मात्र सुरेश चौधरींच्या उमेदवारी अर्जातच झालेल्या चुकीने त्यांची उमेदवारी अपक्ष ठरली तर आज त्यांच्यावर माघार घेण्याची वेळ आली.
देवकरांच्या माघारीने स्पर्धा संपली
या निवडणुकीसाठी ५४९ मतदार आहेत. यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचा वाटा मोठा आहे. त्यामुळे पक्षाने ठरविले असते तर देवकर बरीच मते मिळवू शकले असते. मात्र माघार घेणार्‍यांच्या रांगेत त्यांचा नंबर पहिला होता. त्यांनी माघार घेतल्याने भाजपाने गड अर्धा जिंकला अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर एक, एक जण माघारीसाठी पुढे येत गेला. गेल्या अनेक महिन्यांपासून निवडणुकीची तयारी करत असलेले उपमहापौर ललित कोल्हे, कॉँग्रेसच्या लता छाजेड, खाविआचे नगरसेवक नितीन बरडे यांच्यासह एकजण येत गेला व माघार घेत गेला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे स्वत: यासाठी प्रयत्न करत असल्याच लक्षात आले. केवळ ॲड. विजय पाटील यांचे मन वळविण्यात महाजन अपयश आले. बहुतांश राजकीय पक्षांचे पदाधिकारी आपल्या उमेदवारांना बरोबर घेऊन येत होते व माघारीची प्रक्रिया पूर्ण करून घेत होते. जणू सर्वच राजकीय पक्षांची युती असल्याचे चित्र या माघारी निमित्ताने समोर आले. त्यामुळे भाजपाचे उमेदवार चंदुलाल पटेल यांना अपक्षांशी लढावे लागणार हे आता निि›त झाले आहे.
---