शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

डाळींच्या भाववाढीने केंद्र सरकार चिंतित

By admin | Updated: October 22, 2015 04:04 IST

सणासुदीचे दिवस तोंडावर असताना डाळींचे दर २०० रुपये किलोवर गेल्यामुळे सरकार चिंतेत पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दरवाढ आणि पुरवठ्याबाबत मंत्रिमंडळाच्या

नवी दिल्ली : सणासुदीचे दिवस तोंडावर असताना डाळींचे दर २०० रुपये किलोवर गेल्यामुळे सरकार चिंतेत पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दरवाढ आणि पुरवठ्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेतला. दुसरीकडे मंत्रिमंडळ सचिवांनी डाळींच्या दरवाढीबाबत स्वतंत्रपणे आढावा चालविला आहे.महाराष्ट्र सरकारने मंगळवारी १६ जिल्ह्यांमध्ये २७६ ठिकाणी छापे घालत २३,३४० टन डाळ जप्त केल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. धाडसत्र सुरू असल्यामुळे विविध डाळींचे दर घसरत असल्याची नोंदही यावेळी घेण्यात आली. ग्राहक कल्याण मंत्रालयाने यापूर्वीच राज्य सरकारांना साठेबाजी आणि काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)व्यावसायिक वादांच्या निपटाऱ्यासाठी दोन वटहुकूमव्यावसायिक वादांचा तातडीने निपटारा करण्यासाठी दोन वटहुकूम जारी केले आहेत. लवाद आणि समेटासंबंधी कायद्यात दुरुस्ती करताना वाणिज्य न्यायालय, वाणिज्य विभाग आणि उच्च न्यायालयांमध्ये वाणिज्य अ‍ॅपिलेट स्थापन करण्यासंबंधी (कायदा २०१५) विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे प्रलंबित होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळाने लवाद कायद्यात सुधारणा केली; मात्र ते मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविले नव्हते. लवाद आणि समेट कायदा १९९६ सुधारणा करताना वाद १८ महिन्यांत सोडविणे अनिवार्य राहील. संबंधित दुसऱ्या कायद्यातील सुधारणेनुसार लवादाच्या शुल्कावर मर्यादा आणली जाणार आहे.दरमहा बोनसची कमाल मर्यादा आता सात हजार रुपयेकारखाना कामगारांसाठी दरमहा बोनसची कमाल मर्यादा आता सात हजार रुपये करण्यात आली आहे. २० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या उद्योगासाठी हा नियम लागू असेल. सध्या ही मर्यादा ३५०० रुपये आहे. सुधारित बदल १ एप्रिल २०१५ पासून लागू राहील. वेतनातून दिल्या जाणाऱ्या पात्र बोनसची मर्यादाही दरमहा १० हजार रुपयांवरून २१ हजार रुपये करण्यात आली आहे. सदर विधेयकामधील कलम १२ मध्ये करण्यात आलेल्या नव्या तरतुदीनुसार बोनसचा वेगवेगळा आधार ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारला असेल.