शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
4
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
5
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
6
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
9
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
10
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
11
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
12
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
13
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
14
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
15
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
16
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
17
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
18
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
19
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
20
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

केंद्रीय अर्थसंकल्प जानेवारी अखेरीस?

By admin | Updated: August 22, 2016 05:30 IST

नवे वित्तीय वर्ष एप्रिलमध्ये सुरू होण्याआधी अर्थसंकल्प आणि विनियोजन विधेयक मंजुरीची सर्व संसदीय प्रक्रिया पूर्ण करता यावी

नवी दिल्ली : नवे वित्तीय वर्ष एप्रिलमध्ये सुरू होण्याआधी अर्थसंकल्प आणि विनियोजन विधेयक मंजुरीची सर्व संसदीय प्रक्रिया पूर्ण करता यावी यासाठी यंदापासून केंद्रीय अर्थसंकल्प नेहमीपेक्षा महिनाभर आधी मांडण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहेत. गेली कित्येक दशके अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मांडण्याची प्रथा आहे. त्याऐवजी तो जानेवारीच्या अखेरीस मांडावा, असा सरकारचा विचार आहे.सध्या संपूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प आणि वर्षभराच्या खर्च मंजुरीची प्रक्रिया सध्या फेब्रुवारी ते मे या तीन महिन्यांत पार पाडली जाते. त्यानुसार फेब्रुवारीच्या अखेरीस अर्थसंकल्प मांडल्यावर तो मंजूर होईपर्यंत एप्रिलपासूनच्या दोन-तीन महिन्यांसाठीच्या खर्चासाठी पुरवणी मांगण्या मांडल्या जातात. नंतर एप्रिल-मेमध्ये संपूर्ण अर्थसंकल्प व विनियोजन विधेयक मंजूर झाल्यावर संसदीय प्रक्रिया पूर्ण होते व विविध खात्यांच्या वर्षभराच्या नियोजित खर्चाला मंजुरी घेतली जाते.राज्यघटनेत अर्थसंकल्प मंजुरीची सविस्तर तरतूद आहे, परंतु तो अमूक तारखेलाच मांडावा असे कोणतेही बंधन नाही. त्यामुळे वित्त मंत्रालयाचा असा विचार आहे की, फेब्रुवारीऐवजी जानेवारीच्या अखेरीस अर्थसंकल्प मांडल्यास त्यास मंजुरी घेण्याची सर्व प्रक्रिया नवे वित्तीय वर्ष एप्रिलमध्ये सुरू होण्याआधी एकाच टप्प्यात पूर्ण करता येईल व तात्कालिक खर्चासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची गरज राहणार नाही.हा बदल प्रत्यक्षात आला तर सर्व संबंधित क्षेत्रांसोबत सध्या घेतल्या जाणाऱ्या अर्थ संकल्पपूर्व बैठकीही नोव्हेंबर-डिसेंबरऐवजी सप्टेंबरमध्येच घेतल्या जाण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)>खर्चाचे वर्गीकरणही बदलणारयापुढे खर्चाचे वर्गीकरण ‘नियोजन खर्च’ व ‘नियोजनबाह्य खर्च’ असे न करता ‘महसुली खर्च’ व ‘भांडवली खर्च’ असे केले जाईल.स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प न मांडता इतर सरकारी खात्यांप्रमाणे रेल्वेचा अंतर्भावही सर्वसाधारण अर्थसंकल्पात करण्यात येईल.ठरल्याप्रमाणे येत्या १ एप्रिलपासून ‘जीएसटी’ लागू झाल्यास अर्थसंकल्पात फक्त प्रत्यक्ष करांचे प्रस्ताव असतील. उत्पादन शुल्क, सेवाकर आणि उपकर यासारखे केंद्रीय प्रत्यक्ष कर ‘जीएसटी’मध्ये सामावले जातील.वित्तीय वर्ष सध्याप्रमाणे एप्रिल-मार्च असेच असावे की त्यात काही बदल करावेत यावर विचार करण्यासाठी सरकारने एक समिती नेमली आहे. तिचा अहवाल डिसेंबरमध्ये अपेक्षित आहे.