शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

दुष्काळावर केंद्राची २ हजार कोटींची मदत

By admin | Updated: March 25, 2015 02:36 IST

दुष्काळाच्या दुष्टचक्र ात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ६ हजार कोटींची मदत मागितल्यानंतर तब्बल साडे तीन महिन्यांनी केंद्र सरकारने २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

सर्वाधिक पॅकेज : अवकाळी मदत राज्यानेच उभारावीनवी दिल्ली : दुष्काळाच्या दुष्टचक्र ात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ६ हजार कोटींची मदत मागितल्यानंतर तब्बल साडे तीन महिन्यांनी केंद्र सरकारने २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. ही रक्कम मागणीच्या अवघी ३३ टक्के असली तरी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीने देऊ केलेली रक्कम केंद्राच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात येत असून, राज्यानेच शेतकऱ्यांना राज्य आपत्ती निधीतून मदत करावी, अशी भूमिका उच्चस्तरीय समितीने घेतली. त्यानुसार मदतीचे वर्गीकरण न करता आपत्ती निवारणाच्या निकषानुसार तिचे वाटप राज्य सरकार करेल असे केंद्राने स्पष्ट केले. मागच्या वर्षी केंद्राने ५०० कोटींची मदत केली होती, यंदा २ हजार कोटींची केली आहे, असे मोठ्या अभिमानाने कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांनी सांगितले. राज्य सरकारने केंद्राकडे ६ हजार कोटींच्या मदतीचा प्रस्ताव सादर केला होता. राज्यातील २३ हजार ८११ गावांमध्ये सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती असून, केंद्राने मदत करावी म्हणून राज्य सरकारने सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा केला होता. जादा मदतीचे पॅकेज सरकार मागतच असते, मात्र केंद्र व राज्याशी समन्वय साधून समितीने दुष्काळी मदतीचा निर्णय घेतला. अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने राज्य आपत्ती निवारण कोषातून भरपाई द्यावी. - राधा मोहन सिंग, कृषिमंत्री