शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

दुष्काळावर केंद्राची २ हजार कोटींची मदत

By admin | Updated: March 25, 2015 02:36 IST

दुष्काळाच्या दुष्टचक्र ात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ६ हजार कोटींची मदत मागितल्यानंतर तब्बल साडे तीन महिन्यांनी केंद्र सरकारने २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

सर्वाधिक पॅकेज : अवकाळी मदत राज्यानेच उभारावीनवी दिल्ली : दुष्काळाच्या दुष्टचक्र ात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ६ हजार कोटींची मदत मागितल्यानंतर तब्बल साडे तीन महिन्यांनी केंद्र सरकारने २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. ही रक्कम मागणीच्या अवघी ३३ टक्के असली तरी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीने देऊ केलेली रक्कम केंद्राच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात येत असून, राज्यानेच शेतकऱ्यांना राज्य आपत्ती निधीतून मदत करावी, अशी भूमिका उच्चस्तरीय समितीने घेतली. त्यानुसार मदतीचे वर्गीकरण न करता आपत्ती निवारणाच्या निकषानुसार तिचे वाटप राज्य सरकार करेल असे केंद्राने स्पष्ट केले. मागच्या वर्षी केंद्राने ५०० कोटींची मदत केली होती, यंदा २ हजार कोटींची केली आहे, असे मोठ्या अभिमानाने कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांनी सांगितले. राज्य सरकारने केंद्राकडे ६ हजार कोटींच्या मदतीचा प्रस्ताव सादर केला होता. राज्यातील २३ हजार ८११ गावांमध्ये सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती असून, केंद्राने मदत करावी म्हणून राज्य सरकारने सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा केला होता. जादा मदतीचे पॅकेज सरकार मागतच असते, मात्र केंद्र व राज्याशी समन्वय साधून समितीने दुष्काळी मदतीचा निर्णय घेतला. अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने राज्य आपत्ती निवारण कोषातून भरपाई द्यावी. - राधा मोहन सिंग, कृषिमंत्री