शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्याविरोधात सेनेचा शिंगाडे मोर्चा कर्ज पुनर्गगठन प्रश्नी गुलाबरावांची खडसेंवर टीका

By admin | Updated: May 14, 2016 00:02 IST

जळगाव : शेतकर्‍यांच्या पीक कर्जाच्या पुनर्गठनाबाबत जिल्हा बँकेकडून होणार्‍या टाळाटाळला शिवसेनेने शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढून जोरदार उत्तर दिले. यावेळी शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर टिकास्त्र सोडत पीक कर्जाचे पुनर्गठन न केल्यास शेतकरी आत्महत्येचा इशारा दिला.

जळगाव : शेतकर्‍यांच्या पीक कर्जाच्या पुनर्गठनाबाबत जिल्हा बँकेकडून होणार्‍या टाळाटाळला शिवसेनेने शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढून जोरदार उत्तर दिले. यावेळी शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर टिकास्त्र सोडत पीक कर्जाचे पुनर्गठन न केल्यास शेतकरी आत्महत्येचा इशारा दिला.
गेल्या काही महिन्यांपासून महसूलमंत्री एकनाथराव खडसे व शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांच्यात जिल्हा बँकेच्या कर्ज वितरण प्रकरणी राजकीय वाद सुरू आहे. याप्रकरणी आमदार गुलाबराव पाटील यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल आहे. काही वर्षांपूर्वी धरणगाव तालुक्यात टिश्यू कल्चर केळीसाठी दिलेल्या कर्जाचा दुरुपयोग झाल्याप्रकरणी जिल्हा बँकेने धरणगाव तालुक्यातील ५१ विकासोची चौकशी सुरु केली आहे. आमदार गुलाबराव पाटील यांनीदेखील हे कर्ज घेतल्याप्रकरणी जिल्हा बँकेने त्यांच्या कर्जाचे कागदपत्रे मागविले आहेत. याप्रकरणी खडसेंच्या दबावतंत्राला उत्तर म्हणून शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शहर दणाणून सोडले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर तेथे झालेल्या सभेत आमदार गुलाबराव पाटील यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या टिकेचा संपूर्ण रोख हा महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर होता. शेतकर्‍यांच्या कर्ज पुनर्गठनाबाबत तसेच पीक कर्जाबाबत खडसे कसा अन्याय करीत आहेत, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जि.प. सीईओंवरही आगपाखड केली.

जिल्हा बँकेच्या चेअरमन या खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर आहेत. सत्तेत भाजपा-सेना असतानाही शिवसेनेने शिंगाडे मोर्चा काढून शेतकर्‍यांच्या प्रश्नावर मोर्चा काढून नागरिकांचे व प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले, हे विशेष.

चौकट
प्रत्येक गावातून पाच शेतकरी आत्महत्या
शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठन तसेच अन्य मागण्यांबाबत १५ दिवसांत निर्णय न झाल्यास प्रत्येक गावातून पाच शेतकरी आत्महत्या करणार असल्याचा इशारा गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना निवेदन देताना दिला. कर्ज पुनर्गठनासंदर्भात सोमवारी बैठक घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह शेतकर्‍यांना दिले.