शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

जिल्हा बँकेच्याविरोधात सेनेचा शिंगाडे मोर्चा कर्ज पुनर्गगठन प्रश्नी गुलाबरावांची खडसेंवर टीका

By admin | Updated: May 14, 2016 00:02 IST

जळगाव : शेतकर्‍यांच्या पीक कर्जाच्या पुनर्गठनाबाबत जिल्हा बँकेकडून होणार्‍या टाळाटाळला शिवसेनेने शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढून जोरदार उत्तर दिले. यावेळी शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर टिकास्त्र सोडत पीक कर्जाचे पुनर्गठन न केल्यास शेतकरी आत्महत्येचा इशारा दिला.

जळगाव : शेतकर्‍यांच्या पीक कर्जाच्या पुनर्गठनाबाबत जिल्हा बँकेकडून होणार्‍या टाळाटाळला शिवसेनेने शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढून जोरदार उत्तर दिले. यावेळी शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर टिकास्त्र सोडत पीक कर्जाचे पुनर्गठन न केल्यास शेतकरी आत्महत्येचा इशारा दिला.
गेल्या काही महिन्यांपासून महसूलमंत्री एकनाथराव खडसे व शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांच्यात जिल्हा बँकेच्या कर्ज वितरण प्रकरणी राजकीय वाद सुरू आहे. याप्रकरणी आमदार गुलाबराव पाटील यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल आहे. काही वर्षांपूर्वी धरणगाव तालुक्यात टिश्यू कल्चर केळीसाठी दिलेल्या कर्जाचा दुरुपयोग झाल्याप्रकरणी जिल्हा बँकेने धरणगाव तालुक्यातील ५१ विकासोची चौकशी सुरु केली आहे. आमदार गुलाबराव पाटील यांनीदेखील हे कर्ज घेतल्याप्रकरणी जिल्हा बँकेने त्यांच्या कर्जाचे कागदपत्रे मागविले आहेत. याप्रकरणी खडसेंच्या दबावतंत्राला उत्तर म्हणून शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शहर दणाणून सोडले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर तेथे झालेल्या सभेत आमदार गुलाबराव पाटील यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या टिकेचा संपूर्ण रोख हा महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर होता. शेतकर्‍यांच्या कर्ज पुनर्गठनाबाबत तसेच पीक कर्जाबाबत खडसे कसा अन्याय करीत आहेत, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जि.प. सीईओंवरही आगपाखड केली.

जिल्हा बँकेच्या चेअरमन या खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर आहेत. सत्तेत भाजपा-सेना असतानाही शिवसेनेने शिंगाडे मोर्चा काढून शेतकर्‍यांच्या प्रश्नावर मोर्चा काढून नागरिकांचे व प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले, हे विशेष.

चौकट
प्रत्येक गावातून पाच शेतकरी आत्महत्या
शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठन तसेच अन्य मागण्यांबाबत १५ दिवसांत निर्णय न झाल्यास प्रत्येक गावातून पाच शेतकरी आत्महत्या करणार असल्याचा इशारा गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना निवेदन देताना दिला. कर्ज पुनर्गठनासंदर्भात सोमवारी बैठक घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह शेतकर्‍यांना दिले.