शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
3
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
8
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
9
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
10
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
11
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
12
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
13
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
14
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
15
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
16
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
17
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
18
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

नव्या तेलंगण राज्याची वर्षपूर्ती उत्साहात साजरी

By admin | Updated: June 4, 2015 00:30 IST

स्वतंत्र राज्यासाठी तब्बल पाच दशकांच्या संघर्षानंतर अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र तेलंगणने मंगळवारी आपला पहिला स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला

हैदराबाद : स्वतंत्र राज्यासाठी तब्बल पाच दशकांच्या संघर्षानंतर अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र तेलंगणने मंगळवारी आपला पहिला स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. आंध्र प्रदेशचे विभाजन करून स्थापन करण्यात आलेले तेलंगण हे भारतातील २९ वे राज्य आहे. गेल्यावर्षी घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र राज्य निर्मितीच्या लढ्यात प्रमुख भूमिका बजावणारे तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांची राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती.२ जून २०१४ रोजी आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगण नावाचे भारताचे २९ वे राज्य उदयास आले होते. या राज्याच्या निर्मितीच्या विरोधात सीमांध्रात हिंसक आंदोलनही करण्यात आले. शेती संकट आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मुद्यांवरून विरोधकांनी टीकेची झोड उठविली असली तरी सत्तारूढ टीआरएसने मागील वर्षभरात अनेक जनकल्याणकारी आणि विकासाच्या योजना जाहीर केल्या आहेत.तेलंगणच्या पुनर्रचनेसाठी कटिबद्ध असलेले मुख्यमंत्री राव यांनी पेयजल, रस्ते बांधणी, महिला सुरक्षा आणि औद्योगिक धोरण आदी क्षेत्रांसाठी अनेक योजना आणि कार्यक्रमांचे उद्घाटन केलेले आहे. त्यात ३ कोटी लोकसंख्येला पिण्याचे पाणी पुरविणारा तेलंगण पेयजल पुरवठा प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्प ३८.५ कोटी रुपये खर्चाचा आहे. याशिवाय राज्य सरकारने अनेक सिंचन प्रकल्पांचे कामही हाती घेतले आहे.काही महिन्यांपूर्वी राज्यात विजेचा तुटवडा होता; परंतु आता राज्यात पुरेशी वीज उपलब्ध आहे आणि राज्य विजेच्या बाबतीत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. तेलंगणला भारतातील ऊर्जा आधिक्य असलेल्या राज्य बनविण्याच्या प्रयत्नात तब्बल ९१ हजार कोटींची गुंतवणूक आणण्यात सरकारला यश आले आहे. अन्य राज्यांना वीजपुरवठा करणारे राज्य बनविण्याचा सरकारचा मानस आहे, असे मुख्यमंत्री राव यांनी राज्य स्थापना दिनाच्या कार्यक्रमात सांगितले.