शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
3
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
6
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
7
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
8
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
9
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
10
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
11
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
12
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
13
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
14
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
15
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
16
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
17
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
18
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
19
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
20
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

नव्या तेलंगण राज्याची वर्षपूर्ती उत्साहात साजरी

By admin | Updated: June 4, 2015 00:30 IST

स्वतंत्र राज्यासाठी तब्बल पाच दशकांच्या संघर्षानंतर अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र तेलंगणने मंगळवारी आपला पहिला स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला

हैदराबाद : स्वतंत्र राज्यासाठी तब्बल पाच दशकांच्या संघर्षानंतर अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र तेलंगणने मंगळवारी आपला पहिला स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. आंध्र प्रदेशचे विभाजन करून स्थापन करण्यात आलेले तेलंगण हे भारतातील २९ वे राज्य आहे. गेल्यावर्षी घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र राज्य निर्मितीच्या लढ्यात प्रमुख भूमिका बजावणारे तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांची राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती.२ जून २०१४ रोजी आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगण नावाचे भारताचे २९ वे राज्य उदयास आले होते. या राज्याच्या निर्मितीच्या विरोधात सीमांध्रात हिंसक आंदोलनही करण्यात आले. शेती संकट आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मुद्यांवरून विरोधकांनी टीकेची झोड उठविली असली तरी सत्तारूढ टीआरएसने मागील वर्षभरात अनेक जनकल्याणकारी आणि विकासाच्या योजना जाहीर केल्या आहेत.तेलंगणच्या पुनर्रचनेसाठी कटिबद्ध असलेले मुख्यमंत्री राव यांनी पेयजल, रस्ते बांधणी, महिला सुरक्षा आणि औद्योगिक धोरण आदी क्षेत्रांसाठी अनेक योजना आणि कार्यक्रमांचे उद्घाटन केलेले आहे. त्यात ३ कोटी लोकसंख्येला पिण्याचे पाणी पुरविणारा तेलंगण पेयजल पुरवठा प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्प ३८.५ कोटी रुपये खर्चाचा आहे. याशिवाय राज्य सरकारने अनेक सिंचन प्रकल्पांचे कामही हाती घेतले आहे.काही महिन्यांपूर्वी राज्यात विजेचा तुटवडा होता; परंतु आता राज्यात पुरेशी वीज उपलब्ध आहे आणि राज्य विजेच्या बाबतीत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. तेलंगणला भारतातील ऊर्जा आधिक्य असलेल्या राज्य बनविण्याच्या प्रयत्नात तब्बल ९१ हजार कोटींची गुंतवणूक आणण्यात सरकारला यश आले आहे. अन्य राज्यांना वीजपुरवठा करणारे राज्य बनविण्याचा सरकारचा मानस आहे, असे मुख्यमंत्री राव यांनी राज्य स्थापना दिनाच्या कार्यक्रमात सांगितले.