शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

सीडीसाठी : अतिदुर्गम भागात सूक्ष्म अन्नद्रव्य घटकांच्या वापरावर भर! पंदेकृविचा उपक्रम : आदिवासी शेतकर्‍यांना प्रशिक्षण

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

अकोला- आदिवासी आणि अतिदुर्गम भागात कुपोषणासारख्या समस्यांचा सामना करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य घटकांचा वापर करून पोषक आहार आदिवासींना मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अतिदुर्गभ भागातील शेतकर्‍यांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आदिवासी शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले असून, ९ फेब्रुवारी रोजी मेळघाटातील चांदपूर-टेंभ्रूसोंडा या दुर्गम भागातील गावात शेतकर्‍यांना पोषक आहार व आरोग्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य घटक याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

अकोला- आदिवासी आणि अतिदुर्गम भागात कुपोषणासारख्या समस्यांचा सामना करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य घटकांचा वापर करून पोषक आहार आदिवासींना मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अतिदुर्गभ भागातील शेतकर्‍यांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आदिवासी शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले असून, ९ फेब्रुवारी रोजी मेळघाटातील चांदपूर-टेंभ्रूसोंडा या दुर्गम भागातील गावात शेतकर्‍यांना पोषक आहार व आरोग्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य घटक याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
मानवी आरोग्यासाठी अन्नद्रव्यातील सूक्ष्म घटक महत्त्वपूर्ण आहेत. विशेषत: ज्या भागात कुपोषणाची समस्या अधिक आहे, अशा भागात सूक्ष्म अन्नघटकांचे महत्त्व अधिकच वाढते. कुपोषणासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी आरोग्यविषयक उपाययोजनांसोबतच पोषक आहारही महत्त्वाचा आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागातर्फे अखिल भारतीय समन्वयित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्पातील आदिवासी साहाय्यक योजनेंतर्गत अतिदुर्गम भागातील आदिवासी शेतकर्‍यांना पीक उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्याचे महत्त्व पटवून सांगण्याकरिता कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. अमरावती जिल्‘ात मेळघाटामध्ये या कार्यशाळा घेण्यात येत आहेत. पंदेकृविचे संशोधक संचालक डॉ. डी.एम मानकर, मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.डी.बी. तामगाडगे यांच्या उपस्थितीत चांदपूर-टेंभ्रूसोंडा येथे शेकडो आदिवासींना सुधारित तंत्रज्ञानाचे धडे देण्यात आले. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे महत्त्व आदिवासी शेतकर्‍यांना पटवून सांगण्यात आले. डॉ. राजेंद्र काटकर यांनी पीक पोषण व मानवी आरोग्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व विशद केले. माती नमुना तपासणी करून अन्नद्रव्य व्यवस्थापन करून जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवता येते. याबाबत डॉ.डी.व्ही. माळी आणि डॉ.एन.एम. कोंडे यांनी माहिती दिली. (प्रतिनिधी)
........
बॉक्स
जस्ताचा वापर
गहू व हरभरा पिकांकरिता जस्ताचा वापर आवश्यक आहे. जस्त वापरासंबंधी माहिती आदिवासी शेतकर्‍यांना कृषी शास्त्रांनी दिली. दुर्गम भागात शास्त्रांनी आदिवासी शेतकर्‍यांना आधुनिक पद्धतीने शेती करून पोषक अन्नधान्य पिकांबाबत माहिती दिली. त्यामुळे आदिवासीबहुल भागातील कुपोषणासारख्या समस्येचे निराकरण करण्यास मदत होणार आहे.
....................