शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

सीबीएसई बारावीत मुलींची बाजी

By admin | Updated: May 26, 2015 02:27 IST

सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन, दिल्ली(सीबीएसई) मंडळामार्फत मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल सोमवारी जाहीर झाला.

दिल्लीची एम. गायत्री देशात पहिली : मुलांमध्ये केरळचा बी. अर्जुन प्रथममुंबई : सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन, दिल्ली(सीबीएसई) मंडळामार्फत मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल सोमवारी जाहीर झाला. ८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दिल्लीच्या एम. गायत्री हिने ४९६ गुण मिळवित देशात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे; तर मुलांमध्ये केरळ येथील बी. अर्जुन याने ४९५ टक्के गुण मिळवत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. या परीक्षेत मुलींनी बाजी मारली. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला देशभरातून १० लाख ४० हजार ३६८ विद्यार्थी बसले होते. गत वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १.२ टक्क्यांनी वाढली असली तरी निकालाचा टक्का घसरला आहे. या निकालात तिरूअनंतपुरम् विभागाने बाजी मारली आहे. तिरूअनंतपुरम्चा निकाल सर्वाधिक म्हणजे ९५.४१ टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाचा निकाल ९१.१४ टक्के लागला आहे. तर तिसऱ्या स्थानावर दिल्ली विभागाचा निकाल ८६.१३ टक्के नोंदविण्यात आला आहे. सीबीएसईच्या १० विभागांमध्ये ६८.७७ टक्के इतका सर्वांत कमी निकाल गुहाटी विभागाचा लागला आहे. परीक्षेला बसलेल्या मुलींचा एकूण निकाल ८७.५६ टक्के लागला आहे; तर मुलांचा निकाल ७७.७७ टक्के लागला आहे. देशभरात दिल्लीच्या एम. गायत्री हिने प्रथम क्रमांक पटकविला असून, उत्तर प्रदेशातील मिथाली मिश्रा हिने ४९५ गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळवला आहे. तिसऱ्या क्रमांकावर केरळ येथील बी. अर्जुन असून, तो मुलांमध्ये देशातून पहिला आला आहे. (प्रतिनिधी)पुणे : शिरूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील चिन्मय कुमार साहू याने ९५़४० टक्के गुण मिळवत अपंग विद्यार्थ्यांमध्ये देशात १०वा क्रमांक पटकावला आहे.बारावीच्या परीक्षेबरोबरच मी आयआयटी प्रवेश पूर्व परीक्षेचा अभ्यासही करत होतो. मी वर्षभर केवळ एनसीआरटीईच्या पुस्तकांचा मन लावून अभ्यास केला. मी दररोज १० ते १२ तास अभ्यास करत होतो.- चिन्मय कुमार साहू