शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

देशात आजही जातीयवाद कायम - राहुल गांधी

By admin | Updated: June 2, 2015 17:55 IST

देशातील दलितांचे अधिकार हिरावून घेतले जात असून देशात आजही जातीयवाद कायम असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.

ऑनलाइन लोकमत महु, दि. २ - देशातील दलितांचे अधिकार हिरावून घेतले जात असून देशात आजही जातीयवाद कायम असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या कार्यक्रमाला काँग्रेसने मध्यप्रदेशातील महू येथून आजपासून प्रारंभ केला त्यावेळी राहुल गांधी बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेल्या मध्यप्रदेशातील महू गावाची निवड करुन आम्हीच बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार आहोत असे दाखविणा-या काँग्रेस आणि २०१५ ते २०१६ हे वर्ष आंबेडकर यांची १२५ वे जयंती वर्ष देशभर साजरे करणार असल्याची घोषणा करणारे केंद्रातील भाजप सरकारमध्ये पुन्हा एकदा आंबेडकर यांच्या श्रेयवादावरुन जुंपणार असल्याचे दिसत आहे. देशात जातीयवाद संपवण्याचं बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याचे सांगत राहुल गांधी म्हणाले की, केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्याची रिंगटोन वाजवली म्हणून दलित तरुणाची हत्या होतेय, केवळ मुस्लीम असल्यानं युवकाला नौकरी नाकारली जातेय, तसेच केंद्र सरकारवर टीका केली म्हणून मद्रास आयआयटीमध्ये आंबेडकर-पेरीयार या दलित संघटनेवर बंदी घातली जातेय हा दलितांचे हक्क हिरावले जात असल्याचाच प्रकार आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. देशात जातीधर्माच्या आधारावर भेदभाव व्हायला नाही पाहिजे. संविधानात सर्व धर्मांना समानतेचा अधिकार बहाल करण्यात आला असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेसने शिक्षण आणि भोजन अधिकार हा सर्व गरीब व्यक्तींसाठी दिला असल्याचे आठवण करुन दिली. देशातील जातीयवाद संपवण्यासाठी तरुणांनी एकत्र यायला हवे असे आवाहन राहुल गांधी यावेळी केले.