शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

देशात आजही जातीयवाद कायम - राहुल गांधी

By admin | Updated: June 2, 2015 17:55 IST

देशातील दलितांचे अधिकार हिरावून घेतले जात असून देशात आजही जातीयवाद कायम असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.

ऑनलाइन लोकमत महु, दि. २ - देशातील दलितांचे अधिकार हिरावून घेतले जात असून देशात आजही जातीयवाद कायम असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या कार्यक्रमाला काँग्रेसने मध्यप्रदेशातील महू येथून आजपासून प्रारंभ केला त्यावेळी राहुल गांधी बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेल्या मध्यप्रदेशातील महू गावाची निवड करुन आम्हीच बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार आहोत असे दाखविणा-या काँग्रेस आणि २०१५ ते २०१६ हे वर्ष आंबेडकर यांची १२५ वे जयंती वर्ष देशभर साजरे करणार असल्याची घोषणा करणारे केंद्रातील भाजप सरकारमध्ये पुन्हा एकदा आंबेडकर यांच्या श्रेयवादावरुन जुंपणार असल्याचे दिसत आहे. देशात जातीयवाद संपवण्याचं बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याचे सांगत राहुल गांधी म्हणाले की, केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्याची रिंगटोन वाजवली म्हणून दलित तरुणाची हत्या होतेय, केवळ मुस्लीम असल्यानं युवकाला नौकरी नाकारली जातेय, तसेच केंद्र सरकारवर टीका केली म्हणून मद्रास आयआयटीमध्ये आंबेडकर-पेरीयार या दलित संघटनेवर बंदी घातली जातेय हा दलितांचे हक्क हिरावले जात असल्याचाच प्रकार आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. देशात जातीधर्माच्या आधारावर भेदभाव व्हायला नाही पाहिजे. संविधानात सर्व धर्मांना समानतेचा अधिकार बहाल करण्यात आला असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेसने शिक्षण आणि भोजन अधिकार हा सर्व गरीब व्यक्तींसाठी दिला असल्याचे आठवण करुन दिली. देशातील जातीयवाद संपवण्यासाठी तरुणांनी एकत्र यायला हवे असे आवाहन राहुल गांधी यावेळी केले.