शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

कॉल ड्रॉप झाल्यास नुकसानभरपाईचा आदेश SC कडून रद्द, ग्राहकांना झटका

By admin | Updated: May 11, 2016 16:24 IST

मोबाइल कॉल ड्रॉप झाल्यास दूरसंचार कंपन्यांनी ग्राहकाला नुकसान भरपाई द्यावी हा दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (TRAI) आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ -  मोबाइल कॉल ड्रॉप झाल्यास दूरसंचार कंपन्यांनी ग्राहकाला नुकसान भरपाई द्यावी हा दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (TRAI) आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. 
ग्राहकांच्या हितासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरणने कॉल ड्रॉप झाल्यास दूरसंचार कंपन्यांना दंड करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाविरोधात दूरसंचार कंपन्यांनी कोर्टात धाव घेतली. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने ट्रायचा निर्णय योग्य ठरवला. त्याविरोधात कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असता न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली होती. अखेर आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने 'ट्राय'चा हा निर्णय निरर्थक असल्याचे सांगत तो रद्द केला आहे.
 
 
काय होता आधीचा निकाल...
 
हायकोर्टाने ठरवला होता कॉल ड्रॉपसाठी भरपाईचा आदेश योग्य
 
नवी दिल्ली : १ जानेवारी २०१६ पासून मोबाईल आॅपरेटर्सना कॉल ड्रॉपसाठी ग्राहकांना भरपाई देणे बंधनकारक ठरविणारा ‘ट्राय’चा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने योग्य ठरविला आहे.
 
भारतीय सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आणि वोडाफोन, भारती एअरटेल व रिलायन्ससह २१ दूरसंचार आॅपरेटर्सद्वारा दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळताना मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्या. जयंत नाथ यांच्या पीठाने ट्रायचा आदेश उचलून धरला. ‘आम्ही ट्रायच्या आदेशाची वैधता मान्य करतो,’ असे या पीठाने स्पष्ट केले. या रिट याचिका दाखल केल्यापासून आम्ही भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण (ट्राय)च्या अधिसूचनेला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे दूरसंचार आॅपरेटर्स १ जानेवारी २०१६ पासून हा निर्णय अमलात आणण्यास मोकळे आहेत. कायद्याच्या कलम ३६ अन्वये नियम तयार करण्याच्या ट्रायच्या अधिकाराबद्दल वाद नाही. ग्राहकांचे हित लक्षात घेऊनच हा नियम तयार करण्यात आला आहे, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.