शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

कार, बस आणि मोटारसायकल इथेनॉलवर धावणार

By admin | Updated: November 30, 2015 01:01 IST

येत्या प्रजासत्ताक दिनापासून शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या कार, बस आणि मोटारसायकली देशाच्या रस्त्यांवर धावताना दिसतील

मुजफ्फरनगर : येत्या प्रजासत्ताक दिनापासून शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या कार, बस आणि मोटारसायकली देशाच्या रस्त्यांवर धावताना दिसतील, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले, पश्चिम उत्तर प्रदेश हे ऊस उत्पादक क्षेत्र असतानाही येथे उसाची वसुली आणि उत्पादन महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. शेतकऱ्यांनी उसाची लागवड करताना दोन उसांमध्ये सहाऐवजी आठ इंचाचे अंतर ठेवावे आणि या मधल्या जागेत खाद्यान्न पेरावे. उसापासून साखर तयार होते आणि उसाच्या चिपाडांपासून इथेनॉल तयार केले जात आहे. आता ब्राझीलप्रमाणे भारतातही इथेनॉलवर कार, बस आणि मोटारसायकली चालताना दिसतील. येत्या २६ जानेवारीपासून हा प्रयोग केला जाणार आहे.इथेनॉलने वाहन चालविण्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त होईल. या संदर्भात वाहन बनविणाऱ्या काही कंपन्यांनी इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकली तयार केल्या आहेत, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रात ५० भाजप कार्यकर्त्यांना इथेनॉल पंपसाठी परवाना देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील भाजप कार्यकर्त्यांनाही असे परवाने दिले जातील. केंद्र सरकार शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी धोरण आखत आहे. त्यासंदर्भात ११ ते १४ डिसेंबर या काळात नागपुरात एका कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात देशभरातील अडीच लाखांवर शेतकरी भाग घेतील. त्यात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे, पीकचक्र बदलणे आणि शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न मिळवून देणारी पिके घेण्यास प्रोत्साहन दिले जाईल. त्यामुळे युवकांना रोजगार मिळेल व साखर कारखान्यांची एकाधिकारशाही संपुष्टात येईल, असे गडकरी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)