शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

शांततेच्या मार्गावर एकटे जाता येत नाही - नरेंद्र मोदी

By admin | Updated: January 17, 2017 19:34 IST

मी लाहोरला सुद्धा गेलो होतो, परंतु शांततेच्या मार्गावर एकटे जाता येत नाही. मला शेजारील राष्ट्रांशी संबंध चांगले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर उपरोधिक टीका केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 -  मी लाहोरला सुद्धा गेलो होतो, परंतु शांततेच्या मार्गावर एकटे जाता येत नाही. मला शेजारील राष्ट्रांशी संबंध चांगले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर उपरोधिक टीका केली. राजधानी दिल्लीतील दुस-या 'रायसिना डायलॉग'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी अनेक देशांतील 250 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
 
जे लोक हिंसा, तिरस्कार आणि दहशतवाद्यांना खतपाणी घालतात. त्यांना आम्ही एकाकी पाडले असून दहशतवादाला सळो की पळो केलं आहे. तसेच, जगातील संपूर्ण दहशतवादाचा नायनाट करण्यात येईल. ग्लोबल वार्मिंगचा सामना करण्यासाठी आम्ही कठोर पाऊले उचलली असून तसे प्रयत्नही सुरु केले आहेत, असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी यावेळी अनेक मुद्दावर भाष्य केले. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काही मुद्दे - 
- ग्लोबल वार्मिंगचा सामना करण्यासाठी आम्ही कठोर पाऊले उचलली असून तसे प्रयत्नही सुरु केले आहेत. 
- जे लोक हिंसा, तिरस्कार आणि दहशतवाद्यांना खतपाणी घालतात, त्यांना आम्ही एकाकी पाडले. 
- आम्ही अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांच्याशी सुद्धा विकासासाठी सहकार्य करण्यावर चर्चा केली. 
- युरोपसोबत आम्ही भारताच्या विकासाठी समझोता केला, तसेच आम्ही स्मार्ट सिटी बनविण्यासाठी मदत केली.
- पंतप्रधान पदाची शपथ घेताना पाकिस्तानसोबत सार्कच्या सर्व देशांना आमंत्रित करण्यात आलं होतं. 
- मला शेजारील राष्ट्रांशी संबंध चांगले पाहिजे. 
- मी लाहोरला सुद्धा गेलो होतो, परंतु शांततेच्या मार्गावर एकटे जाता येत नाही. 
- भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील झालेले मजबूत संबंध एक उदाहरण आहे. 
- गेल्या अडीच वर्षात आम्ही शांततेसाठी काम केलं, अफगाणिस्तानमध्ये याचं उदाहरण पाहता येईल. 
- सबका साथ, सबका विकास... फक्त भारतीयांसाठी नाही तर संपूर्ण जगाला आहे. 
- फक्त आपाल्या फायद्यासाठी बोलणे, ही आपली संस्कृती नाही. 
- ग्लोबलायझेशन सोबत अनेक आव्हाने सुद्धा आहेत. 
- वेगवेगळ्या पद्धतीने जगभरात मोठ्याप्रमाणात बदल होत आहेत.  
- 2014 मध्ये बदल हवा होता म्हणून लोकांनी भाजपला सरकार बनविण्याची संधी दिली.