शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
4
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
5
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
6
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
9
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
10
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
11
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
12
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
13
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
14
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
15
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
16
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
17
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
18
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
19
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
20
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

शांततेच्या मार्गावर एकटे जाता येत नाही - नरेंद्र मोदी

By admin | Updated: January 17, 2017 19:34 IST

मी लाहोरला सुद्धा गेलो होतो, परंतु शांततेच्या मार्गावर एकटे जाता येत नाही. मला शेजारील राष्ट्रांशी संबंध चांगले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर उपरोधिक टीका केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 -  मी लाहोरला सुद्धा गेलो होतो, परंतु शांततेच्या मार्गावर एकटे जाता येत नाही. मला शेजारील राष्ट्रांशी संबंध चांगले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर उपरोधिक टीका केली. राजधानी दिल्लीतील दुस-या 'रायसिना डायलॉग'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी अनेक देशांतील 250 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
 
जे लोक हिंसा, तिरस्कार आणि दहशतवाद्यांना खतपाणी घालतात. त्यांना आम्ही एकाकी पाडले असून दहशतवादाला सळो की पळो केलं आहे. तसेच, जगातील संपूर्ण दहशतवादाचा नायनाट करण्यात येईल. ग्लोबल वार्मिंगचा सामना करण्यासाठी आम्ही कठोर पाऊले उचलली असून तसे प्रयत्नही सुरु केले आहेत, असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी यावेळी अनेक मुद्दावर भाष्य केले. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काही मुद्दे - 
- ग्लोबल वार्मिंगचा सामना करण्यासाठी आम्ही कठोर पाऊले उचलली असून तसे प्रयत्नही सुरु केले आहेत. 
- जे लोक हिंसा, तिरस्कार आणि दहशतवाद्यांना खतपाणी घालतात, त्यांना आम्ही एकाकी पाडले. 
- आम्ही अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांच्याशी सुद्धा विकासासाठी सहकार्य करण्यावर चर्चा केली. 
- युरोपसोबत आम्ही भारताच्या विकासाठी समझोता केला, तसेच आम्ही स्मार्ट सिटी बनविण्यासाठी मदत केली.
- पंतप्रधान पदाची शपथ घेताना पाकिस्तानसोबत सार्कच्या सर्व देशांना आमंत्रित करण्यात आलं होतं. 
- मला शेजारील राष्ट्रांशी संबंध चांगले पाहिजे. 
- मी लाहोरला सुद्धा गेलो होतो, परंतु शांततेच्या मार्गावर एकटे जाता येत नाही. 
- भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील झालेले मजबूत संबंध एक उदाहरण आहे. 
- गेल्या अडीच वर्षात आम्ही शांततेसाठी काम केलं, अफगाणिस्तानमध्ये याचं उदाहरण पाहता येईल. 
- सबका साथ, सबका विकास... फक्त भारतीयांसाठी नाही तर संपूर्ण जगाला आहे. 
- फक्त आपाल्या फायद्यासाठी बोलणे, ही आपली संस्कृती नाही. 
- ग्लोबलायझेशन सोबत अनेक आव्हाने सुद्धा आहेत. 
- वेगवेगळ्या पद्धतीने जगभरात मोठ्याप्रमाणात बदल होत आहेत.  
- 2014 मध्ये बदल हवा होता म्हणून लोकांनी भाजपला सरकार बनविण्याची संधी दिली.