शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

शांततेच्या मार्गावर एकटे जाता येत नाही - नरेंद्र मोदी

By admin | Updated: January 17, 2017 19:34 IST

मी लाहोरला सुद्धा गेलो होतो, परंतु शांततेच्या मार्गावर एकटे जाता येत नाही. मला शेजारील राष्ट्रांशी संबंध चांगले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर उपरोधिक टीका केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 -  मी लाहोरला सुद्धा गेलो होतो, परंतु शांततेच्या मार्गावर एकटे जाता येत नाही. मला शेजारील राष्ट्रांशी संबंध चांगले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर उपरोधिक टीका केली. राजधानी दिल्लीतील दुस-या 'रायसिना डायलॉग'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी अनेक देशांतील 250 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
 
जे लोक हिंसा, तिरस्कार आणि दहशतवाद्यांना खतपाणी घालतात. त्यांना आम्ही एकाकी पाडले असून दहशतवादाला सळो की पळो केलं आहे. तसेच, जगातील संपूर्ण दहशतवादाचा नायनाट करण्यात येईल. ग्लोबल वार्मिंगचा सामना करण्यासाठी आम्ही कठोर पाऊले उचलली असून तसे प्रयत्नही सुरु केले आहेत, असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी यावेळी अनेक मुद्दावर भाष्य केले. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काही मुद्दे - 
- ग्लोबल वार्मिंगचा सामना करण्यासाठी आम्ही कठोर पाऊले उचलली असून तसे प्रयत्नही सुरु केले आहेत. 
- जे लोक हिंसा, तिरस्कार आणि दहशतवाद्यांना खतपाणी घालतात, त्यांना आम्ही एकाकी पाडले. 
- आम्ही अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांच्याशी सुद्धा विकासासाठी सहकार्य करण्यावर चर्चा केली. 
- युरोपसोबत आम्ही भारताच्या विकासाठी समझोता केला, तसेच आम्ही स्मार्ट सिटी बनविण्यासाठी मदत केली.
- पंतप्रधान पदाची शपथ घेताना पाकिस्तानसोबत सार्कच्या सर्व देशांना आमंत्रित करण्यात आलं होतं. 
- मला शेजारील राष्ट्रांशी संबंध चांगले पाहिजे. 
- मी लाहोरला सुद्धा गेलो होतो, परंतु शांततेच्या मार्गावर एकटे जाता येत नाही. 
- भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील झालेले मजबूत संबंध एक उदाहरण आहे. 
- गेल्या अडीच वर्षात आम्ही शांततेसाठी काम केलं, अफगाणिस्तानमध्ये याचं उदाहरण पाहता येईल. 
- सबका साथ, सबका विकास... फक्त भारतीयांसाठी नाही तर संपूर्ण जगाला आहे. 
- फक्त आपाल्या फायद्यासाठी बोलणे, ही आपली संस्कृती नाही. 
- ग्लोबलायझेशन सोबत अनेक आव्हाने सुद्धा आहेत. 
- वेगवेगळ्या पद्धतीने जगभरात मोठ्याप्रमाणात बदल होत आहेत.  
- 2014 मध्ये बदल हवा होता म्हणून लोकांनी भाजपला सरकार बनविण्याची संधी दिली.